अजिंठा

अजिंठा सकारात्मक आणि "अराजकिय"

इतिहास | संस्कृती | कला | विज्ञान

26/01/2025

मुंबईस्थित मल्याळम लेखिका मानसी यांच्या मुलाखतीदरम्यान त्यांना प्रश्न विचारला गेला, की त्यांच्यावर साहित्याचे संस्कार कुठून झाले. त्या म्हणाल्या की लहानपणी त्या रहात असत त्या केरळमधल्या छोट्या गावात दहा हजारहून अधिक पुस्तकं असलेलं सुसज्ज मोफत वाचनालय होतं. जिथून त्या पुस्तकं नेत असत. मल्याळी पुस्तकांसह तिथे त्यांना जगभरातल्या मोठ्या लेखकांच्या साहित्याचे मल्याळी अनुवाद वाचायला मिळाले.

मानसी यांचा जन्म १९४८ सालचा, म्हणजे ही फिफ्टीजची गोष्ट असणार. त्यावेळी केरळमधल्या लहान गावात इतकी चांगली व्यवस्था असताना आपल्याकडे काय परिस्थिती होती आणि मुख्य म्हणजे आता काय परिस्थिती आहे असा प्रश्न पडला !

- गणेश मतकरी

18/01/2025

आमदार दादा भुसे यांनी आज जाहीर केले की महाराष्ट्रातील सरकारी शाळा म्हणजेच कॉर्पोरेशन जिल्हा परिषद आणि तत्सम सर्व यात सीबीएससी पॅटर्न सुरू होत आहे.

सीबीएससी शाळा म्हणजे हिंदी माध्यमाच्या शाळा. वरवर पाहता त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाटतात परंतु तसे नाही त्यांची सर्व पुस्तके हिंदीमध्ये असतात. राजस्थान, पंजाब, हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रदेखील हिंदी राज्य बनवण्याचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे.

भाजपच्या वन नेशन थियरीमध्ये सर्व राज्यांसाठी एकच सिल्याबस असणे गरजेचे आहे. त्यात महाराष्ट्रात सीबीएससी शाळा वाढवणे हे उद्दिष्ट होते ते पूर्ण झाले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील मराठा शिक्षण सम्राटांनी गेल्या काही वर्षात आपल्या महाराष्ट्रभर पसरलेल्या शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न लागू केला आहे. त्याने त्यांना फी वाढ देखील करून मिळाली शिवाय भाजपाच्या मर्जीत राहायला ते बरे पडले. विश्वनाथ कराड, डी वाय पाटील, भारती विद्यापीठ शिक्षण सम्राट कोणताही असो त्यांनी एसएससी बोर्डाच्या शाळा बंद करून त्या जागी सीबीएससी शाळा सुरू केल्या आहेत.

थोडक्यात मराठी मिडीयम हे आता हद्दपार झाले आहे. जिथे मराठी माध्यम राहिले होते त्या सरकारी शाळा आता दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारने अतिशय त्वरेने हिंदी माध्यमाच्या करण्याचे योजले आहे त्यानुसार हे सगळे घडत आहे.

अजून पुढच्या पाच वर्षात हिंदी ही महाराष्ट्राची मुख्य भाषा होईल तर मराठी ही अस्तंगत झालेली असेल.

- शंतनू पांडे
#मराठीवाचवा

सारखं मान अवघडतेय, दुखते सतत कंटाळा असतोमूड डिप्रेस्ड असतो बाहेर जायला नको वाटतं लवकर झोप लागत नाहीजेवण खारट लागतं पित्त...
18/01/2025

सारखं मान अवघडतेय, दुखते
सतत कंटाळा असतो
मूड डिप्रेस्ड असतो
बाहेर जायला नको वाटतं
लवकर झोप लागत नाही
जेवण खारट लागतं
पित्त सारखं होतं
डोळे लाल होतात
चिडचिड होते
अंगाला मुंग्या येण्यासारखं होणं

पहिल्यांदा डॉक्टरला विचारून विटामिन आणि मिनरल सप्लिमेंट्स सुरू करा.
Vit D,B12, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयर्न, झिंक शरीरात कमी असल्यावर डिप्रेशन, एंग्जायटी, थकवा येणं वगैरे पहिल्या लक्षणांपैकी एक आहे. भारतातल्या शहरात राहणाऱ्या बहुतांश लोकांना एसेन्शियल सप्लिमेंट डेफिशियन्सी आहेच आहे.

-Ashish Shinde
#हेल्थ_अलर्ट

समृद्धी महामार्ग कसारा बोगदा आदिवासी चित्रकला पेंटींग❤️
16/01/2025

समृद्धी महामार्ग कसारा बोगदा आदिवासी चित्रकला पेंटींग❤️

सकाळी उठून अक्षरशः उपाशी पोटानेच आम्ही समशेरी हाती धरल्या होत्या. लढाई करताना सूर्याची दिशा कुठे होती नि काय हे माहीती न...
15/01/2025

सकाळी उठून अक्षरशः उपाशी पोटानेच आम्ही समशेरी हाती धरल्या होत्या. लढाई करताना सूर्याची दिशा कुठे होती नि काय हे माहीती नाही, पण आहे त्या अवस्थेतही आम्ही दुश्मनाची दशा करायला सुरवात केली होती. मराठ्यांच्या जवळपास तीन पिढ्या पानिपतावर जिवाच्या बाजीने लढत होत्या. उपाशी मरु, नाहीतर लढून मरु हा विचारही आम्ही कधी केला नव्हता कारण आज घास दुश्मनाचाच घेण्याचे आम्ही नक्की केले होते. लढताना कित्येक मनगटे तुटून पडली असतील पण अंगापासून तुटून पडली म्हणून त्यांची वळवळ काही केल्या थांबत नव्हती. पोटात भुकेचा आगडोंब उसळला असतानाही ती स्वाभिमानी मनगटे तलवारी शोधत होती भाकर्‍या नाही...!

पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजारा...

#पानिपत

अभिषेक कुंभार

 #माहितीपूर्ण अरेबियन  नाईट्सच्या अलीबाबा आणि चाळीस चोर या गोष्टीत चोरांच्या गुहेचं दार  उघडण्यासाठी 'इफ्ताह या सिमसिम' ...
14/01/2025

#माहितीपूर्ण
अरेबियन नाईट्सच्या अलीबाबा आणि चाळीस चोर या गोष्टीत चोरांच्या गुहेचं दार उघडण्यासाठी 'इफ्ताह या सिमसिम' افتح يا سمسم असा संकेत शब्द असतो. सिमसिम म्हणजे अरबीत तीळ. आपल्याकडे ती गोष्ट भाषांतरित करताना आपण त्याचं 'तिळा दार उघड' केलं. आणि बऱ्याच वेळी 'तिळा दार उघड' वाक्प्रचारासारखं मराठीत आपण वापरतोही.

तीळ हे भारतातून सगळीकडे पोहचलेले धान्य. भारतात त्याच्या वापराचे पुरावे साडेपाच हजार वर्षे मागे इतक्या प्राचीन काळापर्यंत मिळतात. हडप्पा-सिंधू संस्कृतीत तीळ आणि त्याचे तेल माहीत होते त्याची रीतसर शेतीच केली जात होती, वेदकाळात तीळ माहीत होते. तीळ महत्त्वाची यज्ञसामग्री होते.

बृहदारण्यक उपनिषदात चतुर्थ ब्राह्मण मंत्र १७ मध्ये म्हटलंय की 'अथ य इच्छेद् दुहिता मे पण्डिता जायेत सर्वमायुरियादिति तिलौदनं' म्हणजे ज्यांना विदुषी कन्या त्यांच्यापोटी जन्माला यावी असे वाटते त्या जोडप्याने तीळतांदुळाची खिचडी शिजवून खावी.

महाभारतात, रामायणात बरेचदा तिळाचे उल्लेख येतात. महाभारतात आदिपर्वात तिलोत्तमा ह्या अप्सरेची कथा आहे. सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीतून तीळ तीळ सौंदर्य घेऊन विश्वकर्म्याने ती घडविली म्हणून तिलोत्तमा.

तिळापासून मिळणारे स्निग्ध त्याला संस्कृतात 'तैल' म्हणतात. या तैलाचेच मराठीत 'तेल' झाले. खरे तर तिळाचे तेच तेल असायला हवे पण तेल हा शब्द आपण तत्सम सर्व स्निग्ध द्रव्याला वापरू लागलो इतका तो आपल्या जनमानसात रुळला आहे. आपल्याकडे शेंगदाण्याचे तेल असते, बदामाचे तेल असते आणि एरंडेलाचेही तेलच असते.

तिळाच्या तेलात कुंकू किंवा इतर द्रव्य मिसळून तो मस्तकावर लावत म्हणून संस्कृतात 'तिलक' म्हणतात. मराठीतला टिळा या तिलकापासून आला. हिंदीत त्याचा टीका झाला. माथ्यावर लावतात तो टीका आणि पूर्वी देवीची लस दंडावर दिल्यावर डाग पडे म्हणून लसीकरताही टीका हेच नाव पडले.

'तीळ' या शब्दाचा मागोवा घेऊ जाता अशी हि 'तिळा दार उघड' म्हटल्यासारखी मोठी गुहा उघडते.

- हारून शेख

#तिळगुळघ्यागोडगोडबोला
#संक्रांत

काल रात्री अगदी उशिरा झोपताना दूध तापवावं म्हणून गॅस ऑन केला. तर सिलिंडर संपलेलं होतं. हाताशी दुसरं सिलिंडर होतं ते लावल...
11/01/2025

काल रात्री अगदी उशिरा झोपताना दूध तापवावं म्हणून गॅस ऑन केला. तर सिलिंडर संपलेलं होतं. हाताशी दुसरं सिलिंडर होतं ते लावलं नेहमीप्रमाणे.
पण वास येऊ लागला. असा तर्क केला की थंडीमुळे सगळी दारं खिडक्या बंद आहेत. नुकताच नवा सिलिंडर लावलाय तर येत असेल वास.
दूधही लगेचच तापलं.
त्यामुळे नेहमीच्या सवयीप्रमाणे सिलिंडरचा नाॅब बंद केला आणि झोपले.

आजचा प्रसंग ..

घरात एकटीच होते. स्वयंपाक करायला म्हणून नाॅब चालू केला आणि गॅस सुरू केला.वास येऊ लागला.
मला शंका आली. मी दारं खिडक्या उघडल्या पुन्हा एकदा रेग्युलेटर नीट बसवलंय का ते बघितलं. पुन्हा पुन्हा खात्री करून घेतली.
तरीही वास येताच होता.
आता माझी खात्री झाली की गॅस लिंक होतोय.
नाॅब बंद केला आता एजन्सी मध्ये फोन करून मेकॅनिकला बोलावून खात्री केल्याशिवाय गॅस पेटवायला मन धजेना.
ओव्हनमध्ये दूध तापवलं.
ब्रेड आणला गॅस न पेटवताच सॅण्डविचेस केले.
या गडबडीत नऊ वाजले. एजन्सी मध्ये फोन केला. तातडीने मेकॅनिक पाठवा अशी विनंती केली.
खरंतर कधी हौस म्हणून कधी बदल म्हणून हाॅटेलमधे जेवायला जाणं होतंच की. पण आज काहीतरी वेगळं आहे त्यामुळे घर सोडवेना आणि दुरूस्ती होईतो घरात थांबवतही नव्हतं.
मेकॅनिकची वाट बघण्याखेरीज गत्यंतर नव्हते. कारण तो कधी येणार याची कल्पनाच येईना.
संध्याकाळी पाच वा मेकॅनिक आला. वाटलं होतं रेग्युलेटरचा वायसर खराब झाला असेल त्यामुळे लिकेज आहे.
मेकॅनिकनं वायसर चेक केला. तो चांगला होता. मग लिकेज कुठून? पाईप कधी बदललीये या मेकॅनिकच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे तयारच होतं. आर ओची दुरुस्ती तारीख वगैरे नोंदवहीत असतात. त्यामुळे ती पाईपही एक्सपायर झालेली नव्हती याची खात्री होती. पाईपवर तारीख असतेच.( पाईप दर पाच वर्षांनी बदलावी लागते) बारकाईने बघितलं त्यानं तेव्हा त्याच्या लक्षात आलं.
पाईप ओट्याच्या ज्या छिद्रातून खाली जाते त्या भींतीतल्या छिद्राला घासून घासून पाईप झिजली होती. त्याचं रबरी आवरण, आतलं प्लास्टीक (की अन्य कसलं आवरण) झिजून गेलं होतं.तिथून लिकेज होतं.
बरं ही पाईप घासली का जात होती तर प्रत्येक वेळी सिलिंडर बदलताना, सिलिंडरच्या कप्प्याची स्वच्छता करताना सिलिंडर मागं पुढं करावं लागत होतं आणि दोन अडीच वर्षांपूर्वी बदललेली पाईप कमी लांबीची असल्याने ती जोरात घासली जात होती.
आता पाईपची लांबी कमीय वगैरे गोष्टी लक्षात नाही आल्या माझ्या, हे माझं दुर्दैव.
पण मेकॅनिकच्या ते लक्षात आलं. तातडीने पाईप बदलली.
माझी मात्र पाचावर धारण बसली होती.
आपण घरातल्या संभाव्य धोक्यांना नेहमीच घाबरत असतो. सर्व ती दक्षता घेऊन देखील असे प्रसंग येतातच.
रात्री मी वास येतो आहे ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं असतं..सकाळची डबा नाश्त्याची गरज आणि घाई लक्षात घेऊन तसंच रेटून काम केलं असतं तर काय घडलं असतं या विचारानेच एवढ्या थंडीतही दरदरून घाम फुटला.
अशा गोष्टींकडे दुर्लक्ष नकोच. गॅस, इलेक्ट्रॉनिक वस्तू, आपली वाहनं ही सुस्थितीत असलीच पाहिजेत हा हट्ट घरातल्या प्रत्येक सदस्याने धरलाच पाहिजे. तरच आपलं जीवन सुरक्षित आहे.
मागच्यास ठेच पुढचा शहाणा या म्हणीप्रमाणे ज्यांना या गोष्टी माहिती नाहीत त्यांना माहित व्हाव्यात यासाठी अनुभव शेअर करतेय.
सोबत झिजलेल्या पाईपचे छायाचित्र जोडतेय.
मैत्रिणींनो ( आणि सगळ्यांनीच) काळजी घ्या. जीवन अनमोल आहे.

लेख - सविता करंजकर

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मौजे कळमआंबा गावची प्रियंका इंगळे या युवा खेळाडूची " वर्ल्डकप खो - खो " साठी भारतीय संघ...
11/01/2025

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मौजे कळमआंबा गावची प्रियंका इंगळे या युवा खेळाडूची " वर्ल्डकप खो - खो " साठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. हा समस्त महाराष्ट्रासाठी नक्कीच अभिमानाचा क्षण आहे. तिचे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा.

07/01/2025

#महत्वाचे
“मी बाराही महिने थंड पाण्यानं अंघोळ करतो किंवा मला एकदम कडकच चहा लागतो”च्या घवघवित अभिमानानंतर अनेक भारतीयांना अजून एक गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो ती म्हणजे “मी तर कोविडमध्येही मास्क वापरला नव्हता”

आता HMPVच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर ‘पुराना ये वह’ म्हणत या विषाणूला आपण पहिल्याच षटकात गारद केलंय असं आता अनेकांना वाटतंय आणि तसं झालं असेल तर वेल ॲंड गूड पण आपण आपल्या मेरिटवरच्च खेळायला हवं..

कुठलंही संक्रमण हे फक्त ‘मॅटर ॲाफ चान्स’ असतं..

कोविड काळात तीन महिने शहर सोडून गावी शेतात रहायला गेलेल्या आमच्या शेजाऱ्यास रस्त्यावरून एका माणसानं आवाज देऊन पाणी मागितलं आणि फक्त तेवढा एकच मानवी संपर्क एक कुटूंब उद्घस्त करायला कारणीभूत ठरला..

आमचा जवळचा मित्र आम्ही या काळात गमावला होता,
स्मशानात त्याच्या बायकोनं टाहो फोडला,तिला तिच्या पार्टनरला एकदा बघायचं होतं,कुणालाही न जुमानता बंधूंनी बॅाडीच्या कव्हरची झिप खाली करून नंतर हातावर सॅनिटायरचा स्प्रे मारला तर योगायोगानं तो संपला होता पुढच्या आठवड्यात बंधूंचं एक फुफ्फूस जवळपास आख्खं निकामी झालं ते थेट सीसीयूत पोहोचले..

युएसच्या एका फ्लाईटमधून उतरतांना एक अरबी मणुष्य शिंकला आणि त्याच्या जवळ उभा असलेल्या एका अनिवासी भारतीयाला वाचवण्यासाठी त्याच्या घरच्यांवर महिन्याभरातच पब्लिक फंडिंग गोळा करण्याची वेळ आली..

कोविड मध्येही सर्दी खोकला हीच प्राथमिक लक्षणं होती (सर्दी खोकल्याला पहिल्यांदा ज्यानं ‘साधा’ म्हटलं त्याला आधी चोप दिला पाहिजे).

विषाणू जुना असला तरी बाय चान्स त्यात काही टेलरींग केली गेली असेल तर?

विषाणू अजिबात गुढ नाही पण चायना नेहमीप्रमाणं एक गुढ आहे

कोविड आला तेव्हा तो ही एकटाच होता नंतर त्याचे वेरिएंट्स आले यावेळी तसं झालं तर?

कोविडमुळं संसर्गजन्य आजारांवर आपली पीएचडी झाली असली आणि HMPV अगदी पहिलीतला विषाणू असला तरी आपण ‘भारतीय’ इतके तेजस्वी आहोत की पहिलीतही सहज नापास होऊ तेव्हा कुणी कितीही गॅरंटी दिली तरी गुपचूप सार्वजनिक स्थळी मास्क-सॅनिटायजर वापरा शक्य होईल तेवढी गर्दी टाळा..

अन् हो घाबरवत नाही,घाबरण्याचं काही कारणही नाही पण काळजी घेणे म्हणजे ‘घाबरणे’ अजिब्बात नव्हे !

- डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

सुंदोपसुंदी आणि चतुर्मुख महादेवमंदिरांमध्ये, झाडाखाली, नदीच्या काठावर, किल्ल्यांवर आणि आणखी अनेक ठिकाणी आपल्याला शिवलिंग...
05/01/2025

सुंदोपसुंदी आणि चतुर्मुख महादेव

मंदिरांमध्ये, झाडाखाली, नदीच्या काठावर, किल्ल्यांवर आणि आणखी अनेक ठिकाणी आपल्याला शिवलिंगे दर्शन देत असतात. शिवलिंगाचे दर्शन झाल्यावर आपले हात नकळत जोडले जातात. काही वेळेस शिवलिंगास चेहरे असतात. कधी कधी तर महादेवाच्या पुरातन मूर्तींनाही एकापेक्षा जास्त मुखें असतात. हे असते महादेवाचे सदाशिव रूप. वामदेव, अघोर, सज्योद्यात, तत्पुरुष आणि ईशान ही त्या पाच स्वरुपांची नावे. त्याच्या मागे पाशुपत संप्रदायाचे फार मोठे तत्वज्ञान आहे. पण महादेवास पाच मुखे कशी आली, ह्याबाबत महाभारतात एक रंजक कथा येते.

हिरण्यकष्यपूच्या कुळात निकुंभ नावाचा बलवान राक्षसराज होऊन गेला. त्याला सुंद-उपसुंद नावाचे दोन पुत्र होते. त्यांच्यात इतके ऐक्य होते, मनाने-आचरणाने ते इतके समान होते, जणू एक आत्मा दोन शरीरे. गुरुची आज्ञा घेऊन ते दोघे विंध्य पर्वतावर तपश्चर्येेस बसले. खडतर तपश्चर्येनंतर ब्रह्मा प्रकट झाले. इतर दानवांनप्रमाने त्यांनी ब्रह्माकडे अमरत्व मागितले, व नेहमीसारखेच ब्रह्मानेही ते नाकारून दुसरा वर मागण्याविषयी सुचवले. त्यांचा आपापसातील ऐक्यावर इतका विश्वास होता की आमच्या दोघांशिवाय इतर कोणाकडूनही आमचा वध होऊ नये असा वर त्यांनी मागितला आणि ब्रह्मा ने तो वर दिला. मग राक्षस सेना घेऊन स्वर्गावर आक्रमण करते झाले, आणि थोड्याच अवधीत त्रिलोकावर त्यांचे राज्य पसरले.

पृथ्वीवर प्रचंड अराजक माजले. यज्ञादी षट्कर्मे बंद झाली. राक्षसांनी बेसुमार कत्तली सुरु केल्या. ते पाहून सर्व ऋषिगण, देव परमपिता ब्रह्माकडे आले, व ह्या दोन राक्षस भावांपासून जगास मुक्त करण्याचे साकडे ब्रह्मास घालते झाले. ब्रह्माने विश्वकर्मास आज्ञा दिली. त्या आज्ञेवरून तिन्ही लोकांत जे जे उत्तम, दर्शनीय घटक होते, अश्या घटकांपासून विश्वकर्मा ने एक अत्यंत सुंदर, दैवी अश्या लावण्यवतीचे निर्माण केले. ज्यांची नजर तिच्यावर पडेल, ते समस्त जीव मोहून जात असत. जो बघेल, त्याची नजर लोहचुंबकासमान त्या सुंदरीवर ठरत असे.

तिलं तिलं समानीय रत्नानां यद् विनिर्मिता तिलोत्तमेति तत् तस्या नाम चक्रे पितामहः ।।
सर्वोत्तम अश्या हरएक रत्नांचे तिळमात्र गुण घेऊन तिचे निर्माण झाले असल्याने तिचे नाव तिलोत्तमा असे झाले.

ब्रह्माने सुंद आणि उपसुंद ह्यांच्यात फूट पाडण्याची आज्ञा तीस दिली. जाण्याआधी तिने ब्रह्मास वंदन केले. तिलोत्तमाने देवांची प्रदक्षिणा प्रदक्षिणा सुरू केल्यावर, तिच्या मोहक उपस्थितीने समस्त देव आणि ऋषींचे लक्ष वेधून घेतले. ती जिकडे जिकडे फिरली, त्या सर्वांची नजर तिच्या दिमाखदार सौंदर्याने मोहित झाली व ते मान वाळवून तिचे सौंदर्य न्याहाळू लागले. तरीही, त्यांच्यामध्ये, इंद्र आणि भगवान शिव हे दोघेच असे होते, जे तिच्या दैवी सौंदर्याच्या भुरळीने अस्पर्शित नसूनही शांत, स्थिर होते.

जेव्हा प्रदक्षिणा करत तिलोत्तमा दक्षिणेकडे गेली तेव्हा एक विलक्षण परिवर्तन घडले. तिला पाहण्याच्या इच्छेने प्रेरित, भगवान शिवाच्या मस्तकाच्या दक्षिणेकडे एक नवीन चेहरा प्रकट झाला, व त्यांचे कमळासारखे डोळे तिच्याकडे शांत कौतूहलाने पाहू लागले. ती त्यांच्या पाठीमागून जात असताना पश्चिमेला महादेवांचा आणखी एक चेहरा निर्माण झाला. जेव्हा ती उत्तरेकडे गेली तेव्हा महादेवांचा आणखी एक चेहरा निर्माण होऊन प्रत्येक दिशेला महादेवाचे एक एक मुख तयार झाले. इंद्राचे काही तसे झाले नाही, मात्र त्याच्या अंगावर सर्व ठिकाणी हजारो डोळे प्रकट झाले. तिलोत्तमेच्या विलक्षण सौंदर्याची पावतीच जणू तिला मिळाली.

तिलोत्तमा ब्रह्मलोकातून जिथे सुंद-उपसुंद क्रीडा करीत होते तेथे अवतीर्ण झाली व वाटीकेतील फुले वेचु लागली.. आधीच मद्य प्राशन करून झिंगलेले ते दोघे राक्षसबंधू तिच्या सौंदर्याने मोहित न होते तरच नवल. ह्या दिव्य सौंदर्यवतीस कोण प्राप्त करणार ह्यावरून दोघांच्यात चांगलीच जुंपली, आणि कामवासनेने पेटून उठलेले ते दोघे भाऊ एकमेकांशी युद्ध करू लागले. एकमेकांच्या भीषण गदा प्रहरांनी ते दोघे भाऊ जमिनीवर उल्का कोसळाव्यात तसे पडले आणि त्यांच्या बरोबरच पृथ्वीवरचे अत्याचार देखील नष्ट झाले. ह्या कथेवरूनच 'आपल्याच लोकांनी आपापसात झगडा करून स्वतः चा विनाश ओढवून घेणे' ह्यास ‘सुंदोपसुंदी’ हा शब्दप्रयोग रूढ झाला.

प्रकाशचित्र एक:
दक्षिणे तां करे सुभ्रू सुन्दो जग्राह पाणिना । उपसुन्दोऽपि जग्राह वामे पाणौ तिलोत्तमाम् ।।
-सुंदर भुवया असलेल्या तिलोत्तमाचा उजवा हात सुंदने तर डावा हात उपसुंदाने धरला.
असे वर्णन महाभारतात आदिपर्वात येते. ह्या प्रसंगाचे शब्दशः तंतोतंत अंकन आपल्याला एका मंदिरावर दिसते. मधोमध एक डेरेदार वृक्ष, व त्याखाली फुले वेचत असलेली त्रिलोकसुंदरी तिलोत्तमा. तिच्या दोन्ही बाजूंस हातात सोटे घेतलेले, धष्टपुष्ट शरीरयष्टीचे सुंद-उपसुंद बंधू तुम्ही बघू शकता. ते दोघे बंधू एका हाताने तीलोत्तमेस आपल्याकडे ओढण्याचा यत्न करीत आहेत असे दिसते. त्यांची केशभूषा, वस्त्रप्रावरणे, हत्यारे, दागिने, चेहेर्याची ठेवणं तुम्हाला जराशी वेगळी भासेल. कारण हे शिल्प भारतात नसून भारतापासून हजारो किलोमिटर लांब, कंबोडिया मध्ये असलेल्या बांतेसराय मंदिरावर एकेकाळी विराजमान होते. खास ख्मेर शैलीमध्ये, सुंदर महिरपीखाली असलेले हे शिल्प सध्या फ्रान्स च्या गीमे संग्रहालयात आहे.

प्रकाशचित्र दोन: चतुर्मुख शिवलिंग, महाकुटेश्वर पुष्करणी, बदामी, कर्नाटक.
मुखलिङ्गं त्रिवक्त्र वा एकवक्त्रञ्चतुर्मुखम् । सम्मुखं चैकवक्त्र स्यात्त्रिवक्त्र पृष्ठतो नहि ॥
पश्चिमास्यं स्थितं शुभ्रं कुङ्कुमाभं तयोत्तरम् । याम्यं कृष्णं करालं स्यात् प्राच्यां दोप्ताग्निसन्निभम् ॥
सद्यो वामं तथाऽघोरं तत्पुरुष चतुर्थकम् । पञ्चमञ्च तथेशानं योगिनामथ (प्य) गोचरम् ॥
रूपमंडनानुसार , मुखलिंग एक, तीन अथवा चार मुखांचे असावे. एकमुखाच्या लिंगात मुख समोर, तीन मुखी लिंगावर मागे मुख नसावे, चार मुखी शिवलिंगावर मागचे मुख शुभ्र, उत्तरेकडील लाल, दक्षिणेचे काळे भयंकर, आणि पुढचे मुख प्रज्वलित अग्निसमान असावे. सद्योजात, वामदेव, अघोर आणि चौथे तत्पुरुष आहेत. पाचवे मुख ईशानाचे, जे योग्यांसही अनाकलनीय आहे.

लेखन व संकलन ©: Adwait Karajagi

काही हिंदी भाषातज्ञ म्हणतात की टिळक आमच्यासाठी विदेशी व्यक्ती आहेत, म्हणून आम्ही त्यांना ॲरिस्टॉटल = अरस्तू वाला नियम ला...
04/01/2025

काही हिंदी भाषातज्ञ म्हणतात की टिळक आमच्यासाठी विदेशी व्यक्ती आहेत, म्हणून आम्ही त्यांना ॲरिस्टॉटल = अरस्तू वाला नियम लावतो. नेमके हेच शिवछत्रपतींच्या बाबतीतही होते.

उत्तर प्रदेश हे हिंदी उर्दूचे जन्मस्थान असले तरी तो एक मागास आणि अविकसित प्रदेश असल्याने तिकडे अडाणी लोकांची संख्या भरपूर आहे. ते या अडाणीपणातून शिवाजी महाराजांबद्दल बरळत असतात हे दुर्लक्षणीय नसले तरी घडीभर बाजूला ठेऊ; पण हिंदी भाषेतले चॅनल सुद्धा महाराजांचा एकेरी उल्लेख करतात हे इथे उल्लेखनीय आहे. याचे कारण असे आहे की उत्तर प्रदेश हा महाराष्ट्रासाठी "विदेश" च आहे आणि तेथील हिंदी/ हिंदोस्तानी ही भाषा सुद्धा मराठी लोकांच्या दृष्टीने विदेशीच आहे.

माझे मराठी लोकांना आवाहन आहे की हिंदीला मावशी म्हणणे सोडून द्या. त्या भाषेत तुमचीच काय, तुमच्या दैवतांची नावे सुद्धा नीट लिहिली जात नाहीत..

- प्रकाश नि. निर्मळ

भयानक स्कॅम 🚨 व्यवस्थित वाचा महत्वाचं आहे गाडी घरात पार्क आहे तरी पण टोल कट होतोय, मी साताऱ्यात असताना सोलापूर मध्ये त्य...
03/01/2025

भयानक स्कॅम 🚨 व्यवस्थित वाचा महत्वाचं आहे

गाडी घरात पार्क आहे तरी पण टोल कट होतोय, मी साताऱ्यात असताना सोलापूर मध्ये त्याच वेळी टोल कट होतो आणि यावर काहीच पर्याय नाहीये

तर झाल अस सप्टेंबर महिन्यात मी घरात असताना एक मेसेज आला की पाटस टोल नाक्यावर ९० रुपये टोल कट झाला मी बाहेर जाऊन पाहील तर गाडी घरासमोर उभी

मग बँकेत डिस्प्युट केला तर ४५ दिवस लागतील अस सांगितल म्हटलं टेक्निकली झाल असेल कदाचित मॅन्युअल नंबर टाइप करताना चुकल असेल जौद्या

परत १ तासात मेसेज आला सर्देवाडी टोल नाक्यावर ९५ रुपये टोल कट झाला मी परत डिस्प्युट केला आणि जौदे म्हटलं असेल काहीतरी प्रॉब्लम कारण हे रात्री झालेल

परत काही दिवसांनी तोच टोल नाका आणि तसेच मेसेज जवळपास ४-५ वेळा अस झाल मी बँकेला मेल केले आणि NHAI ला पण मेल केले अर्थात बँकेकडून काहीच रिप्लाय नाही आला NHAI कडून कॉल आले पण त्यांच मत होत फास्टॅग ज्या बँकेचा आहे त्यांच्याशी बोला

मी म्हटलं मला फक्त तुम्ही कार नंबर दिला तरी मी पुढ माहिती घेतो पण त्यांनी सरळ नाही म्हटलं

बर आता प्रॉब्लम हा आहे की फास्टॅग साठी कोणताच ऑफिस भारतात नाहीये कुठ तुम्ही जाऊन तक्रार करू शकत नाही इतकंच काय कोणत्याच बँकेचे संपर्क क्रमांक पण नाहीये फक्त टोल फ्री नंबर आहेत जे कधी लागतात आणि लागले तर तास तास वेटिंग ला असतात आणि त्यावर जरी आपण बोललो तरी ते म्हणतात आता टेक्निकल प्रॉब्लेम मुळे माहिती तपासाता येत नाहीये आम्ही कॉल बैक करू जो कधीच येत नाही

पुढे अस झाल की हे सारखं व्हायला लागल आणि हे तेंव्हाच होत जेंव्हा मी रीचार्ज करतो म्हणजे मी १०० रुपये रिचार्ज केला की समोरून ९० टोल जायचा आणि माझ अकाउंट रिकाम

मग मी सगळे टोल दुप्पट पैसे देऊन कैश मध्ये भरतो

मागच्या काही महिन्यांपासून मी जवळपास सगळे टोल कैश मध्ये भरतोय ढिगाने मेल केले काही फायदा नाही झाला

शेवटी मी HDFC ज्यांच फ़ास्ट टैग होत त्याना म्हटलं तुमचा बंद करा मी दुसरा घेतो आणि त्यांनी बंद केला

मी IDFC चा दुसरा फास्टॅग घेतला फ़ास्ट नवीन नंबर नवीन सगळं नवीन तरी पण तीच परिस्थिती पुणे सोलापूर च्या टोल नाक्यावरुन टोल कट होत आहेत

मी शेवटी तो विषयच सोडून दिला आहे आणि सगळीकडे डबल टोल भरायचं ठरवलं आहे पण

आता यात काही शक्यता आहेत

१) कोणी तरी माझ्या कार ची फेक नंबर प्लेट लावली आणि आणि तो फक्त रात्री फिरतोय म्हणजे मोठा गुन्हा होण्याची शक्यता आहे

२) टोल नाक्यावर काम करणारे कामगार मैन्युअल नंबर टाइप करून ओळखीच्या वाहनांना आपल्या फास्टॅग चा वापर करून सोडत आहेत

३) कुणीतरी फास्टॅग क्लोन केल असेल म्हणजे चासी नंबर ने दुसरा फास्टॅग बनवला असेल ज्यातून डिडक्शन होत आहे

४) एक मोठा स्कैम असू शकतो ज्यात १ करोड गाड्यांमधून १०० रुपये जरी काढले तरी करोडो रुपये मिळतील अर्थात यावर काहीच करता येत नसल्याने ते सापडण कठीण आहे ( हे अस होण्याची शक्यता यासाठी आहे कारण मी जेंव्हा रीचार्ज करत नाही तेंव्हा मेसेज येत नाही मात्र रिचार्ज केला की त्याच वेळी हे मेसेज सुरू होतात )

अर्थात पोलिस केस करायचा प्रयत्न अजून तरी नाही केला कारण कोणत्या चौकीत जाणार ? हा मोठा प्रश्न आणि अशा गोष्टीची केस कशी होणार हा दुसरा प्रश्न

बऱ्याच मोठ्या माणसांशी बोलून झाल पण कुणालाच हे समजत नाहीये आता आहे ते स्वीकारल आहे.

मनोज शिंगुस्ते

केकी मूस : चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर 50 वर्षं प्रेयसीची वाट पाहणारा महान कलाकार।चाळीसगावासारख्या ठिकाणी आयुष्याची 50 वर्ष...
02/01/2025

केकी मूस : चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर 50 वर्षं प्रेयसीची वाट पाहणारा महान कलाकार।

चाळीसगावासारख्या ठिकाणी आयुष्याची 50 वर्ष प्रेयसीची वाट पाहत, घराचा उंबरठा न ओलांडणारा केकी मूस हा विश्वविख्यात छायाचित्रकार. ज्यानं तीनशेहून अधिक सुवर्णपदकं मिळवली.

आपल्या अनेक छायाचित्रांना, कलाकृतींना त्या दगडी हवेलीत बंदिस्त राहून जन्म दिला. या थोर कलामहर्षीनं जवळपास पाच दशकं विजनवासात घालवली.

रोज मध्यरात्री येणाऱ्या रेल्वेच्या डब्यांकडं डोळे लावून बसलेला हा प्रियकर त्याच्या प्रेयसीच्या स्वागतासाठी रोजच तयारी करत असे.
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ज्यानं स्वतःला कला आणि प्रेमाला वाहून घेतलं अशा केकी मूस यांच्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

50 वर्ष पाहिली प्रेयसीची वाट
एखादी दंतकथा वाटावी अशीच केकींची ही प्रेमकथा. प्रेयसीनं दिलेल्या वचनावर विश्वास ठेवून जवळपास 50 वर्ष आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिच्या येण्याची वाट पाहणारा हा प्रियकर दररोज पंजाब मेल ही रेल्वे गाडी येऊन गेल्याशिवाय जेवत नसत.

खान्देशातील कलामहर्षी केकी मूस या महान कलाकारानं प्रेमात चाळीसगावमध्ये 'मूस आर्ट गॅलरी' निर्माण केली. कलामहर्षी केकी मूस कलादालनाचे विश्वस्त व कार्यकारणी सचिव कमलाकर सामंत हे त्यांच्या शालेय जीवनात केकी मूस यांना पहिल्यांदा चाळीसगावमध्येच भेटले होते.

केकी ज्या दिवशी एकटेच मुंबई सोडून चाळीसगावला निघाले त्या दिवशी त्यांची प्रेयसी त्यांना मुंबईच्या व्हिक्टोरिया स्टेशनवर म्हणजे आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर निरोप द्यायला आली होती.

तेव्हा तिनं केकी मूस यांचा हात हातात घेऊन त्यांना वचन दिलं की, एक दिवस ती नक्की पंजाब मेलनं चाळीसगावला येईन आणि त्यांच्या सोबत जेवण करेन.

त्यामुळे प्रेयसीनं दिलेल्या वचनावर विश्वास असलेले केकी मूस दिवसभर बंद असलेली बंगल्याची सगळी दारं-खिडक्या रेल्वेगाडी येण्याच्या वेळेला उघडत असत. दिवे लावत असत. दररोज बागेतल्या ताज्या फुलांचा एक गुच्छ ते स्वतः तयार करून ठेवत असत.

नंतर जेव्हा त्यांच्या बागेतील फुलं कमी झाली तेव्हा त्यांनी शोभेच्या कागदी फुलांचा एक गुच्छ कायमचाच तयार करून ठेवला होता.

तसेच रोज रात्री दोन व्यक्तींच्या जेवनाची तयारीसुद्धा ते करून ठेवत असत. अशाप्रकारे त्यांच्या प्रेयसीच्या स्वागताची ते रोज तयारी करून ठेवत.

कलामहर्षी केकी मुस कलादालनाचे विश्वस्त व कार्यकारणी सचिव कमलाकर सामंत म्हणतात, "त्यांनी प्रेयसीला दिलेला शब्द शेवटपर्यंत पाळला. दररोज पंजाबमेल रेल्वे गाडी गेल्यानंतरच ते जेवायचे. 31 डिसेंबर 1989 या त्यांच्या आयुष्यातल्या शेवटच्या रात्रीचं जेवण देखील त्यांनी पंजाब मेल गेल्यावरच घेतलं होतं."

सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, केकी गेल्यानंतर त्यांना दोन पत्रं सापडली. त्यातलं एक पत्र त्यांच्या प्रेयसीचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर दुसरं केकींच्या एक नातलग हाथीखानवाला यांचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

हाथीखानवाला यांनी त्या पत्रात केकींसांठी लिहिलं होतं की त्यांच्या प्रेयसीला लंडनला पाठवण्यात आलं आहे आणि तिकडं तिचं लग्नही करण्यात आलं आहे. मात्र, ते पत्र केकींनी कधीच वाचलं नसल्याचा खुलासा सामंत यांनी केला आहे.

'ती' कोण होती?
मुंबईत शिक्षण घेत असताना केकींची निलोफर मोदी नावाच्या मुलीशी मैत्री झाली. नंतर त्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं.

सगळं शिक्षण पुर्ण करून केकी मूस यांनी चाळीसगाव येथे आपल्या आईवडील यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या आणि निलोफरच्या नात्यात कायमचा दुरावा आला.

कारण केकींच्या घरची आर्थिक स्थिती चांगली असली तरी त्यांच्या तुलेनेत निलोफर या श्रीमंत कुटुंबातील होत्या.

त्यामुळे निलोफर यांचे आईवडील या नात्याबाबात फार खुश नव्हते, तरीही त्यांनी लग्नाला होकार दिला होता.

परंतु, निलोफर यांच्या आईवडीलांना त्यांचं मुंबईसोडून चाळीसगावसारख्या ठिकाणी राहायला जाणं मान्य नव्हतं.

निलोफर यांची केकींसोबत चाळीसगावला जाण्याची तयारी असूनही त्यांच्या आईवडीलांनी निलोफर यांनी जाण्याची परवानगी दिली नाही.

परंतु केकी मुंबईवरून चाळीसगावला निघाले असताना निलोफरनं त्यांना एकदिवस चाळीसगावला भेटायला येण्याचं वचन दिलं.

नंतर त्या एका वचनाला केकींना स्वतःचं संपूर्ण आयुष्य वाहीलं.

50 वर्षांत फक्त दोनदाच घराबाहेर पडले केकी
केकी 50 वर्षात फक्त दोनच वेळा घराबाहेर पडले. याबाबत बीबीसी मराठीशी चर्चा करताना कमलाकर सामंत यांनी म्हटलंय, "केकींनी 50 वर्षांचा बंदिवास स्वतः स्वीकारला होता.

1939 पासून ते 1989 या 50 वर्षांच्या काळात ते फक्त दोनदाच घराबाहेर पडले होते. एकदा 1957 ला त्यांच्या आईच्या अंत्यविधीसाठी ते औरंगाबादला गेले होते.

तर दुसऱ्यांदा भूदान चळवळीदरम्यान विनोबा भावेंचं व्यक्तीचित्र घेण्यासाठी 1970 दरम्यान ते चाळीसगाव रेल्वे स्थानकाच्या वेटींग रूममध्ये गेले होते. खरंतर विनोबा भावेंचें भाऊ शिवाजी नरहर भावे हे केकींचे खास मित्र होते. त्यामुळे शिवाजीरावांच्या आग्रहाखातर ते घराबाहेर पडले होते."

केकी मूस यांचं घर
"भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केकींना चाळीसगावच्या रेल्वे स्थानकावर भेटायला बोलवलं होतं. तेव्हा त्यांच्या आमंत्रणासही त्यांनी नम्रपणे नकार दिला होता.

शिवाय त्यांनाच निरोप पाठवला होता की तुम्हाला जर माझ्या हातून व्यक्ती चित्र तयार करून हवं असेल तर तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. माझ्या घरात तुमचं स्वागत आहे. तेव्हा स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू केकींना भेटायला त्यांच्या घरी आले होते." असंही सामंत पुढे म्हणाले.

केकी जरी घराबाहेर पडत नसले तरी अनेक दिग्गज मंडळी केकींना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला त्यांच्या घरी येत असत.

यामध्ये जवाहरलाल नेहरू, बाबा आमटे, आचार्य अत्रे, ना. सी. फडके, जयप्रकाश नारायण, साने गुरुजी, महर्षी धोडो केशव कर्वे, वसंत देसाई, पंडित महादेवशास्त्री जोशी, श्री. म. माटे, बालगंधर्व अशा अनेक लोकांचा समावेश आहे. यातील बहुतेक व्यक्तींचे केकींनी काढलेले छायाचित्र त्यांच्या संग्रहालयात आहे.

कलेच्या प्रेमात असलेला अवलिया
केकी मूस हे छायाचित्रकार म्हणून तर जगप्रसिद्ध होते. ते चित्रकार, संगीतप्रेमी, संगीतसंग्राहक, उत्तम शिल्पकार, काष्ठशिल्पकार आणि ओरिगामिस्ट होते. (ओरिगामी म्हणजे कागदांना विविध प्रकारच्या घड्या घालून वेगवेगळ्या आकारांत घडविणे).

याशिवाय केकी उत्तम लेखक, अनुवादक, भाषांतरकार आणि तत्त्वज्ञ होते. त्यांनी सर्व धर्मातील ग्रंथाचा अभ्यास केला होता. ते पंडीत फिरोजा फरोन्जी, प्रो. नसीर खान आणि उस्ताद दिन महम्मद खान यांच्याकडे सतार वादन शिकले होते.

त्यांना इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, हिंदी, गुजराती, उर्दू आणि मराठी या भाषा येत होत्या. पुस्तकं गोळा करून स्वत:चं ग्रंथालय बनवण्याच्या उद्देशानं त्यांनी सुमारे 4000 पुस्तके गोळा केली होती. ते उर्दू कवितेचे मोठे चाहते होते.

इतर कलाकारांच्या कलाकृती, लाकूड कोरीव काम, पुतळे व पुरातन वस्तू, दुर्मिळ जुनी भांडी, खेळणी, जुनं फर्निचर, नाणी यांचा संग्रह त्यांनी केला होता.

केकींना विविध प्रकारच्या संगीताच्या कॅसेट आणि ग्रामोफोन रेकॉर्ड्सचा संग्रह करून ठेवण्याचा छंद होता. त्यांच्याकडं हिंदी, मराठी, गुजराथी, राजस्थानी गीतं तसंच बालगीतं, भावगीतं, भक्तिगीतं, भजनं, अभंग, गझल, कव्वाली, कजरी, ठुमरी,रागदारी अशा विविध प्रकारच्या संगीताचा संग्रह होता.

त्यांचे फेक्ड फोटोग्राफी, स्थिर चित्रण, पोर्ट्रेट्स, अ‍ॅनिमल स्टडीज, व्यंगचित्रात्मक फोटोग्राफी यासारखे छायाचित्रण प्रकार सुद्धा प्रसिद्ध होते. त्यांची विच, बेगर विदाऊट, शिव पार्वती, विंटर, तृषार्त, वात्सल्य ही छायाचित्रं विशेष गाजली.

टेबल-टॉप फोटोग्राफीमुळे मिळाली प्रसिद्धी
टेबल-टॉप फोटोग्राफीमुळे ते प्रसिद्ध झाले. टेबलटॉप फोटोग्राफीतील भारतातले पहिले महान कलाकार जे. एन. उनवाला यांच्याकडून केकींनी टेबलटॉप फोटोग्राफी देखील शिकून घेतली होती.

यामध्ये वस्तूंची कल्पक मांडणी करुन त्यांचा योग्य उंचीवरून काढलेल्या तसंच सावल्यांवर विशेष भर असणार्‍या छायाचित्राला टेबलटॉप फोटो म्हणतात.

टेबलटॉप फोटोग्राफीच्या माध्यमातून काढलेलं छायाचित्र जिवंत असल्याचा भास होतो. या टेबलटॉप फोटोग्राफीसाठी लागणार्‍या चीजवस्तू त्यांनी घरातच जमवल्या होत्या.

त्यांनी टेबलटॉपसाठी वापरलेल्या सगळ्या चीजवस्तू अजूनही चाळीसगावच्या केकी मूस कलादालनात आहेत. जवळजवळ त्यांच्या 1500 कलाकृतींची कल्पक मांडणी या कलादालनात केलेली आहे.

त्यावेळी केकींच्या 'द वीच ऑफ चाळीसगाव' या फोटोला 'बेल्जियम फाईन आर्ट सोसायटीचं' गोल्ड मेडल मिळालं होतं.

याबाबत केकी मूस यांच्यावर संशोधन करून लेखमाला लिहिलेल्या अ‍ॅड. क्रांती आठवले-पाटणकर सांगतात, "एक किस्सा असा आहे की फोटो पाठविण्याची मुदत संपत आली तरीही मनाजोगं मॉडेल केकींना मिळेना. त्यांनी देवाकडं प्रार्थना केली की एक मॉडेल पाठवून दे.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी केकी त्यांच्या घराच्या व्हरांड्यात केस पुसत होते. तेथून जाणाऱ्या एक आजी त्यांना पाहून ते वैद्य असल्याचं समजून त्यांच्याकडं औषध मागायला घरात शिरली.

केकींना हवं असलेलं मॉडेल त्यांना गवसलं आहे हे त्या आजीला पाहून केकींच्या पटकन लक्षात आलं. केकींनी तिच्या 4 आण्याच्या मोळीचे तिला 5 रुपये दिले आणि फोटो काढण्यासाठी तयार केलं.

गच्चीवर नेऊन तिचे जवळजवळ 40 फोटोग्राफ घेतले आणि नंतर आपल्या डार्करूममध्ये अखंड 24 तास त्यावर काम करून त्यातील एक फोटो स्पर्धेसाठी पाठवला. या फोटोला त्या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळालं."

केकींच्या टेबल-टॉप फोटोग्राफीनं तीनशे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परितोषिके मिळवली.

केकी चाळीसगावला पोहोचले कसे?
केकींचं पूर्ण नाव कैखुसरो माणेकजी मूस. मात्र त्यांची आई त्यांना 'केकी' म्हणायची. नंतर हेच नाव त्यांची ओळख बनलं. त्यांना बाबूजीदेखील म्हटलं जायचं. चाळीसगाव स्थानकाजवळ एक दगडी बंगल्यात ते राहायचे.

मुंबईतल्या मलबार हिलसारख्या उच्चभ्रू लोकवस्तीत 2 ऑक्टोबर 1912 मध्ये एका पारशी कुटुंबात पिरोजा आणि माणेकजी फ्रामजी मूस या आईवडीलांच्या पोटी केकींचा जन्म झाला.

आर. सी. नरिमन हे त्यांचे मामा मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक होते. तत्कालीन व्ही.टी स्टेशन अर्थात आजचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही त्यांनीच बांधलेली वास्तू आहे.

तर मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करून केकी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. खरंतर वयाच्या नवव्या वर्षांपासून चित्र काढणाऱ्या केकींना कलाकार व्हायचं होते.

परंतु माणेकजींना वाटे की केकींनी त्यांची सोडा वॉटर फॅक्टरी व दारूचं दुकान सांभाळावं. दरम्यान 1934-35 च्या सुमारास माणेकजींचं निधन झाल्यावर पिरोजाजींनी दुकानाची जबाबदारी स्वीकारली.

आपल्या मुलाला त्याच्या स्वप्नासाठी इंग्लंडला जाण्याची परवानगी दिली. केकींनी 1935 मध्ये लंडनमधील 'द बेनेट कॉलेज ऑफ शेफिल्ड'मध्ये प्रवेश घेतला. केकींनी चार वर्षांत त्यांचा कमर्शियल आर्टचा डिप्लोमा पूर्ण केला.

याच अभ्यासक्रमात फोटोग्राफी हा विषय देखील होता. 1937 साली केकींनी त्याचाही अभ्यास केला. नंतर 'रॉयल सोसायटी ऑफ आर्ट ऑफ ग्रेट ब्रिटन' या संस्थेनं त्यांना मानद सभासदत्व दिलं.

केकी मूस फऊंडेशनतर्फे केकींच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी 31 डिसेंबरला कलामहर्षी केकी मूस कलादालनाच्या आवारात कार्यक्रम आयोजित केला जातो.
त्यानंतर केकी अमेरिका, जपान, रशिया, स्वित्झर्लंडला गेले. तिथं फोटोग्राफीची अनेक प्रदर्शनं पाहिली. अनेक कलाकारांना भेटले आणि 1938 साली भारतात परत आले.

त्यानंतर ते मुंबईवरून सरळ चाळीसगावमध्ये आले आणि त्यानंतर जवळपास पन्नास वर्षें त्यांनी त्यांच्या बंगल्यात स्वत:ला आत्मकैद करुन घेतलं.

रेम्ब्राँ हा डच चित्रकार केकींचं प्रेरणास्थान होता. रेम्ब्राँ या चित्रकाराचा त्यांच्या मनावर खूप प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बंगल्याचे 'आशीर्वाद' हे नाव बदलून 'रेम्ब्राँज रिट्रीट' असं ठेवलं.

आयुष्यभर प्रेयसीची वाट बघत कलेमधे स्वतःला वाहून घेतलेल्या या महान कलाकारानं 31 डिसेंबर 1989 ला सकाळी 11.00 च्या सुमारास त्याच घरातून जगाचा निरोप घेतला.

दरम्यान महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांनी 1983 ला केकी आणि त्यांच्या छायाचित्रणावरील 'केकी मूस - लाइफ अँड स्टिल लाईफ' हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.

'व्हेन आय शेड माय टीअर्स' हे केकींनी स्वतः लिहिलेलं स्वतःचं आत्मचरित्र अजून प्रकाशित झालं नसल्याची माहिती कमलाकर सामंत यांनी बीबीसी मराठीला दिली.

तसेच केकी मूस फऊंडेशनतर्फे केकींच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी 31 डिसेंबरला कलामहर्षी केकी मूस कलादालनाच्या आवारात कार्यक्रम आयोजित केला जात असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

ह्या व्हायरल पोस्टवर नक्की प्रतिक्रिया नोंदवा... 🙏
02/01/2025

ह्या व्हायरल पोस्टवर नक्की प्रतिक्रिया नोंदवा... 🙏

मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.  मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRC...
01/01/2025

मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. या पदांवर नोकरी मिळालेल्या उमेदवारांना 2 लाखांपर्यंत पगार दिला जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

#मराठीतरुणांसाठी #भूमिपुत्र #मराठी

https://corporate.mmrcl.com/en/careers

महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथे दर्शनाकरिता गेलो असताना मंदिराच्या मूळ वास्तूशी विद्रुपी करण करण्याचा प्रकार लक्षात आला....
01/01/2025

महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथे दर्शनाकरिता गेलो असताना मंदिराच्या मूळ वास्तूशी विद्रुपी करण करण्याचा प्रकार लक्षात आला.. हे लोक काय झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत हे समजले नाही.. मूळ मंदिरात अतिक्रमण करून काही नवीन देवता स्थापन केल्याचे दिसून आले.. या लोकांना देवी देवता आणि चमरधारिणी अप्सरा यातील फरक लक्षात न येता चक्क एका चमरधारी यक्षास सिमेंट चे देवकोष्टक तयार करून त्यात बसवलंय.. महालक्ष्मी मंदिरात अतिशय संतापजनक प्रकार हे लोक करीत आहेत.. मंदिर प्रशासन येथील सुजाण नागरिक गप्प कां आहेत..? मूळ मंदिरातील अतिक्रमण काढून ज्या देवता स्थापन केल्या आहेत त्या मंदिराच्या आवारात नवीन छोटे मंदिर बांधून त्या स्थापन कराव्यात..सर्वात वाईट वाटले येथील आरतीचा नवा अविष्कार बघून.. मंदिराच्या दक्षिण प्रवेशद्वारावरील जैन तीर्थकराच्या भगवान पार्श्वनाथाच्या मूर्ती शाबूत राहव्यात हीच अपेक्षा..

- विशाल फुटाणे
#महालक्ष्मी #महाराष्ट्र #इतिहास

Address

Pune
411046

Alerts

Be the first to know and let us send you an email when अजिंठा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to अजिंठा:

Videos

Share

Category