News Analysis Page

News Analysis Page परखड आणि सडेतोड

नमूद मेल वर करा अर्ज....
04/03/2024

नमूद मेल वर करा अर्ज....

17/01/2023

पुण्यात सोमवापासून ‘जी २०’ परिषदेस सुरुवात झाली. या परिषदेत भारताच्या प्रगतीसोबतच जगासमोरील संभाव्य समस्यांना ...

02/01/2023

गैरो पे करम.... लिंक पाएं Facebook Twitter Pinterest ईमेल दूसरे ऐप - जनवरी 01, 2023  गैरो पे करम.... गेल्या लेखामध्ये अभिनेत्री माला सिन्हा या....

16/12/2022

'समृद्धी महामार्गा’चे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाले. राज्याच्या प्रगतीत हा...

16/12/2022

रा. स्व. संघाच्या मुशीत तयार झालेल्या आणि भारतीय संस्कृतीच्या जतन-संरक्षणासाठी गेल्या 50 वर्षांपासून झटणार्‍या ह.....

16/12/2022

मोठी शहरे, शहरातून जाणारे महामार्ग, प्रमुख रस्ते यावरील वाहतूककोंडी टाळायची असेल तर सर्वोत्तम पर्याय हा या रस्त्...

31/01/2022
29/12/2021
02/10/2021

सौजन्य - ब्लूपॅड(https://bluepad.in/share/zX2MzEYp3yxdsN6b7)
महात्मा गांधी एक अजब रसायन - Atul Tandalikar

महात्मा गांधी म्हणजे चालता-बोलता दीपस्तंभ, मार्गदर्शक, प्रेरणादायक, स्फूर्तिदायक रणनितीकार, व्यूहरचनाकार प्रेमळ समाजपुरुष...!
लक्षात घ्या ही विशेषणं केवळ एका व्यक्तीला लागू होतात आणि जगला हे सगळं अनाकलनीय आहे...
कारण,
प्रतिकूल परिस्थितीत जगणं सोपं करणारं, वेळ वाचवणारं, आजच्या सारखं तंत्रज्ञान नसतांना हा माणूस फक्त हातात काठी, एक पंचा असा पेहराव करून इंटरनेटच्या गतीनं चालायचा आणि जग हादरवून टाकायचा..!...म्हणूनच मला कधी कधी महात्मा गांधी उमजत नाहीत, खूप नवल वाटतं, चकित करणारी त्यांची जीवनशैली अनाकलनीय...!
आज इतकी दगदग करून माणूस प्रचंड पैसा कमावतोय पण त्यांच्यातील रोष, त्रागा, संताप आपण ठायी ठायी बघत असतो, महात्मा गांधींचा काळ म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ. आम्ही सर्व गुलामीगिरीच्या निर्दयी जोखडात आणि हा माणूस चेहऱ्यावर गोड हसू ठेवून या देशातील प्रत्येक माणसाच्या स्वातंत्र्यासाठी झगडत राहिला ..अनाकलनीय..!
महात्मा गांधी समजून घेणे म्हणजे संशोधन करून प्रबंधांचे ढीग तयार करून ठेवलेत तरी त्यात न समजलेले गांधी असतीलच..
संत ज्ञानेश्वरांची जीवन कारकिर्द जशी चकित करणारी आहे तसाच हा महात्मा...

आणखी वाचा - https://bluepad.in/share/gmAJWn5kj5kq2YZi9
ब्लूपॅड अ‍ॅप डाउनलोड करा - https://bluepad.in/share/zX2MzEYp3yxdsN6b7

Our purpose is to help you express yourself in any Indian language. On Bluepad, you can find blogs to read as well as write poems, stories, articles and more.

08/06/2021

भेट तुझी माझी स्मरते..

या ओळी प्रेम,भावगीताशी निगडित आहेत,याचा राजकीय भेटीशी संबंध नाही,असे असले तरी आज सारख्या याच ओळी ओठांवर खेळताहेत.

का बरे येत असतील? उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी यांची भेट झाली म्हणून..

लोकांना क्रिकेट, राजकारण आणि मनोरंजन हे विषय अतिशय आवडतात.अशीच आवड जोपासणारा मी एक.

जेवढा विव्हीयन रिचर्ड्सचा शैलीदार फटका, हेडलीच्या भरधाव वेगाने फलंदाजांच्या अंगावर येणारा चेंडू,सुनिल गावस्करचा स्ट्रेट,कव्हर ड्राइव्ह,वेंगसरकर,चेतन चौहानची चिवट खेळी,सचिन,सेहवाग,विराट चा आक्रमक खेळ आवडतो तेवढाच गुरुदत्तच्या चेहऱ्यावरील अनाकलनीय भाव,राज कपूरचा भोळेपणा,मिश्कीलपणा,शम्मी कपूरचा धसमुसळेपणा,जॉय,आणि विश्वजित यांचे खलनायकांकडून मार खाणे आणि पुन्हा गोड, सुंदर नायिकांसमोर मिरविणे,जितेंद्रचे नाचणे देखील आवडते आणि राजकारणात म्हणाल तर पंडित नेहरूंच्या व लाल बहादूर शास्त्रीच्या कामगिरीचा पुस्तकी आढावा घेतला असला तरी अटलजी,मोरारजी,यशवंतराव, चंद्रशेखर, ज्योती बसू, सोमनाथ चटर्जी, विश्वनाथप्रतापसिंह, राजीव गांधी पी.ए.संगमा, लालू प्रसाद, मनोहर जोशी, जॉर्ज फर्नांडिस,शरद पवार,सुधाकरराव नाईक, आणि अर्थात बाळासाहेब ठाकरे देखील कायम आवडत आलेत.
आज या रांगेत नरेंद्र मोदी, गंमत म्हणून राहुल गांधी,जे.पी.नड्डा,ओम बिर्ला, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ,अजित पवार, चंद्रशेखर राव, राजशेखर रेड्डी, स्टॅलिन, उद्धव ठाकरे, चंद्रकांत दादा,प्रकाश आंबेडकर, गोपीचंद पडळकर, नारायण राणे, रावसाहेब जानवे,अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले,जयंत पाटील, आणि (सर्वांना आवडत असतील हे गृहीत धरून ) रामदास आठवले हे देखील येऊन बसलेत.
यांच्यातील मतभेद , त्याची वैचारिक उंची,एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप याकडे केवळ शुद्ध याच हेतूने बघावे.

आजकाल भेटी खूप चर्चेत आल्या आहेत.तसा त्याला इतिहास जुना नाही यापूर्वीही त्या हेडलाईन, ब्रेकिंग न्यूज बनत.अटलजी,अडवणीजी बाळासाहेब भेट कोणीही विसरू शकणार नाही.
दीड-दोन महिन्यांपूर्वी अमित शाह-शरद पवार यांची (झालेली,न झालेली भेट) चर्चेत आली आणि त्यानंतर हा भेटींचा सिलसिला सुरू झाला.
कधी फडणवीस- शरद पवार भेट तर कधी फडणवीस- एकनाथ खडसे यांचे घरी जाऊन त्यांचेशी बोलणे, मग नाथाभाऊ आणि शरद पवार, बाळासाहेब थोरात- शरद पवार भेट असा सिलसिला सुरू झाला अर्थात शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस हे सुर्यप्रकाशाईतके स्पष्ट असताना पवार- फडणवीस आणि उद्धव- मोदी भेटीने अनेक राजकीय सुरस कथांना जन्माला घातले आजकाल त्या वृत्त वाहिन्यांवर बघतांना, ऐकतांना अगदी विराटच्या आक्रमक फटक्यासारखे, अमिताभ,धर्मेंद्रच्या दमदार डॉयलॉग सारखे मनोरंजन होते.

या सुरस कथातील हवा निघून जाते तेव्हा मात्र भरमसाठ मार खालेले, प्रेम चोपडा, अमरीश पुरी सारखी या वाहिन्यांची अवस्था झालेली असते..

अतुल क. तांदळीकर

29/03/2021

सारं काही अनाकलनीय

राज्यातील एकूणच राजकीय,सामाजिक स्थिती यात खूप अंतर आहे.

सामाजिक स्थितीचा विचार केला तर , लोक कोरोनामुळे वैतागले आहेत आणि महागाई तसेच अन्य समस्यांनी त्रासले आहेत, राजकीय दृष्टीने विचार केला तर राज्यातील स्थिती लोकांच्या आकलनापलीकडील आहे, व देशातील स्थितीबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

थेट बोलायचं झालं तर नरेंद्र मोदी सरकारच्या कारभारावर जनता खुश आहे आणि उद्धव ठाकरेंच्या कारभारावर असमाधानी आहे.

मोदींच्या कारभाराचे आकलन लोकं त्यांच्या धडाकेबाज कामगिरीवरून करतात आणि ठाकरे सरकारच्या कारभाराचे आकलनच होत नाही.

राजकीय सोयीनुसार अर्थ घेतला तर मोदी सरकारच्या अप्रिय कारभाराला विरोध करणारे कुणी शिल्लकच राहिले नाही व जे योग्यरित्या विरोध करतात ते पुरेसे नाहीत.
ठाकरे सरकारच्याबाबतीत नेमके उलटे आहे इथे विरोधकांनी पुरती इज्जतच चव्हाट्यावर आणली आणि सरकारला कारभार कसा करावा याचे भान राहणार नाही अशी स्थिती निर्माण केली.
पण गम्मत अशी आहे की, इतका विरोध होऊनही ठाकरे सरकार पुरून उरते आहे वेगवेगळ्या विचारधारा तिन्ही पक्षांच्या असून देखील सत्तेत टिकून आहे ,अर्थात कामगिरी काहीच नाही...आणि मोदी सरकारला विरोधकच उरले नसल्याने ते टिकून आहे,अर्थात सरकारची कामगिरी आहेच.....मात्र यात एक फरक नक्की आहे, ठाकरे सरकार मनमानी कारभार करीत आहे व विश्वास गमावून बसले आहे,हे लोकांना अनेक उदाहरणे व घटनांचा विचार केला तर पटू लागले आहे आणि मोदी सरकार , त्यांच्या लोकप्रिय निर्णयामुळे लोकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे,विशेष म्हणजे त्याचा लाभ सरकारच्या पक्षाला होत आहे,राज्यात तिन्ही पक्ष हा लाभ घेऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

देशातील सरकारच्या स्थिरतेचा नाही पण राज्यातील सरकारच्या स्थिरतेचा प्रश्न कायम राहतो.

विश्वास गमवायला कारणीभूत असणाऱ्या घटना घडत असल्याने व विरोधक अक्षरशः तुटून पडत असूनही हे ठाकरे सरकार वादळात सापडलेल्या जहाजाप्रमाणे हेलकावे खात आहे..

काही घडामोडी इतक्या अनाकलनीय आहेत, की त्या सरकारमधील लोकांना व विरोधकांना देखील समजण्यापलीकडच्या आहेत,त्यामुळे राज्यात केवळ सरकार आहे व ते बिनकामाचे आहे एवढेच लोक म्हणू शकतात
ना विरोधक काही करू शकत, ना सरकार धड काम करू शकत...

अशा स्थितीत एकच दुर्दैवाने म्हणावे वाटते, हे सुसंस्कृत महाराष्ट्र राज्य निव्वळ वाऱ्यावर आहे,कारण जे काही घडत आहे ते सामान्य लोकांसाठी अनाकलनीयच..

अतुल क.तांदळीकर

19/01/2021

राजकारण्यांनो...
अजिंक्य राहणे हाच बोध घ्या..

खूप दिवसानंतर मीडियावर आनंदाला उधाण आले आहे.एकमेकांची दुणी काढण्याची सवय लागलेल्या मीडियावरील काही (द्वेषाने पिसाटलेल्या वाहिन्या वगळून) हा आनंदोत्सव साजरा होत आहे. भारताचा क्रिकेटमधील विजय आणि महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीतील विजय आजकाल या उत्सवाचे प्रतीक ठरले आहेत.

आता या दोन विजयात साम्य कोणते तर दोन्ही ठिकाणी नवख्यांनी कमाल केली आहे.
भारतीय क्रिकेट संघात पुजारा, रोहित आणि अंजिक्य वगळता सगळे नवखे खेळाडू होते त्या सगळ्यांची कामगिरी शानदार, दमदार झाली आहे. गिल,सिराज,पंत व अन्य सर्व खेळाडूंनी या विजयात मोलाचा वाटा उचलला आणि आम्हा सर्व राजकारण, क्रिकेट प्रेमी जनतेला आनंदाचे गिफ्ट दिले. यांचा प्रतिस्पर्धी होता ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ.

दुसरीकडे महाराष्ट्रात ग्राम पंचायत निवडणुकीत देखील सर्वत्र नवखे उमेदवार होते.
त्यांची आपापल्या क्षेत्रातील कामगिरी शानदार,दमदार आहे.त्यांच्या विजयानंतर आनंदोत्सव अजूनही होताहेत.

राजकारणातील ही इनिंग खेळणारे नवखे उमेदवार उद्या कदाचित उद्याचे नेते म्हणून भविष्यात उदयास येतील.
आता या राजकीय विजयाच्या आनंदाचे उन्मादात रूपांतर होणार नाही ही काळजी घेतली तर जनतेचा कौल कुणाला आहे याचे विश्लेषण करायची गरज पडणार नाही.

अजिंक्य राहणे हाच बोध या क्रिकेटपटू व राजकारण्यांनी सतत घ्यावा.

राजकारण व क्रिकेट हा सर्वांचा आवडता विषय. भारतीय संघ आणि ग्रामपंचायत निवडणुकीतून विजयोत्सव आणखी काही दिवस सुरू राहील व यामुळे देशातील विशेषतः महाराष्ट्रातील द्वेषाचे राजकारण संपुष्टात येईल असे समजुया..
-अतुल क.तांदळीकर

14/01/2021

राजकीय सावधगिरी आणि
सामाजिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष

धनंजय मुंडे प्रकरण आज ज्या टोकाला पोचलं , तेव्हा अशावेळी खरं तर नैतिकता,सामाजिक स्वास्थ्य,महिला चारित्र्य आणि त्यातून सर्वांनी काय बोध घ्यावा आणि भविष्यात कुणीही अशा वाटेला जाऊ नये म्हणून सावधगिरी बाळगायला हवी, मात्र तूर्त तरी राजकीय राजकीय सावधगिरी शिवाय काहीही दृष्टिपथात पडत नाही.

या प्रकरणावर ज्या दोन महत्त्वाच्या नेत्यांकडे राज्याचे भवितव्य म्हणून बघितले जाते त्या शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सावध भूमिका घेतल्याचे निदर्शनास येत आहे,बाकी सर्वजण अपेक्षेनुसार आक्रमक झालेले दिसतात.
...पण शोकांतिका ही आहे की, समाजातून कोणतीही नैतिकतेला धरून आक्रमक प्रतिक्रिया उमटली नाही. ना त्या महिलेवरील अन्याबाबाबत कोणी तोंड उघडत वा मुंडे यांनी केलेल्या खुलाशाबाबत बोलत...

सामाजिक स्वास्थ्यासाठी हे प्रकरण योग्य नक्कीच नाही,पण अशी प्रकरणे प्रकाशझोतात आणणे हे तरी कितपत योग्य आहे याचा विचार होणे गरजेचे आहे.

भविष्यातील आपल्या राजकीय सोयीसाठी पवार आणि फडणवीस यांनी घेतलेल्या सावध भूमिका बघता समाजाने देखील अशा घटनांपासून सावध राहणे, सलोखा ठेवणे स्त्री चारित्र्याचे रक्षण करणे गरजेचे आहे.

सामाजिक सोयीसाठी किमान पवार - फडणवीस यांचेकडून हे तरी शिकले पाहिजे केवळ राजकारण्यांनी समाज सुधारण्याचा ठेका घेतलेले आहे हा लोकांचा भ्रम आहे.

आपल्या समाजातील एखादा पुरुष अथवा स्त्री बिघडत असेल तर त्याला सुधारणे ,योग्य मार्गावर आणणे समाजाचे कर्तव्य नाही का?

या गोष्टी चघळत ठेवायच्या नसतात.आपसात मिटवायच्या असतात पण लोकांना विसंबून रहाण्याची सवय जडली.

ज्या महिलेने मुंडे यांचेवर आरोप केलेत त्याच महिलेविरोधात भाजपचे कृष्णा हेगडे यांनी पोलिसात तक्रार दिली.त्यांनी ही तक्रार उशिरा का दिली असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर खूप महत्वाचे आहे.

एका महिलेची विनाकारण बदनामी करणे (तिला ती कशीही असली तरी) त्यावेळी आपणास योग्य वाटले नाही असे हेगडे म्हणालेत.

येथे स्त्री -पुरुषांनी समाजात वावरताना कसे वागले पाहिजे,खाजगी आयुष्यात कोणत्या मर्यादा पाळल्या पाहिजेत हे अधोरेखित होणे गरजेचे आहे, पण माध्यमांवरील चर्चा भरकटते आहे व त्याचे दुष्परिणाम समाजस्वास्थ्यावर होत आहेत हे मात्र नक्की...

- अतुल क.तांदळीकर

12/01/2021

जनतेच्या तळपायाची आग मस्तकात गेली नाही का अजून..?

राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा कारभार कसा चालला यापेक्षा या राज्यातील जनता स्वतःचा झालेला विश्वासघात किती काळ बघणार आहे व सोसणार आहे हा महत्वाचा प्रश्न आहे.

आता तर प्रताप सरनाईक, वर्षा संजय राऊत,मेहबूब शेख,राम कदम,आणि आता निर्लज्जपणाचा कळस चढवणारे धनंजय मुंडे यांनी तर सुसंस्कृतपणाची वाट लावली आहे .पुरोगाम्यांची तोंडे बंद झाली आहेत जे पायचाटू आहेत ते त्या महिलेच्याच तक्रारींवर प्रश्न उपस्थित करू लागले आहेत
तरीही महाराष्ट्राची जनता शांत आहे, तळपायाची आग मस्तकात जायसाठी आता आणखी काय घडायला हवे?

-----------

कोरोनाकाळातील महाराष्ट्रातील सरकारची कामगिरी व कोरोना नंतरची कामगिरी बघता राज्यातील विशिष्ट आनंदाच्या उकळ्या फुटणाऱ्या लोकांनाच ती पटली आहे असे भीषण वास्तव आहे.

लोकशाही आहे व व्यक्ती स्वातंत्र्य पाळायचे म्हणून वाट्टेल ते करण्याचा खटाटोप आजकाल रूढ होताना दिसतो ही फार मोठी शोकांतिका आहे ती जर परंपरा म्हणून भविष्यात देखील पाळली गेली तर मग मात्र या सुसंस्कृत महाराष्ट्राचे काही खरे नाही.

बरे अशा सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी जबाबदार विरोधी पक्ष असतो,सुदैवाने तो आहे देखील ... त्याचे नेतृत्व देखील बुद्धिमान आहे ते सत्तेत बसलेले मान्य देखील करतात परंतु घाणेरड्या ,गलिच्छ राजकारणाची सवय जडलेल्या सत्ताधाऱ्यांनी त्या नेतृत्वाची पार खिल्ली उडवून टिंगलटवाळीचा एक पायंडा घातला हे आणखी एक दुर्दैव आहे.

सत्तेत बसलेल्या व सत्तेची सूत्रे चालविणाऱ्याना पुरून उरेल असा विरोधी पक्षनेता असताना नेमके त्याचे मुद्दे,मागण्या दुर्लक्षित करायच्या आणि भ्रष्टमार्गाने कामे करून पोळी शेकण्याचे उद्योग सुरू झाले आहेत.

त्यात भरीस भर अशी की या टिंगलटवाळीवर प्रकाशझोत कायम ठेवण्याचे कार्य समाजमाध्यमात सक्रिय असणारी टोळी व स्वतःला बुद्धिमान समजणारे मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील तथाकथित लोक करीत आहेत.

यापैकी एक देखील माध्यम राजकीय पपक्षांकडून लोकांच्या झालेल्या विश्वासघातावर चर्चा घडवून आणत नाही वा राज्यातील आकार्यक्षमतेला चव्हाट्यावर आणीत नाही.

त्यामुळे झाले काय की, सरकारचे दोष मांडून देखील आपोआपच विरोधी नेत्याचे हसू होऊ लागले आणि त्यांना देखील एकाच माळेतले मणी म्हणून बघितले जाऊ लागले.

सत्तेतील तिन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करतात, पण खुर्ची जाऊ नये स्वतःचाच अपमान सहन करतात,आंदोलक या सत्तेतील लोकांची इज्जत काढतात पण त्यांना दुःख नाही.

खरे तर आज राज्याची प्रगती,राज्यातील सलोखा आणि उदयास येऊ घातलेल्या नव्या पिढीसाठी खूप काही सकारात्मक घडवण्याची संधी कोरोनाकाळानंतर चालून आली..

पण लक्षात कोण घेणार? लोकांनी एकजुटीने धडा शिकवला तरच हे शक्य आहे अन्यथा संधिसाधू राजकारणी जनतेला मूर्ख म्हणूनच हिणवत राहतील व राज्याचे वाटोळे होत राहील.

एकेकाळी मुंबई,पुणे औरंगाबाद महानगरे विकासाची दिशा दाखवणारी होती, आज त्यांची दशा झाली,राळेगणसिद्धी, हिवरेबाजार आदर्श गावे होती, आज ही ओळख मिटत आहे.

उद्या राज्याची ओळख मिटवणारे कोण हे आता राज्यातील शहाण्या लोकांना वेगळे सांगावे लागेल का?
- अतुल क. तांदळीकर

06/01/2021

सत्ता सुंदरी - 1

एका युवतीला सगळेजण निर्लज्ज म्हणून हिणवत असतात.सुरवातीला ती याकडे दुर्लक्ष करते, मात्र तिच्या वर्तनाने त्रस्त झालेले सर्वजण तिला सारखे तू किती निर्लज्ज आहेस थोडी तरी लाज बाळग म्हणून समजावून सांगण्याचा वा तशी जाणीव करून देण्याचा प्रयत्न करीत असतात, या गोष्टीचा तिला भयंकर त्रास होतो कारण तिला वाटत असते की,आपण जे करीत आहोत त्यात निर्लज्ज असे काहीही नाही त्यामुळे ती भयंकर चिडते,त्रासून जाते आणि यावर उपाय विचारण्यासाठी एका मनोचिकित्सकांकडे जाते व त्यांना विचारते,मला सगळे लोक निर्लज्ज आहेस, बेशरम आहेस, तुला काही लाज-लज्जा उरली नाही असे म्हणतात,पण मला तर माझ्यात असे काहीच दिसत नाही व वाटतही नाही यावर उपाय सांगा बरं..
त्यावर ते मनोचिकित्सक तिला म्हणतात, बये, आधी माझ्या मांडीवरुन उठ आणि समोरच्या खुर्चीत बस!
---------------------
सत्ता सुंदरी - 2

एक राजा असतो.तो अतिशय सनकी असतो.एखाद्या राष्ट्राचे नेतृत्व करणारे हे सनकीच असतात.
राज्याचा कारभार सुरळित सुरू असतो.कुणीतरी राजाला सांगतो की आपल्या देशात मंदबुद्धी लोक खूप आहेत.त्यावर राजा त्यांना सर्व मंदबुद्धि लोकांचा शोध घ्यायला लावतो,व त्यांना मदत करा असे फर्मान काढतो मात्र राजाच्या या आदेशाचा विपर्यास असा होतो की लोक मदत मिळणार म्हणून मी मंदबुद्धीचा आहे म्हणून गोळा होऊ लागतात...
---------------------
(राज्य व देशातील वर्तमान राजकीय स्थितीशी या गोष्टींचा संबंध नाही असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा)
- अतुल क.तांदळीकर

01/01/2021

बदलाचे दिवस

गोंधळाची स्थिती निर्माण होण्याला सूड, द्वेषाचे राजकारण आणि काही मस्तवाल डोक्यांमुळे बिघडलेले बिघडलेले समाजकारण कारणीभूत आहे.
गेल्या 7-8 वर्षात समाज माध्यमांवर जो अभिव्यक्त होण्याचा प्रवास सुरु आहे तो अनेक वेळा ओकारी व्हावी इतका त्रासदायक ठरला आहे.प्रतिभावंत व्यक्त होत असताना कालानुरूप विचार रुजवत असताना समाज दूषित करणारा हा समाज माध्यमातून व्यक्त होण्याचा प्रकार या नव्या वर्षात सकारात्मक बदलाच्या दिवसात थांबायला हवा. थेरड्या, वाकडतोंड्या,टरबूज, चंपा,पप्पू अशी दूषणे देऊन व्यक्त होण्याच्या सवयीमुळे या सुसंस्कृत देशातील शिक्षित आणि सुशिक्षित वर्गाने शरमेने मान खाली घालायला भाग पाडले यात संदेह नाही.
अर्थात या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे हा उपाय आहे मात्र समाजात जर ही रुजवात होऊन त्याचे दुष्परिणाम दिसत असतील तर या गोष्टींना आळा बसायलाच हवा तरच या देशात जे पर्व सुरु झाले त्याचे चांगले परिणाम दिसून येतील, समाज चांगल्या दृष्टीने याकडे बघू लागेल प्रत्येक गोष्टीला विरोध ही प्रवृत्ती कमी होईल, काही घडलेल्या गोष्टींमुळे ते चांगले की वाईट याची वाट बघावी लागेल
राज्यात आणि देशातील सरकारबाबत चांगले आणि वाईट हे दोन्ही दृष्टिकोन असले तरी त्यांना कार्यक्षम होण्याची संधी दिली पाहिजे पण खरोखरच वाईटच सत्ताकारण चालले आहे ही भावना दृढ झाली व त्याचा लोकांना जगताना त्रास होऊ लागला तर मात्र ते सरकार घालवण्यासाठी प्रयत्न झालेच पाहिजे त्यासाठी समाज माध्यमातून घाणेरड्या पद्धतीने व्यक्त होण्याऐवजी विचारपूर्वक व्यक्त झाले पाहिजे
आगामी काळात आपल्याला सर्वानाच बदलायचे आहे हे बदलाचे दिवस आपण एक प्रगतिशील राष्ट्राचे नागरिक म्हणून जगुया...
- अतुल क.तांदळीकर

31/12/2020

बदलाचे दिवस

गेल्या काळात देशातील राजकारणात झालेल्या उलथापालथीमुळे सामाजिक मानसिकता देखील ढवळून निघत असल्याचे चित्र आहे.
यामुळे देशात दोन सूर उमटत आहे.
एक द्वेषाचे वातावरण निर्माण होत आहे हा...
आणि
दुसरा देशात गेल्या 40 वर्षातील सुधारणांच्या तुलनेत काही आश्वासक बदल घडताहेत हा...
जसा राजा तशी प्रजा ही उक्ती या काळात किती लागू होते हे माहीत नाही पण देशांतील राजकारणात जी दोन पर्व बघितली ती म्हणजे काँग्रेसचे पर्व आणि आता मोदी पर्व या मोदी पर्वाला भाजपचे पर्व म्हणायचे का हे ज्याचे त्याने ठरवावे.
काँग्रेस काळातील सुरवात सुधारणांच्या वाऱ्याची होती आणि मोदी पर्वाची सुरवात प्रगतीची झुळूक घेऊन आली आहे.
काँग्रेसची नंतरची कारकीर्द भ्रष्टाचार पसरवू लागली आता मोदींच्या कारकिर्दीत द्वेष पसरू लागल्याचे बोलले जाते पण या तर्कावर येणे थोडे घाईचे वाटते, कारण मोदी पर्व सुरू होतांना देशात समाज माध्यमातून मतं व्यक्त व्हायला सुरुवात झाली होती आता हे व्यक्त होणे स्वैर झाले आहे. लोकशाहीतील अभिव्यक्त होण्याच्या अधिकाराचा पुरेपूर लाभ जनता घेत आहे ,यातून समाजकारण व राजकारण अधोरेखित होत आहे मात्र विचारसरणीची सरमिसळ झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे याचा गैरफायदा संधिसाधू घेत आहेत व देशातील वातावरण बिघडवीत आहेत...
ते कसे हे पुढील भागात....

-अतुल क. तांदळीकर

कमेंट्स द्या, शेअर करा प्लिज..

Address

Jalgaon
425001

Alerts

Be the first to know and let us send you an email when News Analysis Page posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to News Analysis Page:

Share


Other Jalgaon media companies

Show All