मनस्पर्श

मनस्पर्श मन कि बात... बेधडक

04/11/2023

✍️... रफू..!

एक मित्र भेटला परवा... खूप जुना शाळेतला...! बऱ्याच वर्षांपूर्वी भांडण झालं होतं आमचं..! नेमकं कारणही आठवत नव्हतं मला, इतक्या वर्षांनंतर... म्हणाला, _"मुद्दामहून भेटायला आलोय तुला... हा योगायोग नाही... क्षुल्लक कारणांमुळे नाती तुटलेल्या सगळ्यांना भेटायचं ठरवलंय."

सुरुवात माझ्यापासूनच होती. कारण, सगळ्यात जास्त किरकोळ कारणावरुन... सर्वात अधिक घट्ट नातं तुटलेल्यांत मी अग्रस्थानी होतो..! अचानकच समोर आल्याने मला माझा अहंकार काही पुरता बाजुला सारता आला नाही... तेव्हढा वेळच नाही मिळाला. विचारलं मी त्याला अचानक ऊपरती होण्यामागचं कारण... चेहऱ्यावर शक्य तेव्हढा _'आलासच ना अखेरीस'_ हा माज ठेऊन.

तो मला म्हणाला, _"दोन महिन्यांपूर्वी मला माझी चूक कळली..! काॅलेजमध्ये थर्ड ईयरला असताना तू एकदा रफू केलेली पॅन्ट घालून आला होतास...! ते कोणाला कळू नये म्हणून केलेल्या अवाजवी प्रयत्नात, नेमकं ते माझ्याच लक्षात आलं आणि मग मी त्याचा बाजार मांडायला अजिबात वेळ दवडला नव्हता...!

वर्गात सगळ्यांना सांगून, सगळे तुझ्याकडे अगदी बघून बघून हसतील याचीही सोय केली... त्यानंतर तू मला तोडलस ते कायमचंच..! मी किमान वीस वेळा मागितलेली तुझी माफी दुर्लक्षुन...!

तू त्यावेळी मला म्हणाला होतास, 'देव न करो आणि कधी तुझ्यावर अशी वेळ येवो'..! ती वेळ माझ्यावर आली... दोन महिन्यांपुर्वी... नाही शिवू शकलो मी ते भोक..! नाही करु शकलो रफू... नाही बुजवता आलं मला, माझ्याकडचा होता नव्हता तो पैसा ओतून ते एक छीद्र..! माझ्या मुलाच्या हृदयात पडलेलं...!

गेला तो तडफडत मला सोडून, कदाचित मला दुषणं देत...
' कसला बाप तू?' अशी खिल्ली ऊडवत बहुदा मनातल्या मनात..! म्हणूनच आलोय मी तुझ्याकडे आता निदान आपल्या फाटलेल्या नात्याला तरी ठिगळ लावता येईल की नाही बघायला..! यावेळी तू आपलं नातं *'रफू'* केलेलं पहायला...
त्यावेळी जेव्हढा हसलो मनापासून खदखदून, तेव्हढंच ह्यावेळी मनापासून हमसून रडायला"

सुन्न होऊन ऐकत होतो मी... संवेदना जागी असली की वेदनेला मोठ्ठ अंगण मिळतं बागडायला... 'देव करो नी तुझ्यावर ही वेळ न येवो', चा असा टोकाचा अर्थ मला अजिबातच अभिप्रेत नव्हता..! घट्ट मिठी मारली आम्ही एकमेकांना... नी भिजवायला लागलो एकमेकांचे विरुद्ध खांदे..!

'तो' त्याने नकळत केलेल्या _'पापातून'_ अन् 'मी' नकळत दिलेल्या _'शापातून'_ ऊतराई होऊ बघत होतो..! मूकपणे एकमेकांची माफी मागू पाहत होतो..! दोघं मिळून एक नातं, नव्याने *'रफू'* करू पाहत होतो..!

तात्पर्य: सर्वांना एकच नम्र विनंती, मनुष्य जन्म एकदाच मिळतो, मिळालेले हे जीवन जास्तीत जास्त सार्थकी लावणेचा सदैव प्रयत्न झाला पाहीजेत, त्यासाठी सर्व नातेसंबदांना जपा, कुणाचाही अपमान करू नका, कुणालाही क्षुल्लक क्षुद्र लेखू नका. आपले मित्र नातेवाईक, शेजारी, सहकारी आपले नोकर चाकर हे आर्थिक व सामाजिक परिस्थींतीने कमी असले तरी त्यांच्यात कधीच उणे-दुणे काढू नका, त्यांच्यातील कोणत्याच वर्मावर कधीही बोट ठेवून त्यांचा अपमान करू नका. जगात परिपूर्ण कुणीही नाही, आपल्या आचरणणांने कुणी दुखावेल व दुरावेल असे शब्द कधीही उच्चारु नका. आपल्या वाणीवर व वर्तनावर सदैव नियंत्रण ठेवा, व कधी अनावधनाने कुणी दुखावलेच तर वेळीच "रफू" करायला विसरू नका..! लेखक अज्ञात:

धन्यवाद : चुकले असेल काही तर माफी द्यावी.. आम्हांवर आपली कृपा असु द्यावी @ उमेश सदाशिव पवार 👏

✍️...    गावाकडल्या गोष्टी - जुन्या काळातील लग्न 🎉     लग्नामध्ये आहेर केल्यानंतर माईकवरून पुकारायची पद्धत होती. अमुक अम...
06/03/2022

✍️... गावाकडल्या गोष्टी - जुन्या काळातील लग्न 🎉

लग्नामध्ये आहेर केल्यानंतर माईकवरून पुकारायची पद्धत होती. अमुक अमुक एक रुपया, तमूक तमूक दोन रुपये, अशा प्रकारे. ज्याचा आहेर अकरा रुपये किंवा त्याच्या वर असेल, त्याच्याबद्दल तर खूप भारी वाटायचं. त्याच्यानंतर लग्नानंतर दोन-चार दिवसातच नवरदेव त्याला लग्नात हुंडा म्हणून मिळालेला रेडिओ गळ्यात घालून, मिळालेल्या सायकलवर ऐटीत टांग टाकून आणि मिळालेले हॅंडो सँडो चे घड्याळ हातामध्ये सगळ्यांना दिसेल दिमाखात दाखवत, गावात पूर्ण फेरफटका मारायचा, त्यावेळेस त्याची शान काही औरच होती. आत्ताच्या नवरदेवांना त्याच्या शंभर पट मिळाले, तरी त्याची सर येणार नाही हे नक्की.

लग्नाच्या दोन दिवस अगोदर सर्वांसोबत बुंदी बनविण्यासाठी केलेले जागरण, किंवा लापशी वा भात बाजेवर टाकून नंतर वाढायला घेतांना अक्षरशः वापरलेले फावडे, पिण्यासाठी नदीवरून बैलगाडीने टिपाड भरून आणताना पूर्ण ओलेचिंब होणे, हे सर्व इतिहास जमा झालेय.

लग्नाआधी मुला-मुलीच्या वडिलांसोबत त्यांना घालावयाची आंघोळ, त्यानंतर सर्वांना आग्रहाने धरून आणून कपाळभर भरलेला मळवट, त्यावरून लावलेली चमकी सगळे नव्या पिढीला पटणार देखील नाही.... कालाय तस्म..

"आली ईईईईई लग्नघटी समीप नवरा" ... अशी आरोळी कानावर पडली की बूड झटकायला सुरुवात करायची. नंतर वाजवा रे वाजवा .... असे बामन म्हणला, की मंडपाच्या बांबूला पाठ लावून बसायचे ... जेणेकरून "तदेव लग्नम सुजनम तदेव.. ताराबलम चंद्रबलम" ऐकायच्या आत मुठीत कोंबलेल्या रंगीत अक्षता नवरानवरीच्या अंगावर बचकन फेकून पायाला रुतणारे ढेकळ बाजूला करायचे .... पहिली पंगत !

गावातल्या लग्नात जेवायची ही गंमत ज्यांनी अनुभवली असेल, त्यांना कोणत्याही महागड्या हॉटेलात अजिबात मज्जा येणार नाही. तिकडे नवरा नवरी होमाभोवती गिरक्या मारे पर्यन्त पत्रावळी वाला पंगतीत फिरायला सुरुवात करतो । (पत्रावळी म्हणजे पळसाची पाच सहा पाने काड्यांनी शिवून बनवलेले ताट) या पत्रावळी निम्म्या तरी फाटलेल्या असत त्यामुळे दोन जोडून घ्याव्या लागत. पत्रावळी वाटणारी मंडळी विशेष क्रूर आणि निष्ठूर का असत कोण जाणे ! फाटलेली पत्रावळ बघून सुद्धा मुद्दाम दुसरी पत्रावळ देत नसत ... आणि जर दिलीच तर तीही एकदम तुकडा झालेली. जणू लग्न यांच्या घरचे असते, अशा थाटात तुच्छ कटाक्ष टाकून बघत.

पत्रावळ ढेकळांवर ठेवली की ती सरळ कधीही राहत नसे. त्यासाठी खाली ढेकळांची खास सेटिंग करावी लागे. कशीबशी पत्रावळ सेट केली, तर वारा येई आणि ही बया इकडेतिकडे उडू लागे. त्यासाठी एक वजनदार ढेकूळ पत्रावळीवर ठेवावा लागे. पत्रावळी स्थानापन्न झाल्या, की मीठ वाढणारा अतिशय घाईत असणारा येई आणि कुठल्याही भिंतीवर निर्लज्जपणे थुंकल्यासारखा बरोबर मध्यभागी मिठाची बचक सोडे. याना पत्रावळीला काठ असतात हे माहीत नसावे. त्याच्या मागोमाग बुंदी वाढणारे झांजपथक येते. जिथे मीठ वाढलंय त्यावर नेम धरून बुंदी वाढायची असा प्लान करून आलेले असत, दुष्ट साले. सगळी बुंदी खारट होऊन जाई.

मीठ आणि बुंदी कष्टपूर्वक वेगळे करेपर्यंत मोठया टोपलीत भात घेऊन दोघेजण पळत येत. दोघांच्या हातात भात वाढायला चहा प्यायच्या बशा असत. एकाच वेळी दोन पंगती वाढताना टांग्याला जुंपलेल्या बिगरखांदी बैलांसारखे शिवळा ताणत पुढे पुढे धावत. बुंदीच्या अंगावर सांडलेला भात बाजूला करेपर्यंत वरणाची बादली येई. वरण वाढणारी मंडळी बिनडोक असत. भाताचे कितीही छान आळे बनवले तरी तो वरण नावाचा द्रव आळ्याच्या बाहेर ओतायचा चंग बांधून आलेले असत. भाताचा कोथळा फोडून बाहेर वाहणारे वरण आवरता आवरता जेवणारा घामेघुम होऊन जाई.

वरणाची बादली पुढे सरकल्यावर मागून झणझणीत वांगं उसळीची बादली नाचत येते. उसळीत घुसवलेले वग्राळे तर्रर्रर्ररीसकट बाहेर येई आणि पत्रावळीवर उताणे होई. यामुळे नुकताच कालवून ठेवलेला वरणभात आणि निसून ठेवलेली बुंदी मिठाच्या ढिगाऱ्यासह ओलेचिंब होई.

काड्यांनी शिवलेल्या पत्रावळीने एव्हाना दम तोडलेला असे. तिच्या फटीमधून वरण आणि उसळीचा रस्सा ढेकळात झिरपू लागतो.... एखादा ओघळ पत्रावळीचे काठ ओलांडून थेट वाढणाऱ्याच्या पायांखाली लोटांगण घालतो.. त्यात जरका सोसाट्याचा वारा आला तर गम्मत नका विचारू...

शेताच्या बांधावरचा पाचोळा, घरामागच्या उकिरड्यावरची राख आणि नुकतीच कापून फेकलेल्या हरळीची पाने कालवलेल्या भातावर येऊन बसत. आता भातातून बुंदी निवडायची की हरळीची पाने या संभ्रमात असलेला जेवणारा "वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे" ही राकट, चिडलेल्या आवाजातली आरोळी ऐकतो आणि पहिली बुंदीची बचक तोंडात सारी.

बुंदी खाताना मंडपाच्या छताकडे बघायला लागे. त्यामुळे खाली पत्रावळीत गुपचूप येऊन पडलेली मणभर भाताची बशी बघायला चान्स नाही. मागून तिच्या अंगावर तुटून पडणारा वरणवाला सरकारी काम असल्यासारखा भडकन वरण ओतुन पळूनही जाई..

काही मिनिटातच पत्रावळीतून जसे पाणी खाली झिरपते, तसाच खालचा ढेकूळ पत्रावळीत झिरपून वर येऊ लागे. आधीच बुंदी आणि उसळीत रंगलेला भात ढेकळाच्या नामस्मरणात कधीच सावळा विठठल बने....

बाराचे लग्न अडीच ला लागलेले असते, त्यामुळे खाणारे पत्रावळीच्या दुर्दशेकडे न बघता एकामागे एक ढिगारे संपवत इतस्ततः पसरलेले मीठ बोटांवर चोळून पत्रावळीची घडी करत.. ती पुन्हा उडू नये म्हणून तिच्या बोकांडी मोठा ढेकूळ ठेवत आणि पाण्याच्या टँकरकडे धावत. एकाच पाईपला ठिबक सिंचनच्या दहा नळ्या जोडून चिखलात रुतलेला हा स्थितप्रज्ञ पाईप अर्धे पाणी खाली सांडवत असे...

पहाटे ५ वाजता भरून आणलेला थंड पाण्याचा टँकर एव्हाना अंघोळीच्या पाण्यासारखा गरम झालेला असे. प्लास्टिकच्या रंगीबेरंगी ग्लासातून दोन घोट पाणी पिऊन नवरा नवरीला आशीर्वाद देत लोक आल्या मार्गाला लागत..... येताना खिशात लपवलेला प्लास्टीकचा ग्लास म्हणजे त्यांना ऑस्कर पुरस्कार वाटत असावा...

#२-५ रुपये आहेर केल्याच्या बदल्यात पोटभर धूळयुक्त जेवण आणि एक प्लास्टिकचा ग्लास..😊

❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️


#टीप: आपल्या सारख्या नव्या-जुन्या पिढीने..... हे सगळं अनुभवणं कदाचीत राहूनच गेलं... असेल.... किमान नवीन पीढ़ीला सेंड करा.... वारसा, वहीवाट, चालीरीती, इतिहास जिवंत राहील.! लेखक : अज्ञात

ह्रदय स्पर्शी लेखन... अगदी अनुभवलेलं.. 💖🙏

शाळेच्या सुट्टीतले आपल्या गावातील दिवस खरंच अविस्मरणीय... गावात लग्न कुणाचही असेना.. आळीतल्या पोरांसोबत पहिल्या पंगतीतला पाहुणचार घेतलाय बरं.. 😂

अगदी जिवंत अनुभव या लेखणीतला.... आपली परंपरा - रितरीवाज - रुढी यांना असलेली भावनिक जोड अन् गरीब शेतकरी बापाचं आयुष्य भराच्या पोटतिडकीतुन केलेलं अन्नदान त्या मीठ मिश्रीत जेवणाला ही गोडवां आणत होतं..! 👍

धन्यवाद आणि सप्रेम नमस्कार या दर्दी लेखकास.. एक दिशादर्शक लेख... गावाकडल्या गोष्टी या शिर्षकास..! @ उमेश सदाशिव पवार, मार्शल विधानभवन मुंबई

✍️...  जरा याद करो कुरबानी..! 😥    "रेझांग ला ची लढाई" (Battle of Rezang La )"शेवटचा माणूस आणि शेवटच्या गोळी"  पर्यंत चा...
23/11/2021

✍️... जरा याद करो कुरबानी..! 😥

"रेझांग ला ची लढाई" (Battle of Rezang La )
"शेवटचा माणूस आणि शेवटच्या गोळी" पर्यंत चाललेली लढाई. (Battle till the Last Man and Last Bullet )

२१ नोव्हेंबर १९६२ या दिवशी चीन ने युध्दविरामची घोषणा केली. २० ऑक्टोबर १९६२ पासून सुरु झालेल्या या युद्धात चीनने भारताचा बराच भूभाग बळकावला होता. जसे कि सर्वानी ऐकले असेल की हे युद्ध चीनने जिंकले होते. परंतु असे काय झाले कि २१ नोव्हेंबर ला चीनने एकाएकी युद्ध संपले म्हणून घोषित केले ?

याचं उत्तर होते ३ दिवस आधीच्या म्हणजेच १८ नोव्हेंबर १९६२ ला झालेल्या रेझांग खिंडी च्या लढाईत. हि लढाई म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या मोजक्या अविश्वसनीय लढायांपैकी एक. जगभरातील सैनिकांना प्रेरणा देणारी हि लढाई म्हणजे प्रत्येक भारतीयांसाठी एक गौरव.

ठिकाण : रेझांग ला, १८००० फूट उंचीवरील दक्षिण लडाख मधील एक खिंड.

महत्व : दक्षिण लडाखचे प्रवेशद्वार. रेझांग ला वर नियंत्रण म्हणजे लडाख वर नियंत्रण. चुशुल मधील Airforce च्या airfield वर ताबा.

म्हणूनच चुशुल च्या संरक्षणासाठी, रेझांग ला मध्ये शेवटच्या चौकीची जबाबदारी होती 'मेजर शैतान सिंग' आणि १३ कुमाऊ रेजिमेंट च्या १२० जवानांवर. हे १२० जवान म्हणजे हरियाणा मधील अहिरगढ चे "वीर अहिर" उंच, दणकट शरीरयष्टी असलेले. या जवानांकडे अत्यंत मोजका दारुगोळा आणि साधारण बंदुक ज्या कि दुसऱ्या महायुद्धानंतर कुचकामी म्हणून गणल्या गेल्या होत्या.

"मृत्यूचे तांडव"

१८ नोव्हेंबर १९६२ , चुशुल मध्ये होत असलेल्या सततच्या हिमवृष्टीमुळे सर्वत्र बर्फाची चादर पसरली होती. पहाटे ३:३० वाजता चिनी आर्मीच्या ५०००-६००० सैनिकांनी रेझांग ला वर अचानक हल्ला केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मेजर शैतान सिंग यांनी आर्मी मुख्यालयाशी संपर्क केला , अतिरिक्त सैन्य कुमक आणि दारुगोळा ची मागणी केली. परंतु समोरून उत्तर मिळाले कि " हिमवृष्टी आणि पर्वतीय बाधेमुळे ताबडतोब मदत पाठवणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या चार्ली कंपनीला घेऊन मागे येऊ शकता, निर्णय तुम्हाला घ्यायचाय , over and out."

मेजर शैतान सिंग यांनी सर्व जवानांना परिस्थितीची जाणीव दिली आणि सांगितले जो कुणी मागे जाण्यास इच्छुक असेल त्याने जावे, परंतु मी पोस्ट सोडणार नाही. मागे हटतील ते अहिर कसले. एकही जवान मागे जाण्यास तयार नव्हता . सर्वानी गगनभेदी युद्धघोष केला " कालिका माता कि जय " आणि सुरु झाली हि ऐतेहासिक लढाई. शैतान सिंग यांनी योजना आखून छोट्या तुकडी तयार केल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना नेमले. चिनी सैनिकांनी एकामागून एक असे ५-६ हल्ले केले. प्रत्येक वेळे ७००-८०० सैनिक चाल करून येत.

स्वतः मेजर शैतान सिंग एका पोस्टवरून दुसरीकडे धावत जाऊन सैनिकांना निर्देश देत आणि त्यांचे मानोबल वाढवत होते. परंतु त्यांच्या जवळील दारुगोळा संपत आला. समोरून येणाऱ्या चिनी सैनिकांवर हे वीर अहिर तुटून पडले गोळ्या संपल्या तर बंदुकीच्या बट ने डोके उडवू लागले. कुणी दोन्ही हातानी चिन्यांची डोकी दगडावर आदळू लागले. अशातच मेजर शैतान सिंग गंभीर जखमी झाले. त्यांना रामचंद्र यादव या जवानाने एका आडोशाला नेले. शैतान सिंग यांनी त्या जवानाला खाली कंपनी मुख्यालय कडे जाण्याची ऑर्डर दिली. खाली जाऊन सर्वाना १३ कुमाऊ च्या " वीर अहिरांच्या" या अतुलनीय पराक्रमाची कल्पना देण्यास सांगितले.

पहाटे ३:३० ते सकाळी ८-९ पर्यंत चाललेल्या या लढाईत भारताच्या १२० पैकी ११४ जवानांनी सर्वोच बलिदान दिले. पाच जवान युद्धकैदी झाले व नंतर त्यांची सुटका झाली. त्या रात्री चीनने १३०० हुन अधिक सैनिक गमावले. (काही स्रोतांनुसार १८३६ चिनी सैनिक मारले गेले) रेझांग ला मध्ये चिनी सैनिकांच्या शवांचा खच पडला होता. मेजर शैतान सिंग यांनी केलेल्या या मृत्यूच्या तांडवामुळे चीन पुरता बिथरला होता. म्हणूनच पुढे २१ नोव्हेंबर १९६२ ला युद्धविराम ची घोषणा केली.

पुढे २-३ महिन्यांनी हिवाळा संपला आणि सैनिकांच्या शरीराचा शोध सुरु झाला. तेव्हा बर्फाच्छादित रेझांग ला च्या त्या रात्रीच्या थराराची कल्पना आली. भारतीय जवानांच्या सर्व शरीरात गोळ्या लागलेल्या होत्या तरीदेखील हातात बंदूक होत्या, कुणी गंभीर जखमी असून देखील हातात ग्रेनेड धरलेल्या अवस्थेत होते. अशातच एका आडोश्याला आढळले एक पार्थिव, हातात , पोटात गोळ्या लागलेल्या, पायाच्या अंगठ्याला एक दोरी बांधलेली आणि त्या दोरीचे दुसरे टोक मशिनगन च्या ट्रिगर ला बांधलेले, ते होते मेजर शैतान सिंग..! मरणोत्तर परमवीरचक्र ( सर्वोच्च सन्मान ) ने सन्मानित.

आज त्यांच्या त्या उच्चकोटीच्या पराक्रमाचा स्मृतिदिन . या अमर हुतात्म्यांची हि वीरगाथा आठवून त्यांना वाहिलेली हि श्रद्धांजली. 🌸 जय हिंद - अमर जवान अहिर.. 💖🙏

✍️...        महाराष्ट्र पोलीस - वर्दीतला माणूस    ट्राफीक पोलीस :-सिग्नल जवळ उभ्या असलेल्या पोलिसांना बघुन बरीच मंडळी बग...
18/11/2021

✍️... महाराष्ट्र पोलीस - वर्दीतला माणूस

ट्राफीक पोलीस :-सिग्नल जवळ उभ्या असलेल्या पोलिसांना बघुन बरीच मंडळी बगळा, मामा, रिशवतखोर आशा उपमा देऊन हसत आसतात.

मित्रांनो जरा डोळे बंद करून त्यांच्या जागी स्वतःला ठेवून बघा तुम्हाला समजेल कि आठ तास एक जागी उभे आसणे काय आसते ?

हजारो वेगवेगळ्या प्रवृत्तींना तोंड देणे काय असते? गाडयांचा, हाॅर्नचा कर्कश आवाज तसेच धुळ सोसणे काय आसते? कट मारुन जाणाऱ्या प्रवृत्तीची कशी चीड येते? सिग्नल तोडून एखादा पुढारी कसा आव आणतो..!

ट्रिपल शिट बसून शेंबडी पोर शिव्या देऊन पळतात तेव्हा मनस्थिती कशी असते, आणि हे सर्व सोसत आसताना घरच्या आठवणीनां जागा सुद्धा नसते, कामाची चिडचिड स्वभावात आल्यामुळे कुटुंबाची वाताहत होते. .

हे सगळ डोळे उघडल्यावर तुम्ही निमुटपणे सोसु शकलात तर तुम्हाला पोलिसांवर हसण्याचा अधिकार आहे आणि त्यांच्या लाचखोरीबद्दल बोलायचच तर आपल्यापैकी एकही व्यक्ती नसेल कि ज्याने गाडी पकडल्या नंतर पोलीसांना ऑफर केली नसेल, गाडी पकडली कि आपण बकरी सारखे शरण जाऊन साहेब घ्या मिटवून म्हणतो मग त्यांच्या हया लाचखोरीला जबाबदार कोण..?

माझे वडील सांगतात पुर्वीच्या पोलिसांना खूप मान असायचा आणि सामान्य माणसाला त्यांची आदरयुक्त भिती वाटायची.

मित्रांनो माणूस नोकरीत व्यवसायात दोन गोष्टी शोधत असतो पैसा आणि सन्मान. तुटपुंज्या पगारावर आपले पोलीस नोकरी करत आहेत आणि सन्मान आपण त्यांचा हिरावून घेतला आहे आणि आपण त्यांच्या कडून १००% प्रामाणिकपणाची अपेक्षा करतो..!

आपण सुजाण नागरिक आहात पोलिसांना सहकार्य करा..!
पोलीस ही मानव निर्मीत शक्ती आहे ह्या शक्तीबद्दल आदरयुक्त भिती तयार झाली तरच येणाऱ्या काळात देशाची अंतर्गत सुरक्षा सक्षम राहील..! धन्यवाद 💖🙏 @ उमेश सदाशिव पवार

✍️...    वासुदेव नुकताच अमेरीकेवरुन घरी आला होता. सकाळच्या वेळी वासुदेव नास्ता करायला बसत होता. आईने कुतूहलाने त्याला वि...
07/11/2021

✍️...

वासुदेव नुकताच अमेरीकेवरुन घरी आला होता. सकाळच्या वेळी वासुदेव नास्ता करायला बसत होता. आईने कुतूहलाने त्याला विचारले "तु अमेरिकेत नेमका करतोस तरी काय?"

वासुदेव म्हणाला "आई तु डार्विनचं नाव ऐकलस का? नसशिल ऐकललं, मी एक जेनेटिक इंजिनीअर आहे. त्याच डार्विनच्या मानवाच्या उत्क्रांतीच्या थेओरीवर मी काम करतोय."

आई त्याच्या जवळ येवून बसली आणी त्याला म्हणाली "अरे डार्विनची उत्क्रांतीची थिअरी तर नवी आहे. तु त्याहुन जुन्या थिअरी वर काम का नाही करत?'

वासु विचारात पडला त्याला प्रश्न पडला की आता त्याहून जुनी थिअरी कुठली?

आई बोलत होती "तुला विष्णुचे दशावतार माहित आहेत का रे?"

वासुदेव ने डोक नाही म्हणून हलवल......

'नाहीना मग आता ऐक"* आई म्हणाली.

"पहीला अवतार--मत्स्य--म्हणजे मासा.* जीवनाची सुरुवात पाण्यात झाली म्हणून मत्स्य अवतार ओळखला जातो.

दूसरा अवतार कूर्म म्हणजे कासव, जे दर्शवत की पाण्यातून सुरु झालेल जीवन जमिनीकडे जातय. यात पाणी आणि जमीन समान राहते"

"तिसरा अवतार वराह म्हणजे डुक्कर* ज्याचा अर्थ जमिनीवरील पाळीव प्राणी तसेच मोठ्या आकारचे भुचर जसे डायनासॉर सारखे प्राणी जन्माला आले. यात पाण्यात कमी आणि जमीनवर वावर जास्त'

"चौथा अवतार होता नरसिंहाचा ज्याचा अर्थ अर्धा प्राणी आणी अर्धा मनुष्य म्हणजेच प्राण्यां पासुन मानवाकडे वाटचाल सुरु झाली. यात पाणी पिण्यापुरतंच. मनुष्य हा प्राण्यासारखा पण जास्त बुद्धिमान"

"पाचवा अवतार--वामन जो उंचीने छोटा ब्राम्हण होता पण तो मोठा होउ शकत होता* त्याने पूर्ण पृथ्वी व्यापली होती. जुन्या काळातही असेच दोन गट होते Homo Sapiens आणि Homo Erectus असच एकदा त्या दोघांच युद्ध झाल आणि ती लढाई Homo Sapiens नी जिंकली" "का माहीती आहे का जिंकली....?कारण ते उंचीने व बुद्धीने मोठे होते म्हणून जसा वामन होता."

आई पण कथेत दंग झाली होती. वासुदेव अवाक व स्तब्ध होवून ऐकत होता.

"सहावा अवतार परशुराम जो कुऱ्हाड धारण केलेला जंगलात राहणारा शिघ्रकोपी तपस्वी पुरुष होता. जसा अष्मयुगातील जंगलात एकटा राहणारा प्राण्याची कात धारण केलेला मानव होता. जंगलाची कास धरून मानव मोठा होत होता"

"सातवा अवतार राम म्हणजे बुद्धिवंत राजा* ज्याने जगाला जगण्याचे कायदे व नात्याचे महत्व सांगितले. तत्सम अष्मयुगीन मानवही कुटुंब परिवार व गट करून राहु लागला होता त्याला सोबत राहण्याच महत्व कळाल होतं"

"आठवा अवतार कृष्ण जो एक उत्तम मित्र, गुरु, मार्गदर्शक, प्रियकर व राजा होता. त्याने जगाशी खेळ खेळून प्रेम व युद्ध याच ज्ञान दिलं. जीवन जगण्याची कला दिली त्यालाच आपण भगवदगीता म्हणतो. तोच मानव शिक्षण घेऊ लागला त्याला शिक्षण म्हणजे काय कळले. वेगवेगळे विद्यापीठ स्थापन झालेत. मनुष्य प्राणी शिकु व शिकवु लागला."

"नववा अवतार बौद्ध जिथे एकीकडे नरसिंहासारखा हिंस्र मानव होता तिथे सत्य, अहींसा, सदाचाराचे संदेश देणारे, जगाला मोक्षाचे महत्व सांगणारे बौद्ध पण जन्माला आलेत. म्हणजेच ताम्रयुगानंतर थोर संत विचारवंत जन्माला आलेत ज्यांनी जगाच्या चाली रिती बदलल्यात."

आई एवढ बोलून थांबली आणि दहावा ?" वासुदेवने कुतुहलाने विचारले.

आई हसत म्हणाली "अरे दहावा अवतार म्हणजे कल्कि जो मनुष्याचा जेनेटिक मधे बदल केलेली आवृत्ति आहे ज्यावर तुम्ही अभ्यास करत आहात...."

"हा दृष्टिकोन तू कुठून आणला आई?"

विज्ञान आणी धर्माला आम्ही अशाच नजरेने बघतो.. आई न्याहारी देत हसून म्हणाली..🌿🙏

माणसाने नेहेमी विज्ञानासह अध्यात्मिक तेची कास धरावी. अध्यात्म समजण्यास कठीण आहे पण ते ज्याला समजले त्याने जग जिंकले... धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी 🌸🙏

✍️...                💖   वेळ... परत फिरण्याची  💖    आपण आयुष्याची ४०/५० वर्षे पूर्ण केली असल्यास,“परत फिरण्याची” तयारी स...
19/10/2021

✍️...

💖 वेळ... परत फिरण्याची 💖

आपण आयुष्याची ४०/५० वर्षे पूर्ण केली असल्यास,
“परत फिरण्याची” तयारी सुरू करा..! हे सर्व केव्हा करायचं तर आपल्याकडे असलेल्या, जमा केलेल्या सर्व गोष्टी आपल्यासाठी निरुपयोगी होण्या अगोदर ! का आणि कुठे परत फिरावे आणि कसे परत फिरावे ? जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि परत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी मला टॉल्स्टॉयची प्रसिद्ध कथा आठवते..! ते आपणास सांगतो.

🌸 परत येणे ..... कधीच सोपे नसते 🌸

एक व्यक्ती आपल्या राज्याच्या राजाकडे गेला. राजा समोर जाताच म्हणाला, "मी गरीब आहे, माझ्याकडे काहीही नाही, मला मदतीची आवश्यकता आहे." राजा दयाळू होता. त्याने विचारले. आपल्याला कोणत्या मदतीची आवश्यकता आहे?"

त्यावर माणूस म्हणाला. "कसायला थोडी जमीन द्या."
राजा म्हणाला: "उद्या सकाळी सूर्योदयानंतर ये. तू जेवढे चालू शकशील, जेवढे धावू शकशील, तेवढी संपूर्ण जमीन तुला देण्यात येईल. परंतु एक लक्षात ठेव, तू ज्या ठिकाणाहून धावणे सुरू करशील, त्याच ठिकाणी सूर्यास्तापर्यंत तुला परत यावे लागेल, अन्यथा काहीही मिळणार नाही..!"

माणूस खूश झाला. सकाळी राजासमोर हजर झाला. अन् तो सूर्योदय होताच पळायला लागला .. पळत राहिला. सूर्य‌ माथ्यावर चढला होता. पण त्या माणसाने धावायचं थांबवले नाही अजून थोडी मेहनत, मग संपूर्ण आयुष्यभर विश्रांती..! संध्याकाळ होणार होती आणि त्या माणसाला आठवलं, आपल्याला परत ज्या ठिकाणाहून आलो आहे. तेथे सूर्यास्ता अगोदर पोहचायचे आहे, नाहीतर आपल्याला काही मिळणार नाही.

त्याने मागे वळून पाहिले तेव्हा आपण खूप दूर आलो आहे.. हे जाणवले. आता आपल्याला परत पोहचायला हवे..! आकाशातील सूर्य पश्चिमेकडे वळला होता, तो व्यक्ती थकला होता. पण वेळ वेगाने निघून जात होती. आराम करता येत नव्हता.अजून थोडी मेहनत..! न थांबता तो पूर्ण वेगाने धावू लागला.. पण त्या व्यक्तीला आता श्वास घेणंही कठीण झालं होतं. तो खाली पडला आणि अखेर त्याने शेवटचा श्वास सोडला..!

राजा हे सर्व पहात होता. तो त्याच्या सहकाऱ्यांसह तिथे पोहोचला. त्याने काळजीपूर्वक त्या मृतदेहाकडे पाहिले आणि म्हणाला, याला फक्त सात फूट जमीन हवी होती. बिचारा काही कारण नसताना इतका पळत होता..! शेवटी त्या व्यक्तीच्या हाती काहीच लागले नाही. रिकाम्या हाताने आला होता. रिकाम्या हातानेच गेला..!

आता आपण त्या माणसाच्या जागी स्वत: ला ठेवून विचार करा. आपण पण तीच चूक तर करीत नाही ना ? आपल्या गरजा मर्यादित आहेत, परंतु आपल्या इच्छा अफाट आहेत..! आपण जास्त मिळवण्याच्या मोहात परत येण्याची तयारी करत नाही आणि जेव्हा आपण तसा प्रयत्न करतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो. आपल्याकडे काहीही वेळ ना काळ शिल्लक रहात. मोहापोटी आपण पूर्ण सर्वस्व गमावून बसतो.

मी जीवनाच्या शर्यतीत सामील होतो.. आजपर्यंत मी कुठे पोहचलो..? मला कुठे जायचे आहे आणि मला किती दिवसात पोहोचायचे आहे..? जर मी असेच चालत राहिलो तर मी कोठे व किती काळात पोहोचेल..? हे सगळे प्रश्न एकदा निवांतपणे स्वत:ला विचारुन बघा..! संपत्ती जरूर कमवा पण संध्याकाळी आपल्या जागेवर नक्की पोहचा..!

सूर्यास्ताची वेळ लक्षात घेतल्याशिवाय आपण सर्व जण पळत आहोत. अभिमन्यूलाही परत जाण्याविषयी माहिती नव्हती. आपण सर्व अभिमन्यूच आहोत. आपल्यालाही कसे परत फिरावे हे माहित नाही. एक मात्र लक्षात ठेवा आपल्याला एक न एक दिवस हे सर्व काही सोडून जायचे आहे. तेव्हा थोडं थांबा, आजूबाजुला पहा. धावता धावता प्रवासाचा आनंद लुटायचं राहुन गेलंय याची खंत आयुष्यभर राहून जाईल. किमान आज या एका क्षणापुरतं खूश व्हा..!

म्हणून सांगतो मित्रानो, साधेपणाने जगा. सर्वांशी प्रेमाने वागा. एकमेकांचा आदर करा.. सर्वांची काळजी घ्या.. सर्वांच्या नेहमी संपर्कात रहा.. सुरक्षित रहा..! मिञ- नातेसंबंध सुधारा 🙏

✍️..                 तुमच्या दुकानात देव मिळेल कां..?     पाच वर्षांचा एक छोटा मुलगा हातात एक रुपया घेऊन एका  किराणा दुक...
11/09/2021

✍️..

तुमच्या दुकानात देव मिळेल कां..?

पाच वर्षांचा एक छोटा मुलगा हातात एक रुपया घेऊन एका किराणा दुकानात जाऊन ऊभा राहिला.

दुकानदाराने त्या मुलास विचारले बाळा काय हवं तुला..!

त्या मुलाने दुकानदारास विचारले तुमच्या दुकानात देव मिळेल का..?

हे ऐकून दुकानदार संतापला आणि त्या मुलावर जोराने ओरडून त्याने त्या मुलाला दुकानातून हाकलून दिले.

तो मुलगा दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, असे करत करत ३० - ४० दुकाने फिरला.

प्रत्येक दुकाना समोर जाऊन एकच विचारायचा तुमच्या दुकानात देव मिळेल का?

शेवटच्या दुकानात एक म्हातारे आजोबा बसले होते, त्यांना पाहून ह्या लहान मुलाने विचारले, बाबा तुमच्या दुकानात देव मिळेल का?

त्या आजोबांनी विचारले बाळा तुझ्याकडे किती पैसे आहेत?

मुलाने प्रांजळपणाने सांगितले एक रुपया आहे माझ्याकडे. त्यांनी मुलाला जवळ घेत विचारले, बाळा तुला कशाला देव हवा आहे? तु देव विकत घेऊन करणार काय ?

प्रश्न ऐकून मुलाला खूप बरं वाटले. त्याच्या अशा पल्लवीत झाल्या, बाबा असे विचारतात म्हणजे नक्कीच यांच्या दुकानात देव असणार आहे.

तो म्हणाला ह्या जगात मला माझ्या आई शिवाय कोणीच नाही. रोज माझी आई कामाला जाते आणि माझ्यासाठी जेवण घेऊन येते. पण काल पासून ती हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. जर उद्या माझी आई मेली तर मला जेवण कोण देणार?*
डॉक्टर म्हणाले की आता फक्त देवच तुझ्या आईला वाचवू शकतो. म्हणून मी देव शोधतो आहे बाबा.

आहे ना तुमच्या दुकानांत देव..?

दुकानदाराने त्या मुलाला विचारले किती पैसे आहेत तुझ्याकडे..?

फक्त एक रुपया आहे बाबा..!

बरं, नको काळजी करू, एक रुपयात देखील देव भेटेल..!

दुकानदाराने तो एक रुपया घेतला आणि एक ग्लास फिल्टरचें पाणी त्या मुलाच्या हातात दिले आणि म्हणाला की हे पाणी घेऊन जा आणि तुझ्या आईला पाज. हे पाणी प्यायला दिले की आई तुझी ठीक होईल..!

दुसऱ्या दिवशी एक स्पेशालिस्ट डॉक्टर हॉस्पिटल मध्ये आले आणि आईचें ऑपरेशन झाले. कांही दिवसात ती ठीक ही झाली..!

डीस्चार्ज च्या दिवशी हॉस्पिटलचें बिल बघून ती बाई चक्रावली! पण डॉक्टर धीर देत म्हणाले. काळजी करू नका. एका वयस्कर व्यक्तीने हे सर्व बिल भरले आहे आणि सोबतच एक चिट्टीही ठेवली आहे..!

चिठ्ठी उघडून वाचताच, माझे धन्यवाद मानू नकोस, तुला वाचवले ते परमेश्वरानेच. मी फक्त निमित्त होतो. तुला धन्यवाद द्यायचेच असतील तर आपल्या छोट्या अज्ञान बाळाला दे, जे बाळ एक रुपया घेऊन देव शोधत फिरत होते..!

यालाच म्हणतात विश्वास..! देवाला शोधण्यासाठी करोडो रुपये दान करावे नाही लागत..! श्रद्धा, भाव, विश्वास असला की एक रुपयातही देव मिळतो..! 💖🙏

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

तात्पर्य: भक्ती साधी भोळी असू दे. फक्त मनापासुन नामस्मरण केले की देव कोणत्या न कोणत्या रूपात येऊन नक्की मदत करतो..! लेखन : अनामिक, माध्यम WHAT'S APP

✍️...  साबणाचे पत्र...       प्रिय निरमा ताईस सप्रेम नमस्कार विनंती विशेष 💖🙏    पत्र लिहिण्यास कारण कि, बरेच दिवस झाले त...
19/08/2021

✍️... साबणाचे पत्र...

प्रिय निरमा ताईस सप्रेम नमस्कार विनंती विशेष 💖🙏

पत्र लिहिण्यास कारण कि, बरेच दिवस झाले तुझे पत्र नाही, इकडे लाईफबाॅय लंडन हून परत आला आहे. त्याने स्वतः चे नाव बदलून लाईफबाॅय प्लस केल्याने सन लाईट आणि त्याचे भांडण झाले आहे..!

भांडण सोडवण्यासाठी फेयर ग्लोव मधे पडलं त्यामुळे त्यालाही मार पडला..! त्याला लगेचच डॉक्टर डेटोल कडे नेण्यात आले. आनंदाची बातमी म्हणजे लक्स आणि पीयर्स चे लग्न ठरले आहे.

हमाम काका आणि गोदरेज काका लग्नाची तयारी करत
आहे. आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे रेक्सोना वाहिनीला जुळ्या मुली झाल्या आहे एकीचे नाव कॅमे क्लासिक तर दुसरीचे कॅमे न्याचरल ठेवण्यात आले आहे.

संतूर तिलाही मुलगा झाला. पामोलिव्ह मामाची तब्येत मध्यंतरी बरी नव्हती. तसेच मोतीकाकांच्या मुलाचे लग्न शिकेकाईशी झाले. लग्न समारंभाला सर्व साबण परिवार उपस्थित होतं.

ससा भटजींनीच लग्न लावले, व्हील बाईंनी कपड्यांची व्यवस्था केली. मेडीमिक्स ने सर्वांना वाढले तर विमबार ने भांडी घासली. पोंडस आणि जोन्सन आता शाळेत जाऊ लागले आहे. सर्फ मावशीची तब्येत कशी आहे पत्र लिहून कळवणे. 🙏

तुझा,
सिंथोल........!

✍️...             माझ्या आईने काय म्हटले असते.. ?    केनियाचा जगप्रसिद्ध धावपटु अबेल मुताई ॲालेम्पिक स्पर्धेत शेवटच्या र...
29/07/2021

✍️...
माझ्या आईने काय म्हटले असते.. ?

केनियाचा जगप्रसिद्ध धावपटु अबेल मुताई ॲालेम्पिक स्पर्धेत शेवटच्या राउंड मधे धावतांना अंतिम रेषेपासुन फक्त काही मिटर दुर होता, त्याचे सर्व प्रतिस्पर्धी मागे होते,सुवर्ण पदक जिंकल्यातच जमा होते,सर्व प्रेक्षक त्याच्या नावांचा जल्लोष करीत होते, येवढ्यातच तो गैरसमजातून अंतिम रेषा समज़ुन रेषेच्या एक मिटर आधीच थांबला.

त्याच्या मागुन येणाऱ्या स्पेनच्या इव्हान फर्नांडीसच्या लक्षात आले की, चिन्ह न समजल्या मुळे तो थांबला आहे. त्याने ओरडुन अबेल ला पुढे जाण्यास सांगितले पण स्पॅनिश समजत नसल्याने तो हलला नाही शेवटी इव्हान ने त्याला ढकलुन अंतिम रेषे पर्यंत पोचविले, त्यामुळे अबेल पहिला व इव्हान दुसरा आला.

पत्रकारांनी इव्हानला विचारले की तु असे का केलेस ? तुला संधी असतांना तु पहिला क्रमांक का घालवलास ? इव्हान ने सांगितले माझे स्वप्न आहे की एक दिवस आम्ही अशी मानव जात बनु जी एकमेकांना मदत करेल. आणि मी पहिला क्रमांक घालविला नाही.

रिपोर्टर पुन्हा म्हणाला,पण तु केनियन स्पर्धकाला ढकलुन पुढे आणलेस ? यांवर इव्हान म्हणाला, तो पहिला आलेलाच होता ही रेस त्याचीच होती..! पण रिपोर्टर पुन्हा म्हणाला, पण तु सुवर्ण पदक जिंकु शकला असतास..!

इव्हान म्हणाला, त्या जिंकण्याला काय अर्थ होता ? माझ्या मेडलला मान मिळाला नसतां..! माझी आई काय म्हणाली असती ? संस्कार हे पिढी दर पिढी पुढे पुढे जात असतात. मी पुढच्या पिढ्यांना काय दिले असते ?

दुस-याच्या दुर्बलतेचा किंवा अज्ञानाचा फायदा न घेता त्यांना मदत करण्याची शिकवण माझ्या आईनी मला दिली आहे.

🙏💖 धन्य ती माऊली आणि धन्य तिचे लेकरु 💖🙏

✍️... वास्तव ( सत्य की आभास )     रात्रीचे ९ वाजले होते महेशला त्याच दुकान बंद करायचं होत पण तो वाट पाहत होता एका बाईची....
28/07/2021

✍️... वास्तव ( सत्य की आभास )

रात्रीचे ९ वाजले होते महेशला त्याच दुकान बंद करायचं होत पण तो वाट पाहत होता एका बाईची..! काय बरं नाव होतं तिचं..? महेशने कधी तीच नाव विचारलं नाही.

काही दिवसांपूर्वीच महेशने एक शॉप सुरु केलं होतं तसं ते जास्त मोठं नव्हतं, लहानच होतं त्यात फक्त त्याने काही बेकरीचे पदार्थ आणि मिठाई ठेवली होती. त्या दिवशी त्याने त्या दुकानचं उद्घाटन केलं आणि पहिलीच गिऱ्हाईक म्हणून एक बाई त्याच्या दुकानात आली. तिच्या कडेवर एक लहान पण खूप गोंडस बाळ होतं. मग तिने एक दुधाची बाटली घेतली आणि महेशला म्हणाली ," दादा,आता माझ्याजवळ १० च रुपये आहेत रे बाकीचे तुला उद्या दिले तर चालतील का?" महेशने एकवार
तिच्याकडे पाहिले, गरीब होती बिचारी, कपाळावर कुंकू न्हवतं
ना गळ्यात मंगळसूत्र कदाचित तिचा नवरा जिवंत नसेल असा अंदाज त्याने लावला.

साडीला तर अक्षरश: अनेक ठिकाणी ठीगळं लावलेली होती आणि कपाळावरून घामाचे थेंब वाहत होते. मग महेशची नजर तिच्या कडेवरच्या त्या लहान सावळ्याश्या निरागस बाळाकडे गेली. त्याच्या त्या मलूल चेहऱ्यावर पण त्याचं ते निरागस हास्य किती सुंदर दिसत होतं. हसल्यावर त्याच्या तोंडातून नुकतेच उगवलेले दोन दात लुकलुकत होते. त्यामुळे ते बाळ आणखीच गोजीरवाणं दिसत होतं.

मग महेश त्या बाईकडे पाहत म्हणाला,"ताई काही हरकत
नाही, तुम्ही उद्या पैसे दिले तरी चालतील मला " त्या बाईने
मोठ्या समाधानाने महेशकडे पहिले, आणि म्हणाली ," उद्या मी नक्की पैसे देईन तुम्हाला , इथे जवळच राहते मी समोर जी छोटी घरं आहेत न तिथल्या दुसर्या गल्लीत एक लहानघर आहे माझं " मग महेश हसत बोलला,"अहो ताई काही हरकत नाहीये
माझी तुम्ही या उद्या "आणि मग ती तिथून निघून गेली.

दुसऱ्या दिवशी ती बाई आली आणि तिने पैसे महेशच्या हातात दिले, महेश ते पैसे तिला परत करत म्हणाला ,"ताई पैसे नाही घेणार मी तुमच्याकडून काल तुमच्या हातून माझी पहिली बोहनी झाली आणि मला काल १००० रुपयांचा फायदा झाला ." हे ऐकून त्या बाईलाही खूप आनंद झाला.

कारण बर्याच दिवसांनी तिच्या पायगुनाच कोणीतरी कौतुक करत होत. नाहीतरी तिच्या नवऱ्याच्या मृत्युनंतर तिच्या सासूने
तिला "पांढऱ्या पायाची " म्हणून तिला घरातून हाकलून लावलं होतं . ती म्हणाली ," दादा , रात्री किती वाजेपर्यंत दुकान चालू असत तुमचं ?" महेश म्हणाल,"रात्री ८ वाजता दुकान बंद करतो मी ताई " हे ऐकून त्या बाईचा चेहराच उतरला .महेशने हे लगेच ओळखलं आणि तिला विचारलं ," काय झालं ताई..? काही अडचण आहे का?"

ती बाई म्हणाली ,"दादा या बाळासाठी आणि स्व:तासाठी दोन घरची धुणीभांडी आणि मोलमजुरी करते. मी रात्री साडेआठ वाजतात मला घरी यायला तो पर्यंत इथली सगळी दुकानं बंद झालेली असतात. माझ्या बाळाला तसंच रडत रडत रात्री उपाशी पोटी झोपावं लागतं. बोलता येत नाहीनं त्याला याचाच गैरफायदा घेते मी आणि बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला नी तिचे डोळे पाणावले.

महेशला ही हे ऐकून खूप वाईट वाटलं मग तो तिला म्हणाला , "काही काळजी करू नका ताई तुम्हाला दुधाची बाटली दिल्या शिवाय दुकान नाही बंद करणार मी पण एक अट आहे " त्या बाईने डोळे पुसत त्याच्याकडे पाहत विचारले ,"काय अट आहे " मग महेश म्हणाला ,"तुम्ही मला दुधाचे पैसेद्यायचे नाहीत " हे ऐकून त्या बाईला पुन्हा गहिवरून आले, पण ह्या वेळी तिच्या डोळ्यातले अश्रू हे दु:खाचे नसून आनंदाचे होते.

आज तिला माणसाच्या रुपात देव भेटल्यासारखे वाटत होते. त्या दिवसापसुन रोज रात्री ती बाई या दुकानात यायची आणि दुधाची बाटली घेऊन जायची , असे करता करता सहा महिने उलटून गेले होते. पण रोजच्या काबाडकष्टामुळे ती गरीब बाई हळू हळू आजारी पडू लागली होती, हळू हळू तिचे शरीर आणखीनच कृश बनत चालले होते. त्या दिवशीही महेश असाच दुकान आवरून तिच्या येण्याची वाट पाहत होता.

घड्याळात तर ९.३० वाजले होते, इतक्यात ती बाई महेशच्या दुकानात आली महेशने लगेच फ्रीज उघडून दुधाची एक बाटली काढून तिच्या हातात दिली, आज तिचा चेहरा खूपच निर्जीव वाटत होता. आजारपणामुळे डोळ्यां खालील काळे घेरे खूपच वाढलेले होते. बाटली देवून महेश फ्रीजचे दार बंद करण्यासाठी मागे वळत तिला म्हणाला ,"काय ताई आज खूपच उशीर केला यायला तुम्ही " आणि दर बंद करून त्याने मागे वळून समोर पहिले तर समोर कोणाच न्हवते त्याला वाटले आज उशीर झाल्यामुळे घाईगडबडीत लवकर निघून गेली असेल, आणि मग त्याने आपले दुकान बंद केले आणि तो घरी निघून गेला दुसर्या दिवशी ठीक आठ वाजता ती बाई पुन्हा आली आणि येवून फक्त उभी राहिली मग नेहमीप्रमाणे महेशने तिला फ्रीज मधून दुधाची बाटली काढून टेबलवर ठेवली.

इतक्यात काहीतरी वस्तू खाली पडली म्हणून ती उचलायला तो खाली वाकला आणि परत उभा राहून पुढे पाहतो तर त्याच्या लक्षात आलं कि दुधाची बाटली घेऊन ती बाई निघून गेली होती पण का कुणास ठाऊक महेशला त्या दिवशी तिचा चेहरा बघवत न्हवता , खूपच अशक्त झाली होती ती बाई... तिसऱ्या दिवशी पुन्हा ती बाई ठीक ८ वाजता आली आणि दुधाची बाटली घेऊन निघूनही गेली.

महेशने आजी तिचा चेहरा जर निरखून पहिला तर तिचा चेहरा पांढराफट् पडला होता तिच्या चेहर्यावरच तेजतर केव्हाच नाहीसं झाल होतं. महेशला कळून चुकल कि ती बाई खूपच आजारी आणि पैसे नसल्याने ती डॉक्टरकडे गेली नसणार त्याने लगेच आपल दुकान बंद केलं आणि घरी निघून आला मग त्याने आपल्या बायकोला त्याबाईबद्दल सर्व हकीकत सांगितली.

महेशची बायकोसुद्धा अगदी त्याच्या सारखीच प्रेमळ स्वभावाची असल्याने ती त्याला म्हणाली ,"चला आपण तिच्या घरी जाऊन तिला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ व तिचा उपचार करू " महेशला तिचं बोलणं पटलं आणि तिचा अभिमानही वाटला कारण त्याचीही हीच इच्छा होती .मग तो आपल्या बायकोला घेऊन त्या बाईच्या घरी निघाला तिचा पत्ता त्याला अजूनही चांगलाच लक्षात होता.

मग ते दोघेही तिच्या घराजवळ आले तर तिथे आजूबाजूला दूर दूर पर्यंत कुणाचेच घर न्हवते नुसती एक लहानशी गल्ली मात्र तिथे होती मग त्या गल्लीतून पुढे गेले तर तिथे हि बाजूला कोणीच न्हवतं फक्त एक हलकासा घाणेरडा वास तिथे येत होता मग त्यांनी त्या बाईच्या घराचं दार ठोठावलं, पण दारावर थाप मारताच ते दर चटकन आत लोटलं गेलं मग ते दोघे आत गेले तसा त्या घाणेरड्या वासाच एक जोराचा भपका त्यांच्या नाकात शिरला..!

तसा दोघांनीही नाकाला रुमाल लावले , तरीही ते दोघे आणखी आत गेले आतमध्ये खूप अंधार होता आणि लहान बाळाच्या खेळण्याचा आवाज त्या अंधारातून येत होता महेशने चाचपडत कशी बशी त्या खोलीतली लाईट लावली. तर समोरचे ते भयानक दृश्य पाहून दोघांचेहीडोळे विस्फारले..!

दोघांनाही मोठा धक्का बसला . समोर ती गरीब बाई मरून
पडली होती आणि तिचे शरीर हळू हळू सडू लागले होते. तिच्याकडे पाहून वाटत होते कि ३ - ४ दिवसांपूर्वीच तिने जीव सोडला होता पण तिचे डोळे अजूनही बाजूला खेळत असलेल्या तिच्या लहान बाळालाच पाहत होते. तिचे डोळे एकदम निर्विकार झाले होते.

जणू रडून रडून तिच्या डोळ्यातले पाणीच आटून गेले असावे, त्या निर्जीव देहाचे ते निर्जीव डोळेमात्र सजीव असल्यासारखे त्या बाळाकडे एकटक पाहत होते आणि ते निरागस बाळ मात्र हसून आपल्या आईच्या डोळ्याकडे पाहत खेळत होते. त्या निरागस बाळाला तर हेही कळत न्हवतं कि,त्याच्या आईने केव्हाच आपले प्राण त्यागले आहेत.

बाजूलाच ३ रिकाम्या दुधाच्या बाटल्या पडलेल्या होत्या. जणू त्याला असा विश्वास वाटत होता कि त्याच्या आईने मेल्यानंतरही त्याला उपाशी राहू दिले नाही. ते दृश्य पाहून दोघांच्या अंगावर शहारे उभे राहिले. खरोखरच त्यावेळी ते दृश्य अगदी हृद् हेलावून टाकणारे होते.

महेशला तर विश्वासच बसत न्हवता कि गेले २-३ दिवस एका मेलेल्या आईचा आत्मा आपल्या बाळासाठी त्याच्याकडून
दुध घेऊनजात होता. मग महेशने त्या बाळाला उचललं आणि आपल्या बायकोच्या हातात सोपवलं तिनेही खूप प्रेमाने त्या बाळाला जवळ घेतलं. मग या दोघांनीही विधिवत त्या बाईच्या
शरीराचे अंत्यसंस्कार केले आणि त्या बाळाला दोघांनीही दत्तक
घेतलं.

महेशला आजही ह्या गोष्टीची जाणीव आहे कि त्या बाळाच्या आईचा आत्मा आजही त्याच्या बरोबरच राहतो. 💖🙏 @ ह्रदय - मनस्पर्शी.😰

Address

Thane
400607

Telephone

+919773396333

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मनस्पर्श posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मनस्पर्श:

Videos

Share

Category