शिवव्याख्यान...
वाटूळ (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) नुकत्याच झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनात शाहीर सौरभ कर्डे यांनी केलेल्या शिवव्याख्यानाचा व्हिडिओ पुढील लिंकवर... https://youtu.be/swhLW5Al1Bk
पुणे-दिल्ली प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रथमच 'मराठी साहित्ययात्री संमेलन'
विशेष रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे तर, डब्यांना गडकिल्ल्यांची नावे
मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत स्वागताध्यक्ष, शरद तांदळे अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्षपदी वैभव वाघ
सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या दिल्ली येथे होत असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रवासी साहित्य संमेलन भरवावे, या संकल्पनेतून 'मराठी साहित्ययात्री संमेलन' आयोजित करण्यात आले आहे. मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारे हे मराठीतील पहिलेच आणि जगातील सर्वात मोठे आणि दीर्घ साहित्य संमेलन असणार आहे.
साहित्यरसिकांना पुण्यातून दिल्लीला घेऊन जाणाऱ्या रेल्वेला महान सेनानी महादजी शिंद
'कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राचे उपकेंद्र रत्नागिरीत सुरू केल्याचे मला समाधान आहे. या केंद्रातून प्रशिक्षित झालेले विद्यार्थी लाखो जणांना प्रशिक्षण देतील, त्या वेळी या केंद्राची ताकद देशाला कळेल. हे क्षेत्रीय वैदिक संमेलन हिंदू संस्कृती, वेदांची परंपरा शिकविणारे आहे,' असे गौरवोद्गार राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री, तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी काढले.
रत्नागिरी उपकेंद्र आणि महर्षी उज्जैन येथील सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कालपासून क्षेत्रीय वैदिक संमेलन सुरू झाले आहे. आजच्या दुसऱ्या दिवशी पालकमंत्री डॉ. सामंत यांनी संमेलनाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कुलगुरू प्रा. हरेराम त्रिपाठी, उपकेंद्राचे
रत्नागिरी शहराच्या एकतानगर भागात गस्त सुरू असताना संशयास्पद हालचालींवरून रत्नागिरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तीन आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून ब्राउन हेरॉइन या अमली पदार्थाच्या ४०५ पुड्या आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल एक लाख ४५ हजार ७५० रुपयांचा आहे. त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थविरोधी कायद्याच्या कलमांतर्गत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी २९ ते ३८ वर्षं वयोगटातले असून, कर्ला, राजिवडा परिसरात राहणारे आहेत. रऊफ इक्बाल डोंगरकर, नझीर अहमद मोहम्मद वस्ता, राहील अजीज सुवर्णदुर्गकर अशी आरोपींची नावं आहेत. पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालच्या पथकाने ही कारवाई केली.
#NDPSAct
कोकण रेल्वेचं विद्युतीकरण १०० टक्के पूर्ण झालं असून, त्यामुळे प्रदूषण थांबलं आहे. कोकण रेल्वे ही आता हरित रेल्वे झाली आहे. डिझेलसाठीच्या खर्चात दर वर्षी १९० कोटी रुपयांची बचत होत आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी दिली. आज (तीन फेब्रुवारी) दुपारी रत्नागिरीत ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते. https://kokanmedia.in/2025/02/03/konkanrailwaygreenrailway/
मोबाइल टॉवरच्या बॅटरीज चोरणारी टोळी जेरबंद
रत्नागिरी शहर आणि पावस परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोबाइल टॉवरच्या बॅटरीज चोरीला जाण्याचे अनेक प्रकार घडले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी एक पथक स्थापन केलं. या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून चौघांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली असता त्यांनी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपी १९ ते २९ वर्षं वयोगटातले असून, रत्नागिरी परिसरातलेच आहेत. पाच गुन्ह्यांत त्यांनी चोरलेला मुद्देमाल, वापरलेली वाहनं आणि अन्य साहित्य असा सहा लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
#माघी_गणेशोत्सव #गणेशगुळे
रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील वाटूळ येथे दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरत आहे. संमेलनाच्या मुख्य दिवसाच्या पूर्वसंध्येला (३१ जानेवारी) मुचकुंदी नदीचे विधिवत पूजन करण्यात आले. या वेळी भारताचार्य सु. ग. शेवडे आणि तुकाराम महाराजांचे बारावे वंशज अमोल अशोक महाराज मोरे उपस्थित होते.
व्हिडिओ पुढील लिंकवर... https://youtu.be/xPMUHTCLezw
रत्नागिरी जिल्ह्यातील स्वयंसाह्यता समूह अर्थात बचत गटातील विशेष कामगिरी करणाऱ्या ११ महिलांना पतीसह प्रजासत्ताक दिनाचं संचलन पाहण्यासाठी विशेष निमंत्रण मिळालं असून, त्या विमानाने दिल्लीला गेल्या आहेत. रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक (विपणन) अमोल काटकर आणि तालुका अभियान व्यवस्थापक विशाल लांजेकरदेखील त्यांच्यासह दिल्लीला गेले आहेत.
*या महिलांनी स्वतःच्या कामाबद्दल दिलेली माहिती आणि दिल्लीतून व्यक्त केलेल्या मनोगताचा व्हिडिओ पुढील लिंकवर...* https://youtu.be/FX5rJRfKLsE
रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदराच्या सरकारी जागेत असलेली ३१९ अनधिकृत बांधकामं हटवण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपल्याने आज (२७ जानेवारी) सकाळपासूनच मत्स्यव्यवसाय विभागाने पोलिसांच्या सहकार्याने कारवाईला सुरुवात केली आहे. हे १०.८३ हेक्टर क्षेत्र मत्स्यव्यवसाय विभागाच्या मालकीचं असून, अनेक वर्षं त्यात अनधिकृत बांधकामं होती आणि अनेकदा नोटिसा बजावूनही ती हटवण्यात आली नव्हती. त्यामुळे पोलीस विभागाचं संरक्षण घेऊन ती हटवावीत, असे निर्देश मत्स्यव्यवसाय आणि बंदरविकास मंत्री नीतेश राणे यांनी १३ जानेवारीला झालेल्या बैठकीत दिले होते. त्यानुसार अनधिकृत बांधकामधारकांना अंतिम नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर अनेक बांधकामधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणं हटवली. उर्वरित अनधिकृत बांधकामं हटवण्याची कारवाई मत्स्यव्यवसाय विभागाने आज सकाळपासून सुरू केली. य
देशाच्या ७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हर्णै (ता. दापोली, जि. रत्नागिरी) इथल्या सुवर्णदुर्ग किल्ल्यावर आज ध्वजारोहण करण्यात आलं.
अरे बाप रे! किती हा ई-कचरा!!
ई-कचऱ्याच्या निर्मितीमध्ये भारत जगात तिसरा!
तुमच्याकडेही असा ई-कचरा आहे का?
तो कचऱ्यात टाकू नका. योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आमच्याकडे आणून द्या.
तुमच्याकडचा ई-कचरा दान करा आणि पर्यावरणाचे आशीर्वाद मिळवा! कारण ई-कचरा इकडे-तिकडे कुठेही न टाकता तो संकलित केल्यामुळे त्याचा योग्य पुनर्वापर करता येतो किंवा पर्यावरणाची हानी टाळून त्याची विल्हेवाट लावता येते. मग तुम्हीही सहभागी होताय ना, या मोहिमेत...? देश स्वच्छ राखण्याचं आपलं कर्तव्य बजावून प्रजासत्ताक दिन साजरा करू या!
२६ जानेवारी रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत आपल्याकडचा ई-कचरा जवळच्या संकलन केंद्रात आणून द्या. रत्नागिरीसह २० शहरांमध्ये ६००हून अधिक संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत.
खेडशी येथील ई-कचरा संकलन केंद्र आहे अनुश्रुती एंटरप्रायझेस-पितांबरी शॉपीमध्ये
या उपक्रमाविषय