Osmanabad news

Osmanabad news निर्भीड , निपक्ष , ताबडतोब
(1)

28/05/2025

धाराशिव शहरात कोहिनूर हॉटेलच्या पुढे समता रोडवर झाड पडले वाहतूक बंद!, विजेच्या तारा आहे तुटल्या.

27/05/2025

लातूर अतिवृष्टी? , लातुर शहरात पाणीचं पाणी , गोलाई जवळ तेली गल्लीत मोटारसायकली गेल्या वाहून.

महात्मा बसवण्णा यांनी दिलेल्या मानव धर्माचा संदेशानुसार बसव प्रतिष्ठाणच कार्य - शरण पाटीलबसव प्रतिष्ठाणच्या वतीने २७ व्य...
27/05/2025

महात्मा बसवण्णा यांनी दिलेल्या मानव धर्माचा संदेशानुसार बसव प्रतिष्ठाणच कार्य - शरण पाटील

बसव प्रतिष्ठाणच्या वतीने २७ व्यक्तीचा बसवरत्न पुरस्कार देऊन सन्मान

मुरूम ता. २५, क्रांतिसूर्य विश्वगुरू महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकात मानवता धर्माचा संदेश देत अनुभव मंटपच्या माध्यमातून सर्व धार्मियांना एकत्रित एकत्रित आणून जातभेद नष्ट करून समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी योगदान दिला आणि त्याच तत्वावर बसव प्रतिष्ठाण कार्य करत असल्याचे मत शरण पाटील यांनी व्यक्त केले. धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथे बसव प्रतिष्ठाण अखिल भारतीय सामाजिक संघटनेचे वतीने श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार देऊन २७ व्यक्तीना सन्मानित करण्यात आला व त्याचबरोबर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात शालेय साहित्याचा वाटप कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. बसवरत्न पुरस्कार सोहळ्याचे हे ११ वर्ष होते. याप्रसंगी शाहीर रमेश खाडे यांचा श्री महात्मा बसवण्णा पोवाडा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण बसवराज पाटील होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मा. सह संचालक साखर आयुक्तालय पुणे डी. आय. गायकवाड,विठ्ठलसाई कारखाना संचालक विठ्ठलराव बदोले, उद्योजक बालाजी सुरवसे, नगर परिषद मुरूम मुख्याधिकारी सचिन भुजबळ, माजी नगराध्यक्ष रशीद शेख, बसप्पा वळसंग,शाहीर रमेश खाडे, बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णांकर्ती पुतळयाला पुष्पहार अर्पण करून द्विपप्रज्वलण, राष्ट्रगीत, शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले. पुढे बोलताना पाटील म्हणाले थोर समाजसुधारक महात्मा बसवण्णा यांचे विचार सर्व धर्म समभावाचे होते. लोकशाही आद्यजनक म्हणून ही त्यानं संबोधले जाते असे प्रतिपादन त्यांनी यावेळी करून पुरस्कृत्याना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विठ्ठलराव बदोले यांनी बोलताना बसव प्रतिष्ठाण चे कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या सामाजिक कार्याला मर्यादा नाहीत म्हणूनच आज या व्यासपीठाच्या माध्यमातून विविध धर्मीय,विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान ते गेले ११ वे वर्षापासून करत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी डी. आय. गायकवाड, सुरवसे, भुजबळ आदिनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण ठाकूर, प्रास्ताविक डॉ. रामलिंग पुराणे तर आभार प्रा. डॉ. सौ. मनीषा नागिले यांनी आभार मानले. यावेळी असंख्य महिला भगिनीं, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसादानंतर कार्यक्रमाचे सांगता संपन्न झाले. डिंगबर सोनटक्के, महेश लोणी, मल्लिनाथ सगरे,विजय घोडके, अमित ढाले, सागर कोळी, उमेश पुराणे, शुभम पुराणे, आकाश वगरे आदिसह समाज बांधवानी परिश्रम घेतला.

विशेष सत्कार
बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त "महाराष्ट्ररत्न" पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना मुरूम येथील धनगर समाज बांधवाच्या वतीने शरण पाटील यांच्या हस्ते काठी आणि घोंगडे भेट देऊन सत्कार करण्यात आला.

बसवरत्न पुरस्कृत्यांची यादी
श्रीराम सुभाष कुलकर्णी, मुरूम- सामाजिक,संतोष विलासराव तगरखेडे, निलंगा- आरोग्य सेवा,
अशोक सुऱ्याबा आलदर, सांगोला- सामाजिक-बालाजी विश्वनाथ सुरवसे, धाराशिव- पत्रकार,शेषेराव अंकुश लवटे, कोरेगाव वाडी- सामाजिक,संतोष मधुकर महिमकर सांगोला- सामाजिक क्षेत्र,अविनाश गुंडेराव काळे,उमरगा- पत्रकार,कांतराव हणमंतराव मंडले, बेरडवाडी- सामाजिक,बाळकृष्ण भारत साळुंके, धाराशिव- प्रशासकीय,पंडित बाबुराव मूदकण्णा,मुरूम- व्यापार,ॲड.फरहीन खान-पटेल,उमरगा-विधिज्ञ,सचिन महादेव भुजबळ, वडगाव- प्रशासकीय,प्रदीप गुरुनाथ गव्हाणे,मुरूम- सर्फमित्र,विजय गणेश सावतर, जागजी ता.जि. धाराशिव- संगीत,ॲड.एस पी इनामदार, केसरजवळगा-विधिज्ञ क्षेत्र,पंकज बबन बनसोडे,मुरूम- व्यापार,बाबासाहेब मल्लिनाथ पाटील,कोथळी- कृषी,बालाजी अजिनाथ सुरवसे, भूम- उद्योजक,आप्पासाहेब धानप्पा मुंडासे,मुरूम-सामाजिक,अभिजित महादेव लोके, अक्कलकोट-सामाजिक क्षेत्र,श्रीमती सविता संभाजीराव मुरूमकर,मुरूम-शैक्षणिक,रमेश खाडे-सोलापूर-शाहीर,अजित पंडितराव पाटील जकेकूर-कृषी

जीवनगौरव
श्री काशिनाथ संभाजी मिरगाळे,मुरूम- शैक्षणिक,चंद्रकांत रत्नू राठोड,बेळंब तांडा- महसूल सेवा,डॉ. महेश महालिंग अर्दाले,लातूर- जीवनगौरव वैद्यकीय,श्री. शिवशरण गुरलिंगप्पा वरनाळे, मुरूम- जीवनगौरव सहकार

महाराष्ट्र महागौरव पुरस्काराने पत्रकार अयुब शेख सन्मानीत..प्रतिनिधी (नळदुर्ग )डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष...
27/05/2025

महाराष्ट्र महागौरव पुरस्काराने पत्रकार अयुब शेख सन्मानीत..

प्रतिनिधी (नळदुर्ग )

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र आयोजित पुण्यातील पंचतारांकित जे डब्लू मरीयट हॉटेल मध्ये प्रतिबिंब प्रतिष्ठान लोकार्पण सोहळ्यात धाराशिव डिजिटल पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अयुब शेख यांचा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र आयोजित पुण्यातील पंचतारांकित जे डब्लू मरीयट हॉटेल मध्ये प्रतिबिंब प्रतिष्ठान लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या हस्थे दि 25 मे रोजी पार पडला.
'एन टीव्ही न्यूज मराठी'च्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
व तसेच जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी शासन दरबारी नेहमी पाठपुरावा करत असतात. अन्याय झालेल्या पत्रकारांना न्याय कसं देता येईल ते नेहमी प्रयत्न
यांच्या या कार्याची दखल घेत
हा पुरस्कार देण्यात आला
कार्यक्रमाचे उदघाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा संसदीय कार्य मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्थे करण्यात आले तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे होते.प्रमुख उपस्थितीत ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना जयकुमार गोरे,आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ ओमप्रकाश शेटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भोसरी विधानसभेचे महेश दादा लांडगे,खडकवासाला विधानसभेचे भिमराव तापकिर,मावळ विधानसभा आमदार सुनील शेळके,पुणे कंटोमेन्ट विधानसभा आमदार सुनील कांबळे,चिंचवड विधानसभा आमदार शंकर जगताप,आणि विधानसभा परिषद आमदार डॉ उषा खापरे एन टीव्ही चे संपादक इकबाल शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रास्ताविक मांडत सोहळ्याचे आयोजक तथा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी संघटनेचे महत्व सांगत उपस्थित सर्व डिजिटल मीडिया संपादक आणि पत्रकार बंधू भगिनींना मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी केवळ महाराष्ट्र राज्य न्हवे तर देशातील इतर राज्यातूनही संपादक व वरिष्ठ पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

27/05/2025

वाशी : नाले ,ओढे ,नाल्या ,गटारी मधील गाळ काढून तात्काळ सफाई करा - नगरपंचायतला तीव्र आंदोलनाचा इशारा

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : पोहनेर-धाराशिव रस्त्याची दुरवस्था, अपघातांचे प्रमाण वाढले!धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव तालुक्या...
27/05/2025

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : पोहनेर-धाराशिव रस्त्याची दुरवस्था, अपघातांचे प्रमाण वाढले!

धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव तालुक्यातील पोहनेर गावाला जोडणारा मुख्य रस्ता सध्या दयनीय अवस्थेत असून, या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत घेण्यासारखे झाले आहे. धाराशिव ते पोहनेर दरम्यान सुमारे १० ते १५ किलोमीटर अंतराच्या या रस्त्यावर जागोजागी खोल खड्डे पडले आहेत. परिणामी शालेय विद्यार्थी, कामगार, रुग्ण आणि नागरिक यांना अत्यंत गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

संबंधित विभागाने याकडे वेळेत लक्ष न दिल्याने आणि ठेकेदाराने अर्धवट काम सोडल्यामुळे रस्त्याची अवस्था आणखीच बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी खडी टाकून काम थांबवण्यात आले असून, अपूर्ण कामाचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. नागरिकांनी काम अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.

या रस्त्याचा वापर करणाऱ्या दहा गावांतील नागरिकांना उद्योगधंदा, शिक्षण, नोकरी आणि रुग्णसेवेसाठी उमरगा शहरात येणे आवश्यक असते. मात्र सध्याच्या परिस्थितीत त्यांना खड्डेमय रस्त्यामुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेस अपघातांचे प्रमाण वाढले असून, अंधारात खड्ड्यांचा अंदाज येत नाही.

उमरगा ते डिग्गी या मार्गावर सुमारे पंधरा किलोमीटरच्या अंतरात पाच किलोमीटरचा रस्ता खड्ड्यांनी व्यापलेला आहे. यामुळे वाहनचालकांना सतत सावरून वाहन चालवावे लागत आहे. शिवाय, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेली काटेरी झुडपे अपघातास आमंत्रण देत आहेत.

रस्ता अरुंद असल्याने दोन वाहने सहजतेने पास होऊ शकत नाहीत. एक खड्डा चुकवताना दुसऱ्या खड्ड्यात गाडी अडकण्याच्या घटना वारंवार घडत असून, वाहनधारक आणि प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे.

संबंधित विभाग तसेच लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष घालून रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांतून होत आहे.

#धाराशिव_बातमी
#पोहनेर_रस्ता
#रस्त्याची_दुरवस्था
#खड्डेमय_रस्ते
#वाहनधारकांचे_दु:ख
#विद्यार्थ्यांची_अडचण
#ठेकेदाराचे_दुरवर्तन
#प्रशासन_झोपलेय
#जनतेचा_राग
#रस्त्याची_दुरुस्ती_करा


27/05/2025

बार्शी : लंगोटे कुटुंबांवर शेत रस्ता निकालात अन्याय , प्रांतांकडे दाद मागणार , तीव्र आंदोलनाचा इशारा

#बार्शी

26/05/2025

हवामान खात्याच्या इशारानंतर, सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आमदार कैलास पाटील यांचे आवाहन

Kailas Patil - कैलास पाटील

*अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत पार पाडाव्यात - जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार**https://antarsa...
26/05/2025

*अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत पार पाडाव्यात - जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार*

*https://antarsanwadnews.com/?p=4740*

*अंतरसंवाद न्यूज*

25/05/2025

धाराशिव शहरातील 140 कोटी मंजूर असलेल्या रस्त्याच्या संदर्भात, MVA धाराशिव शहरची वतीने पत्रकार परिषद

25/05/2025

धाराशिव शहरातील 140 कोटी रु मंजूर असलेल्या रस्त्याच्या संदर्भात , मविआ धाराशिव शहर च्या वतीने पत्रकार परिषद ,

सोमनाथ गुरव शहरप्रमुख शिवसेना UBT , राष्ट्रवादी, माजी नगरसेवक बाबा मुजावर, काँग्रेस सिद्धार्थ बनसोडे

25/05/2025

धाराशिव : शहरात प्रशात (बापू) साळुंखे यांना शिंदे गटात प्रवेश का करत नाही म्हणून मारहाण, गुन्हा दाखल

Address

Osmanabad

Alerts

Be the first to know and let us send you an email when Osmanabad news posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Osmanabad news:

Share