Kokan Media

Kokan Media Weekly Magazine, News Website, Book Publishing and overall Content services

कोकणातील व्यक्ती, संस्था आणि संघटनांसाठी प्रसारमाध्यमांशी संबंधित सेवा देण्याचं म्हणजेच मीडिया कन्सल्टंट म्हणून भूमिका पार पाडण्याचं कोकण मीडिया कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचं उद्दिष्ट आहे. संस्थेचं कार्यालय रत्नागिरीत आहे. प्रारंभी रत्नागिरी शहर-परिसर, रत्नागिरी जिल्हा आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं कोकणातल्या इतर जिल्ह्यांमध्ये संस्थेचं कार्यक्षेत्र विस्तारित करण्याचा मानस आहे.

प्रसारमाध्यमांचं महत्त्

व वादातीत आहे. आधुनिक काळात आकाशवाणी, दूरदर्शन, पुस्तकांपासून फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियापर्यंत या माध्यमाची व्याप्ती पोहोचली आहे. यापुढेही विविध माध्यमं निर्माण होऊ शकतील. माध्यमांमध्ये झपाट्यानं वाढ होत असली, तरी त्यामध्ये वृत्तपत्रांना समाजात मोठं स्थान आहे. छापून आलेल्या शब्दांवर लोकांचा सर्वाधिक विश्वास आहे. वृत्तपत्रांसह विविध माध्यमांशी संपर्क साधताना सर्वसामान्यांबरोबरच विशेष व्यक्ती आणि संस्थांनाही अडचणी येत असतात. त्याच सोडविण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस करणार आहे. प्रसिद्धीपत्रकं, नियोजित कार्यक्रमांची निवेदनं, बातम्या तयार करून देणं (Drafting), सभा, संमेलनं, परिषदा, अधिवेशनांचं वार्तांकन, विविध विषयांवरील वृत्तपत्रीय प्रासंगिक लेख, विशेष वृत्तांत तयार करण्यासाठी, तसंच गरजेनुसार हे सर्व विविध वृत्तपत्रांसह अन्य प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचविण्यासाठी मदत केली जाईल. या आणि अशा वृत्तपत्रीय कामांबरोबरच स्मरणिका तयार करणं, पुस्तिकांसाठी संकलन, पुस्तकांसाठी प्रेस कॉपी तयार करणं, छायाचित्रण, पत्रकार परिषदांचं आयोजन, इनहाउस जर्नलचं संकलन-संपादन, मुद्रितशोधन इत्यादी स्वरूपाची कामं माफक मोबदल्यात केली जातील.
ज्यांना बातमी द्यायची आहे किंवा ज्यांना माध्यमांशी आणि मुद्रणाशी संबंधित इतर सेवा हव्या आहेत, अशा ग्राहकांना अधिकाधिक समाधानकारक सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक सेवा देण्याचाही आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यांचा तपशील सातत्यानं या संकेतस्थळावर, तसंच आमच्या फेसबुक पेजवर अद्ययावत केला जाणार आहे. त्यामुळे संकेतस्थळ, तसंच फेसबुक पेजला वारंवार भेट द्यावी, अशी अपेक्षा आहे.

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आणि इनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन यांच्यातर्फे मुस्कान २०२५ ही खेळणी स...
18/02/2025

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आणि इनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन यांच्यातर्फे मुस्कान २०२५ ही खेळणी संकलन करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे....

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आणि इनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन यांच्यातर्फे मुस्कान २०२५ ही...

18/02/2025

शिवव्याख्यान...

वाटूळ (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) नुकत्याच झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनात शाहीर सौरभ कर्डे यांनी केलेल्या शिवव्याख्यानाचा व्हिडिओ पुढील लिंकवर... https://youtu.be/swhLW5Al1Bk

फिनोलेक्स ॲकॅडमीमध्ये ‘अर्डिनो: बेसिक्स टू ऑटोमेशन अँड रोबोटिक्स’ कार्यशाळारत्नागिरी : येथील फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमे...
17/02/2025

फिनोलेक्स ॲकॅडमीमध्ये ‘अर्डिनो: बेसिक्स टू ऑटोमेशन अँड रोबोटिक्स’ कार्यशाळा
रत्नागिरी : येथील फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीच्या इलेक्ट्रिकल विभागातर्फे द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘अर्डिनो: बेसिक्स टू ऑटोमेशन अँड रोबोटिक्स’ ही दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली.

कार्यशाळेत ६० हुन अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना होम ऑटोमेशन, स्मार्ट सिंचन प्रणाली, अडथळा शोधणारी यंत्रणा आणि लाइन फॉलोअर रोबो यासारख्या स्वयंचलित प्रणालींबाबत प्रत्यक्ष अनुभव मिळाला. तांत्रिक कौशल्यांसह त्यांनी विविध सेन्सर आणि इलेक्ट्रॉनिक घटकांचा वापर करून प्रकल्प विकसित केले. कार्यशाळेदरम्यान प्रोग्राम केलेली रोबो कार आणि लाइन फॉलोअर रोबो कार या दोन स्वयंचलित यंत्रणांचे यशस्वी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली.

प्रा. रूपेश इंगळे यांनी अर्डिनो युनो प्रोग्रामिंग, सेन्सर इंटरफेसिंग, ऑटोमेशन आणि रोबोटिक्स यावर सखोल मार्गदर्शन केले, तर इलेक्ट्रिकल विभागाचे प्रमुख डॉ. जयंत माने यांनी अर्डिनोचा वैयक्तिक व औद्योगिक प्रकल्पांमध्ये वापर कसा करता येईल यावर भर दिला.

ही कार्यशाळा प्रा. रूपेश इंगळे आणि डॉ. जयंत माने यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी केली. कार्यशाळेचे संयोजन प्रा. सुदीप हालदार यांनी केले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाची सखोल माहिती मिळाल्याचे सांगितले. त्यांनी यापुढे स्वतंत्रपणे रोबोट तयार करण्याची आत्मविश्वासपूर्वक तयारी असल्याचेही मत व्यक्त केले.

(छायाचित्र ओळी - १) अर्डिनो कार्यशाळेत रोबो कार निर्मितीचे प्रात्यक्षिक देताना प्रा. रूपेश इंगळे, २) कार्यशाळेत तयार झालेल्या दोन रोबो कार

देवरूख : येथील रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीने आयोजित केलेल्या छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा निक...
17/02/2025

देवरूख : येथील रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीने आयोजित केलेल्या छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे....

देवरूख : येथील रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीने आयोजित केलेल्या छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्प.....

क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांची आज (१७ फेब्रुवारी) पुण्यतिथी.
17/02/2025

क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांची आज (१७ फेब्रुवारी) पुण्यतिथी.

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी भाषा गौरव दिन संकल्प चित्र स्पर्धा मुंबईतील मराठी वृत्तप...
17/02/2025

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी भाषा गौरव दिन संकल्प चित्र स्पर्धा मुंबईतील मराठी वृत्तपत्र लेखक संघाने आयोजित केली आहे....

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी भाषा गौरव दिन संकल्प चित्र स्पर्धा मुंबईतील मराठ.....

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा आज (१७ फेब्रुवारी) बलिदान दिन.
17/02/2025

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा आज (१७ फेब्रुवारी) बलिदान दिन.

16/02/2025

पुणे-दिल्ली प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रथमच 'मराठी साहित्ययात्री संमेलन'
विशेष रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे तर, डब्यांना गडकिल्ल्यांची नावे
मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत स्वागताध्यक्ष, शरद तांदळे अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्षपदी वैभव वाघ

सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या दिल्ली येथे होत असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रवासी साहित्य संमेलन भरवावे, या संकल्पनेतून 'मराठी साहित्ययात्री संमेलन' आयोजित करण्यात आले आहे. मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारे हे मराठीतील पहिलेच आणि जगातील सर्वात मोठे आणि दीर्घ साहित्य संमेलन असणार आहे.
साहित्यरसिकांना पुण्यातून दिल्लीला घेऊन जाणाऱ्या रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव देण्यात येणार असून, प्रत्येक बोगीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची नावे दिली जाणार आहेत. मराठी भाषामंत्री डॉ. उदय सामंत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून, तेही 'मराठी साहित्ययात्री संमेलनात' सहभागी होत रेल्वेतून प्रवास करणार आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका डॉ. संगीता बर्वे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती सरहदचे विश्वस्त डॉ. शैलेश पगारिया, अनुज नहार, मिलिंद जोशी यांनी दिली.
दि. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी, ताल कटोरा स्टेडियम येथे हे संमेलन होत आहे. या संमेलनात सहभागी होणाऱ्या साहित्य रसिकांसाठी पुणे ते दिल्ली अशी विशेष रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही विशेष रेल्वे दि. 19 रोजी दुपारी पुण्यातून निघणार असून, दि. 20 रोजी रात्री दिल्ली येथे पोहोचणार आहे.
'मराठी साहित्ययात्री संमेलनात' महाराष्ट्रातील विविध गावा-गावांमधून साहित्यिक, युवक, लोककलाकार, स्टैंडअप कॉमेडियन्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तसेच शाहिरी व भजनी मंडळांचा मोठ्या संख्येने समावेश असणार आहे. मोठ्या प्रमाणावर तरुणाईच्या सहभागामुळे हे संमेलन तरुणाईचे संमेलन ठरणार आहे. महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव असलेल्या या विशेष रेल्वेला 16 बोगी असणार असून, प्रवासारदम्यान प्रत्येक बोगीत विविध साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. युवा साहित्यिक व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने 'मराठी साहित्ययात्री संमेलन' भरविण्यात येत आहे.
दि. 19 रोजी असलेल्या शिवजयंतीचे औचित्य साधून सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली जाणार आहे. 'गर्जा महाराष्ट्र माझा' या महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनानंतर पुण्यातून रेल्वे निघणार आहे. तत्पूर्वी पुस्तक दिंडीही काढली जाणार आहे. याच रेल्वे प्रवासात १२०० पेक्षा अधिक साहित्यिक येणार असून, जळगाव आणि ग्वाल्हेर येथे ही विशेष रेल्वे पोहोचल्यानंतर ग्वाल्हेर येथील स्थानिक नागरिक भव्य स्वागत करणार आहेत. रेल्वे दि. 20 रोजी दिल्लीत पोहोचणार असून, दिल्ली स्थानकावर पोहोचल्यानंतर पसायदानाच्या गायनाने 'मराठी साहित्ययात्री संमेलना'ची व पहिल्या टप्प्यातील प्रवासाची सांगता होणार आहे. या वेळी दिल्लीतील मराठीजन मोठ्या संख्येने स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत. परतीच्या प्रवासात देखील हे संमेलन रंगणार असून, दि. 25 रोजी पुणे रेल्वे स्थानकावर या अनोख्या संमेलनाची सांगता होईल.
या अभिनव उपक्रमाची संकल्पना सरहद पुण्याचे अध्यक्ष संजय नहार यांची आहे. संमेलनाच्या निमित्ताने स्वतंत्र संयोजन समितीची स्थापना करण्यात आली आहे. मराठी भाषामंत्री डॉ. सामंत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. तेही रेल्वेद्वारे प्रवास करणार असून, साहित्यिक, कलावंतांशी संवाद साधणार आहेत. रावण आंत्रप्रिन्युअर या पुस्तकांचे लेखक शरद तांदळे यांची संमेलनाध्यक्ष तर, वंदेमातरम् संघटनेचे अध्यक्ष व व्हायरल माणुसकी या पुस्तकाचे लेखक वैभव वाघ हे संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. डॉ. शरद गोरे (कार्याध्यक्ष), सचिन जामगे, (कार्यवाह), अॕड. अनिश पाडेकर, सोमनाथ चोथे, गणेश बेंद्रे (मुख्य समन्वयक), अक्षय बिक्कड, सागर काकडे (निमंत्रक) यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.

गोगटे गुरुजी प्रतिष्ठानच्या शैक्षणिक मार्गदर्शन वर्गाची सांगताआजगाव (ता. सावंतवाडी) : येथील गोगटे गुरुजी प्रतिष्ठानच्या ...
15/02/2025

गोगटे गुरुजी प्रतिष्ठानच्या शैक्षणिक मार्गदर्शन वर्गाची सांगता
आजगाव (ता. सावंतवाडी) : येथील गोगटे गुरुजी प्रतिष्ठानच्या शैक्षणिक मार्गदर्शन वर्गाची उत्साहात सांगता झाली.

आजगाव येथील पूज्य गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठान गेली चार वर्षे शैक्षणिक कार्य करीत आहे. यावर्षीदेखील शैक्षणिक मार्गदर्शन करताना एकूण सुमारे दीडशे तास मार्गदर्शन करण्यात आले. पाचवी स्कॉलरशिप, आठवी स्कॉलरशिप, आठवीसाठी गणित प्रवीण आदी विषयानुरूप मार्गदर्शन करण्यात आले. हे सर्व मार्गदर्शनवर्ग विनामूल्य होते. सांगताप्रसंगी आरवली येथील १८ मुलांना कॅम्लीन कंपासपेट्या, तर आजगाव येथील नऊ मुलांना दिलीप अंकुश पांढरे यांच्यातर्फे रायटिंग पॅड्स भेट देण्यात आली. या वर्गांचे शैक्षणिक मार्गदर्शन विनय सौदागर यांनी केले, तर दिलीप पांढरे, प्रकाश मिशाळ, एकनाथ शेटकर व अविनाश जोशी यांचे त्यासाठी साह्य लाभले.

प्रतिष्ठानतर्फे यावर्षी जुलै महिन्यात पाचवी आणि आठवीच्या मुलाला स्कॉलरशिप पुस्तके भेट देण्यात आली होती. दिवाळीत किशोर अंक भेट देण्यात आला होता. विशेष म्हणजे आरवली येथील जीवन शिक्षण शाळेतदेखील एक महिना गणित या विषयाचे मार्गदर्शन करण्यात आले. तेथील मुख्याध्यापिका सौ. वैभवी रायशिरोडकर आणि इतर शिक्षकवर्गाचे त्यासाठी विशेष सहकार्य लाभले.

कॅलिफोर्नियाला कोकणासारखे व्हावेसे वाटायला लावणारे काम करू - एकनाथ शिंदेरत्नागिरी : कोकणाचा कॅलिफोर्निया नव्हे, तर कॅलिफ...
15/02/2025

कॅलिफोर्नियाला कोकणासारखे व्हावेसे वाटायला लावणारे काम करू - एकनाथ शिंदे
रत्नागिरी : कोकणाचा कॅलिफोर्निया नव्हे, तर कॅलिफोर्नियाला कोकणासारखे व्हावेसे वाटले पाहिजे, असे काम आपल्याला करायचे आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि. १५ फेब्रुवारी) रत्नागिरीत केले.

मतदारांनी महायुतीच्या नेत्यांना आमदारपदी निवडून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्री. शिंदे यांची आभार सभा आज येथील चंपक मैदानात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. आपल्या भाषणातून त्यांनी जनतेचे आभार मानले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या विजयामध्ये कोकणी माणसाचा वाटा मोठा आहे. या विजयाने विरोधकांची बोलती बंद केली. खरी शिवसेना कोणाची, बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण, हे जनतेने ठरवले आहे. जनतेने एवढे बहुमत दिल्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. आम्ही आरोपांना आरोपांनी नव्हे, तर कामातून उत्तर देतो. सत्ता येते जाते. पदेसुद्धा वरखाली होत असतात. पण कुठल्याही पदापेक्षा महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या बहिणींनी मला दिलेली 'महाराष्ट्राचा लाडका भाऊ' ही ओळख माझ्यासाठी खूप मोठी आहे, असे भावनिक उद्गार श्री. शिंदे यांनी काढले. तसेच लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे आश्वासन दिले

श्री. शिंदे यांनी विकासासाठी सतत कार्यरत राहण्याची ग्वाही दिली, तसेच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर टीकाही केली. ते म्हणाले, बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केले आणि कोकणी माणसाने बाळासाहेबांवर, शिवसेनेवर, धनुष्यबाणावर प्रेम केले. मिळालेला विजय बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करायला मी आलो आहे. आम्ही खोटी आश्वासने देत नाही. पूर्ण विचार करूनच योजना सुरू केल्या आहेत. महाराष्ट्राला गतिमानतेकडे, विकासाकडे नेण्याचे काम आम्ही केले. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करीन. आमच्या पक्षात सगळे कार्यकर्ते आहेत, कुणी मालक-नोकर नाही. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, तर सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. आम्ही आरोपांना कामातून उत्तर देणार आहोत. मला शिव्या देण्यापेक्षा लोक तुम्हाला का सोडतायत, याचे आत्मपरीक्षण करा, असा सल्ला शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

रामदास कदम यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मी किंवा एकनाथ शिंदे यांनी तोंड उघडले, तर उद्धव ठाकरे यांना देश सोडून जावे लागेल. एकनाथ शिंदेंनी खोके दिले, अशी टीका केली जाते; पण शिंदेंनी खोके दिले ते विकासकामांसाठी दिले आणि त्यांनी सांगितल्यानुसार ४० आमदारांपैकी एकही आमदार पडू दिला नाही. ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे.

जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचा भगवा ध्वज फडकेल, असा विश्वास यावेळी उदय सामंत यांनी व्यक्त केला. लाडकी बहीण योजनेसह सरकारने सुरू केलेली कोणतीही योजना बंद पडणार नाही, अशी ग्वाहीदेखील सामंत यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या महाविजयाचे खरेखुरे शिल्पकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत आणि हे कुणीच नाकारू शकत नाही, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यात पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान सहसंपर्कप्रमुख तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र महाडिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रचना महाडिक, माजी आमदार सुभाष बने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, जिल्हाप्रमुख विलास चाळके आदींचा समावेश आहे.

यावेळी व्यासपीठावर आमदार किरण सामंत, आमदार नीलेश राणे, माजी आमदार राजन साळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, उद्धव ठाकरे सेनेकडून पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या तीन जिल्हा पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हाध्यक्ष विलास चाळके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र महाडीक आणि रोहन बने यांचा समावेश आहे.

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी जिल्हा युवाशक्ती शाखेने मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषेला अभिजात भा...
14/02/2025

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी जिल्हा युवाशक्ती शाखेने मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे औचित्य साधून जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजित केले आहे....

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी जिल्हा युवाशक्ती शाखेने मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषेला ....

रत्नागिरी : येथे तीन दिवस पार पडलेल्या क्षेत्रीय वैदिक संमेलनाची रंगत सांस्कृतिक कार्यक्रमांनी वाढविली....
13/02/2025

रत्नागिरी : येथे तीन दिवस पार पडलेल्या क्षेत्रीय वैदिक संमेलनाची रंगत सांस्कृतिक कार्यक्रमांनी वाढविली....

रत्नागिरी : येथे तीन दिवस पार पडलेल्या क्षेत्रीय वैदिक संमेलनाची रंगत सांस्कृतिक कार्यक्रमांनी वाढविली.

🚩महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने विश्व मंदिर परिषदेचा विशेष उपक्रम...शिवलीलामृत समजून घेऊ या...शिवलीलामृत अभ्...
12/02/2025

🚩महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने विश्व मंदिर परिषदेचा विशेष उपक्रम...
शिवलीलामृत समजून घेऊ या...
शिवलीलामृत अभ्यास वर्ग (ऑनलाइन)
18 ते 24 फेब्रुवारी 2025 - रोज संध्या. 8 ते 9

*_👉ऑनलाईन नोंदणी:_*
https://www.vishwamandirparishad.org/karyshala/shivleelamrut

*◻️मार्गदर्शक : प्रा. प्रणव गोखले* (प्रख्यात वक्ते, प्रवचनकार, संस्कृत आणि धर्मशास्त्र विद्वान)

सर्व शिवभक्त, शिव अनुयायी आणि अभ्यासक यांना _शिवलीलामृत ग्रंथाचे अंतरंग जाणून घेण्यासाठी आणि शास्त्रशुद्धरीत्या समजून घेता यावे यासाठी_ या अभ्यासवर्गाचे आयोजन केले आहे.
महाशिवरात्र म्हणजे देवांचा देव महादेव यांच्या उपासनेचे परम पावन पर्व … स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडामध्ये भगवान शंकरांचे आणि त्यांच्या विविध भक्तांचे वर्णन आलेले आहे. त्यावर पू. श्रीधरस्वामी यांनी ओवीबद्ध काव्य रचले आहे. त्याचे नाव शिवलीलामृत असे आहे. अत्यंत प्रत्ययकारी, सर्व मनोकामना पूर्ण करणारे आणि अतीव आनंद देणारे असे हे स्तोत्र काव्य आहे. यामध्ये भगवान शंकरांच्या उपासनेचा महिमा, उपासनेच्या विविध पद्धती, अनेक व्रत वैकल्ये, रुद्राध्याय, रुद्राक्ष, भस्म यांचे माहात्म्य याबाबत भक्तांसाठी उपयुक्त मार्गदर्शन केलेले आहे.
महाशिवरात्रीचे माहात्म्य अपरंपार आहे. वेदांमध्ये, पुराणांमध्ये, प्राचीन संस्कृत साहित्यातील विविध ग्रंथांमध्ये शिव महात्म्याविषयी सांगितले गेले आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश यापैकी निर्माणकर्ता ब्रह्मा, पालनकर्ता विष्णू आणि मृत्यूनंतर सद्गती देणारा देव म्हणजे भगवान शंकर हा आहे. गेली शेकडो वर्षे करोडो भक्त भगवान शंकरांची उपासना करीत आहेत. 12 ज्योतिर्लिंगे, कैलास मानसरोवर, पंच कैलास, पंच केदार, महाकुंभ इ. सर्व ठिकाणी आपल्याला भगवान शंकरांचा अविर्भाव दिसून येतो. कोणतीही उपासना किंवा अनुष्ठान नीट समजून समजून केल्यास त्याचे फळ अनेक पटींनी मिळते असे शास्त्र सांगते. _या अभ्याक्रमाने शिवलिलामृत ग्रंथ माहात्म्य, त्याचा इतिहास, निर्मिती, उद्देश, त्यातील ज्ञान भांडार, माहात्म्य, पारायण - पठण पद्धती यांचे ज्ञान सहभागी व्यक्तींना मिळेल. अनेक शंकांचे निरसन होईल._

*◽चिंतनवर्गातील विषय:*
✅ भगवान शंकर देवतेची ओळख
✅ स्कंदपुराणाची ओळख
✅ भगवान शंकर या देवतेचे माहात्म्य आणि वैशिष्ट्ये
✅ शिवलीलामृत ग्रंथाची ओळख
✅ शिवलीलामृताचे पारायण कसे करावे ?
✅ शिवलीलामृताची फलश्रुती
✅ भगवान शंकरांच्या विविध उपासना पद्धती
✅ शंकरांना प्रिय व्रते आणि अनुष्ठाने
✅ पुराणांमध्ये वर्णिलेले शिव माहात्म्य
✅ प्राचीन संस्कृत साहित्यातील ग्रंथांमध्ये वर्णिलेले शिव माहात्म्य
✅ विविध शिव भक्तांच्या कथा
✅ रुद्राक्ष आणि रुद्राध्याय यांचे माहात्म्य
✅ शिवाला भस्म का प्रिय आहे? भस्म माहात्म्य
✅ शिवलीलामृताच्या पठणाचे लाभ इ.

*🗓️ दिनांक:* 18 ते 25 फेब्रुवारी, 2025
*🕗 वेळ:* संध्या. 8 ते 9
*◻️कालावधी:* रोज एक तास
*🎥 ऑनलाईन वर्ग:* Zoom द्वारे
*◽ देणगी : रु. 1200/-

*👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी? :
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. https://www.vishwamandirparishad.org/karyshala/shivleelamrut
➡️ पेजवरील *REGISTER NOW* येथे क्लिक करा.
➡️ *NEXT* वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

✅सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.
✅मर्यादित प्रवेश
✅त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645

👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.

रत्नागिरी : येथे तीन दिवस पार पडलेल्या क्षेत्रीय वैदिक संमेलनाची रंगत सांस्कृतिक कार्यक्रमांनी वाढविली....
11/02/2025

रत्नागिरी : येथे तीन दिवस पार पडलेल्या क्षेत्रीय वैदिक संमेलनाची रंगत सांस्कृतिक कार्यक्रमांनी वाढविली....

रत्नागिरी : येथे तीन दिवस पार पडलेल्या क्षेत्रीय वैदिक संमेलनाची रंगत सांस्कृतिक कार्यक्रमांनी वाढविली.Continue reading

केंद्रीय कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांना रत्नागिरीच्या भेटीचे निमंत्रणरत्नागिरी : केंद्रीय कायदामंत्री अर्जुन मेघवाल यां...
10/02/2025

केंद्रीय कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांना रत्नागिरीच्या भेटीचे निमंत्रण
रत्नागिरी : केंद्रीय कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांना रत्नागिरीच्या भेटीचे निमंत्रण रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि लेखक अॅड. विलास पाटणे यांनी दिले आहे.

अॅड. पाटणे यांनी श्री. मेघवाल यांची संसदेत भेट घेतली. याप्रसंगी अॅड. पाटणे यांनी स्वतः लिहिलेले रामशास्त्री हे पुस्तक त्यांना भेट दिले. रत्नागिरी ही लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यभूमी आहे. त्यामुळेच मेघवाल यांना रत्नागिरीचे आकर्षण असून त्यांना रत्नागिरी भेटीचे निमंत्रण अॅड. पाटणे यांनी याप्रसंगी दिले.

श्री. मेघवाल यांनी पाटणे यांचे लेखन आणि पुस्तकासंबंधी आस्थेने चौकशी केली. अॅड. पाटणे यांच्यासमवेत केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते. या भेटीनंतर अॅड. पाटणे यांनी सांगितले की, राजकारणात मूल्यावर विश्वास ठेवून काम करणारी माणसे भेटली की व्यवस्थेवरचा विश्वास वाढत जातो. साधा सरळ स्वभाव, थेट संवाद साधण्याचे कौशल्य आणि सामाजिक भान असलेली दृष्टी यातून मेघवाल यांचे व्यक्तित्व भावले. त्यांनीही "एक सफर हमसफर के साथ", 'विश्वपटलपर गांधी' सारखी तीन पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्या पगडीवरून राजस्थानी संस्कृतीचं अनोखे दर्शन होते.

श्री. मेघवाल सलग चार वेळा बिकानेरमधून (राजस्थान) संसदेवर निवडून गेले. तीन वेळा सर्वोत्कृष्ट संसदरत्न पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे. पॉलिटिकल सायन्समधून एमए, नंतर एलएलबी आणि फिलिपिन्स विद्यापीठातून एमबीए पदव्या त्यांनी प्राप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे पोस्टात टेलिफोन ऑपरेटरची नोकरी करून त्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. आयएएस म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय केला. सरकारी गाडीचा ते कधीच वापर करत नाहीत. सामाजिक भान ठेवून समाजोपयोगी अनेक कामे करीत असतात. भावना ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी प्रचंड कामे केली असून या सर्व विषयांवर यावेळी गप्पा रंगल्या.

नवी दिल्ली येथे केंद्रीय कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांना रामशास्त्री पुस्तक भेट देताना अॅड. विलास पाटणे. सोबत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक.

यजमान देवरूखची आर्या यशवंतराव बॅडमिंटनमध्ये अजिंक्यदेवरूख : देवरूखमध्ये सलग पाचव्या वर्षी  झालेल्या बाळासाहेब पित्रे स्म...
10/02/2025

यजमान देवरूखची आर्या यशवंतराव बॅडमिंटनमध्ये अजिंक्य
देवरूख : देवरूखमध्ये सलग पाचव्या वर्षी झालेल्या बाळासाहेब पित्रे स्मृती जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद आणि मानांकन स्पर्धेत यजमान देवरूखच्या आर्या यशवंतरावने मुलींच्या १५ वर्षे वयोगटातील विजेतेपद तर १७ वर्षे वयोगटातील उपविजेतेपद मिळवत जिल्ह्याच्या बॅडमिंटन क्रीडाविश्वात देवरूखचे नाव कोरले.

बॅडमिंटन असोसिएशन ऑफ संगमेश्वर तालुका संस्थेने रत्नागिरी डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने आमदार चषक स्पर्धेचे आयोजन केले होते. चिपळूणचे आमदार शेखर सर निकम यांचे सुपुत्र अनिरुद्ध निकम यांच्या हस्ते, संस्थेचे अध्यक्ष मंगेश प्रभुदेसाई, उपाध्यक्ष दिलीप विंचू, सचिव रविकांत कदम, सहसचिव नीलेश भुरवणे, खजिनदार राजू जागुष्टे, स्पर्धा प्रमुख मोहन हजारे, सदस्य हरेश पटेल, अभिषेक अग्रवाल, स्पर्धा समिती सदस्य अवधूत मेस्त्री, रूपा नलावडे सौ. वर्षा जोशी, रूपेश भागवत, अनंत वाटवे, डॉ. प्रमोद भालेकर, मंदार भाटकर, माळीसाहेब, सोहम प्रभुदेसाई, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे स्पर्धा समिती सदस्य अमित मुळ्ये इत्यादींच्या उपस्थितीत स्पर्धा पार पडली. दोन दिवसांच्या या स्पर्धेत दापोली, चिपळूण, संगमेश्वर, देवरूख आणि रत्नागिरीमधील विविध वयोगटांतील ११५ स्पर्धकांनी भाग घेतला. ११ वर्षे ते ५० वर्षे अशा विविध १८ गटांत झालेल्या सामन्यांमध्ये अनेक नामवंत खेळाडूंच्या रोमहर्षक लढती पाहण्याचा आनंद उपस्थित प्रेक्षकांनी आणि देवरुखमधील उदयोन्मुख खेळाडूंनी घेतला.

स्पर्धेतील विजयी आणि उपाविजयी खेळाडू असे - एकेरी : पुरुष खुला गट - यश भोंगले, मयूर कांबळे. महिला खुला गट - नेहा मुळ्ये, सानिका सुतार. ५० वर्षे गट - नरेश पेढाम्बकर, निनाद लुब्री. ४० वर्षे गट - निशिकांत मेहेंदळे, नरेश पेढाम्बकर. १९ वर्षे गट - मुले - यश भोंगले, आर्यन वेल्हाळ. मुली नेहा मुळ्ये, ऋचा सूर्यवंशी. १७ वर्षे गट -मुले - यश भोंगले, सुमेध सुर्वे. मुली - नेहा मुळ्ये, आर्या यशवंतराव. १५ वर्षे - मुले - सुमेध सुर्वे, अंश ढेकणे. मुली - आर्या यशवंतराव, अस्मि झोपे. १३ वर्षे- मुले -आदित घाणेकर, सम्यक हवाले. मुली - वल्लरी देवस्थळी, विश्वा गमरे. ११ वर्षे - मुले -लवीन चोचे, अभिराज पवार. मुली - वल्लरी देवस्थळी, स्वरा खेडेकर.

दुहेरी - पुरुष -अमोल भोसले + मयूर कांबळे, सुधीर चैनरू +विनीत पाटील. पुरुष ४० वर्षे - निनाद लुब्री +ओंकार फडके, नीलेश भुरवणे + गणेश जोशी.

मिश्र दुहेरी - मयूर कांबळे +सानिका सुतार, हरेश पटेल + वर्षा जोशी.

पुरुष ५० वर्षे - नीलेश मलुष्टे + निनाद लुब्री, रविकांत कदम + दिलीप विंचू.

सर्व विजयी खेळाडूंना आमदार चषक आणि रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

बक्षीस वितरण समारंभ बास्टचे संस्थापक ज्येष्ठ सदस्य महेश शेठ मंथरा, सौ. सरोज सावंत, जिल्हा संघटनेचे अमित मूळ्ये, रजनीश महागावकर, नीलेश मलुष्टे, ओंकार फडके, पदाधिकारी, स्पर्धा कमिटीचे पदाधिकारी यांच्या हस्ते पार पडला.
स्पर्धेदरम्यान आमदार श्री. निकम भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदारपदी निवडून आल्याबद्दल तसेच त्यांनी स्पर्धेसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा मंगेश प्रभुदेसाई व मोहन हजारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ओणी परिसर सहकारी पतसंस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीरराजापूर : ओणी (ता. राजापूर) येथील ओणी परिसर ग्रामीण बिगरशेती सहकार...
08/02/2025

ओणी परिसर सहकारी पतसंस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
राजापूर : ओणी (ता. राजापूर) येथील ओणी परिसर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या १६ फेब्रुवारी रोजी अलिबाग येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

कोकण विभागीय सहनिबंधक कार्यालय आणि कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश गजानन पाध्ये यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या प्रवीण करंबेळकर, नजीर टोले, प्रदीप कुळकर्णी, चंद्रकांत करंबेळकर, भरत चौगुले, प्रदीप वळंजू, प्रणाली गुरव, धनश्री पेणकर, नीलेश खातू या संचालकांसह कायदेशीर सल्लागार एकनाथ मोंडे, गुरुदत्त खानविलकर यांच्या सुयोग्य कार्यपद्धतीमुळे हा पुरस्कार प्राप्त झाल्याची भावना कार्यकारिणीने व्यक्त केली. ही पतसंस्था ओणी, कळसवली, वडवली, शिवणे बुद्रुक, वडदहसोळ, चुनाकोळवण, मंदरूळ, वाटूळ, कोंडतिवरे, तिवरे, ओझर, कोळवणखडी, सौंदळ, चिखलगाव, गोठणेदोनिवडे, नेरकेवाडी , खरवते या कार्यक्षेत्रात कार्यरत आहे.

उत्तम कार्याचे योगदान आणि गुणवत्तेमुळे एकत्रित व्यवसाय दहा लाख ते दोन कोटीपर्यंतच्या गट क्रमांक एकमध्ये पतसंस्थेला सन्मान जाहीर झाला आहे. कुरूळ अलिबाग येथील क्षात्रैक्य समाज हॉलमध्ये येत्या १६ फेब्रुवारी रोजी पुरस्काराचे वितरण आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. पुरस्काराबद्दल ओणी परिसर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे राजापूर तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

Address

Ratnagiri
415639

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919422382621

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kokan Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kokan Media:

Videos

Share

Our Story

कोकणातील व्यक्ती, संस्था आणि संघटनांसाठी प्रसारमाध्यमांशी संबंधित सेवा देण्याचं म्हणजेच मीडिया कन्सल्टंट म्हणून भूमिका पार पाडण्याचं कोकण मीडिया कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचं उद्दिष्ट आहे. संस्थेचं कार्यालय रत्नागिरीत आहे. प्रारंभी रत्नागिरी शहर-परिसर, रत्नागिरी जिल्हा आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं कोकणातल्या इतर जिल्ह्यांमध्ये संस्थेचं कार्यक्षेत्र विस्तारित करण्याचा मानस आहे. प्रसारमाध्यमांचं महत्त्व वादातीत आहे. आधुनिक काळात आकाशवाणी, दूरदर्शन, पुस्तकांपासून फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियापर्यंत या माध्यमाची व्याप्ती पोहोचली आहे. यापुढेही विविध माध्यमं निर्माण होऊ शकतील. माध्यमांमध्ये झपाट्यानं वाढ होत असली, तरी त्यामध्ये वृत्तपत्रांना समाजात मोठं स्थान आहे. छापून आलेल्या शब्दांवर लोकांचा सर्वाधिक विश्वास आहे. वृत्तपत्रांसह विविध माध्यमांशी संपर्क साधताना सर्वसामान्यांबरोबरच विशेष व्यक्ती आणि संस्थांनाही अडचणी येत असतात. त्याच सोडविण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस करणार आहे. प्रसिद्धीपत्रकं, नियोजित कार्यक्रमांची निवेदनं, बातम्या तयार करून देणं (Drafting), सभा, संमेलनं, परिषदा, अधिवेशनांचं वार्तांकन, विविध विषयांवरील वृत्तपत्रीय प्रासंगिक लेख, विशेष वृत्तांत तयार करण्यासाठी, तसंच गरजेनुसार हे सर्व विविध वृत्तपत्रांसह अन्य प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचविण्यासाठी मदत केली जाईल. या आणि अशा वृत्तपत्रीय कामांबरोबरच स्मरणिका तयार करणं, पुस्तिकांसाठी संकलन, पुस्तकांसाठी प्रेस कॉपी तयार करणं, छायाचित्रण, पत्रकार परिषदांचं आयोजन, इनहाउस जर्नलचं संकलन-संपादन, मुद्रितशोधन इत्यादी स्वरूपाची कामं माफक मोबदल्यात केली जातील. ज्यांना बातमी द्यायची आहे किंवा ज्यांना माध्यमांशी आणि मुद्रणाशी संबंधित इतर सेवा हव्या आहेत, अशा ग्राहकांना अधिकाधिक समाधानकारक सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक सेवा देण्याचाही आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यांचा तपशील सातत्यानं या संकेतस्थळावर, तसंच आमच्या फेसबुक पेजवर अद्ययावत केला जाणार आहे. त्यामुळे संकेतस्थळ, तसंच फेसबुक पेजला वारंवार भेट द्यावी, अशी अपेक्षा आहे.