MediaBharat

MediaBharat It's News Service for perfect information, fact check & analysis....

https://youtube.com/channel/UC

05/06/2025

देश कुठे चाललाय ? आणखी किती खाली खाली घसरत जाणारेय देश या सुमार काळात ? नागरिक कस्पटासमान समजले जाताहेत, आवाज उठवल्यास गुलामासारखी वागणूक दिली जातेय. एखाद्याचा बाप मरून पडलाय हाॅस्पिटलात. तो डॉक्टरांचा निष्काळजीपणाविरोधात मृतदेहाशेजारी आकांत करतोय. तिथे उपस्थित पोलिस कसं सांत्वन करताहेत, तर लाथाबुक्क्यांनी निर्दयी मारहाण करून...संवेदनाहीनतेची परिसीमा आहे ही !!!

04/06/2025

शिंदें शिवसेनेच्या गद्दारीबाबत मनसेतही खदखद !! माजी आमदार राजू पाटील का संतापले ?

तू दलित समाजाची आहेस, तुझ्यावर बलात्कार करतो ! अशा शीर्षकाखाली एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात वेगाने प्रसारित होतो आहे. व...
04/06/2025

तू दलित समाजाची आहेस, तुझ्यावर बलात्कार करतो ! अशा शीर्षकाखाली एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात वेगाने प्रसारित होतो आहे. व्हिडिओत एक पुरुष एका महिलेला दांडक्याने मारहाण करताना दिसतो आहे. या व्हिडिओवरून जनमानसात संतापाची लाट आहे. एखाद्या महिलेला भर रस्त्यात अशी मारहाण होते आणि पोलीस कारवाईत उदासीनता दाखवतात, ही गोष्ट कोणालाही चिड आणणारी आहे.

हा व्हिडिओ उंबरे वेळापूर इथला असल्याचं प्राथमिक माहिती मिळाली. हे गाव माळशिरस तालुक्यात येतं, जे पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे या व्हिडिओचं सत्यशोधन करण्यासाठी MediaBharat ने माळशिरस भागातील काही कार्यकर्त्यांना कॉल केले. त्यातून काही गोष्टी कळाल्या. त्यानंतर पोलीस उप विभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांचाही संपर्क क्रमांक मिळाला. त्यांच्याकडून काही माहिती मिळाली.

आरोपीचं नाव हरिश्चंद्र भोसले आहे. आरोपी आणि पीडित महिला एका गवंड्याच्या हाताखाली काम करतात. तिथे त्यांची ओळख झाली होती व वाढली होती. झालेली घटना त्याचाच पुढचा अंक असल्याची माहिती पुढे आलीय.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं तेव्हा वैद्यकीय तपासणीत त्याचा रक्तदाब वाढलेला असल्याने त्याला पोलिसांनी अटक केली नाही व रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं होतं. आताही आरोपी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे. पोलिसांची त्याच्यावर देखरेख आहे.

आरोपी बरा होताच त्याला अटक केलं जाईल, असं शिरगावकर यांनी सांगितलं. या प्रकरणात मारहाण, विनयभंग तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलमंही लावण्यात आलेली आहेत.

सदर प्रकरणात आम्ही सखोल तपास करत आहोत असं पोलिस म्हणताहेत..

प्रत्येक प्रशासकीय विभागाने आपल्या विभागाशी संबंधित असलेल्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये वैयक्तिक लक्ष घालून शासनाच्या वतीन...
20/05/2025

प्रत्येक प्रशासकीय विभागाने आपल्या विभागाशी संबंधित असलेल्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये वैयक्तिक लक्ष घालून शासनाच्या वतीने दाखल करण्यात येणारे शपथपत्र तातडीने / न्यायालयाने विहीत केलेल्या कालमर्यादेत दाखल होईल याची दक्षता घ्यावी तसंच एका विशिष्ट अधिकाऱ्यास किंवा विशिष्ट दर्जाच्या अधिकाऱ्यास शपथपत्र दाखल करण्याचे आदेश मा. न्यायालयाने दिले असतांना संबंधित अधिकाऱ्याने किंवा त्याच दर्जाच्या अधिकाऱ्याने ते शपथपत्र दाखल करणे अनिवार्य असेल आणि ती जबाबदारी प्राधिकृत करता येणार नाही, असे आदेश विधी व न्याय विभाग शासन परिपत्रक क्रमांकः ०२-२०२५/VIP/E अन्वये राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी जारी केले आहेत.

विधि व न्याय विभागाने न्यायालयात शासन /शासकीय अधिकाऱ्यांविरुध्द दाखल न्यायालयीन प्रकरणांमध्ये तत्परतेने व विहीत मुदतीत शपथपत्र, लेखी कथन / कैफियत दाखल करण्याबाबत सर्व मंत्रालयीन विभागांना सूचना दिलेल्या असतांनाही मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्र. २२४७/२०२५ व २२५०/२०२५ मध्ये २६ मार्च, २०२५ रोजीच्या आदेशान्वये शासनाच्या वतीने शपथपत्र दाखल करण्यास विलंब होत असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर सदरचे आदेश जारी झाले आहेत.

मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल रिट याचिका क्र. ८३३/२०१९ (श्री. सुनिल मडावी विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर) प्रकरणी २५ फेब्रुवारी, २०२५ व १२ मार्च, २०२५ रोजीच्या आदेशामध्ये न्यायालयाने शपथपत्र दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांसंदर्भात देखील असे निरीक्षण नोंदविले आहे की, एका विशिष्ट अधिकाऱ्यास शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश असताना ते अधिकारी सदर जबाबदारी इतर अधिकाऱ्यांना प्राधिकृत करतात. ही बाब शासकीय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा दर्शविणारी असल्याचं मुख्य सचिवांनी म्हटलं आहे.

उपरोक्त सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची खबरदारी प्रत्येक मंत्रालयीन विभागाने घ्यावी, तसेच आपल्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या देखील निदर्शनास आणावी. उल्लेखित सूचनांचे अनुपालन न झाल्यास शासनाकडून याची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही मुख्य सचिवांनी दिली आहे.

मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्र. ५७०५/२०२२ मध्ये दिनांक १३.०२.२०२३ रोजी आदेश पारित केले आहेत. मा. सर्वोच...
20/05/2025

मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्र. ५७०५/२०२२ मध्ये दिनांक १३.०२.२०२३ रोजी आदेश पारित केले आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने राज्यात ॲप बेस वाहनांसाठी समुच्चयक धोरण (Aggregators Policy) तयार करण्याकरिता दिनांक ०५.०४.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये श्री. सुधीरकुमार श्रीवास्तव, (सेवानृित्त भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती.

सदर समितीचा अहवाल, मोटार वाहन अधिनियम व नियमातील तरतूदी याअनुषंगाने महाराष्ट्र राज्यामध्ये समुच्चयक धोरण (Aggregators Policy) लागू करण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव मा. मंत्रिमंडळाच्या दिनांक २९.०४.२०२५ रोजी आयोजित बैठकीमध्ये मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता.

सदर प्रस्तावास मा. मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून त्यानुषंगाने शासन निर्णय क्रमांकाः एमव्हीवार-०८२१/प्र.क्र.९५/परि-२ नुसार, महाराष्ट्र राज्यात ॲप बेस वाहनांसाठी समुच्चयक धोरण (Aggregators Policy) लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

समुच्चयक धोरणामध्ये (Aggregators Policy) समाविष्ट बाबी पुढीलप्रमाणे आहेत :-

ॲग्रीगेटर करिता पात्रता -

(१) अर्जदार कंपनी कायदा १९५६ किंवा २०१३ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी असेल किंवा सहकारी संस्था कायदा १९१२ अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था असेल जी बालक किंवा मोटार वाहन मालकांनी किंवा अशा इतर संघटनांनी स्थापन केली असेल किंवा मर्यादित दायित्व भागीदारी कायदा २००८ अंतर्गत मर्यादित दायित्व भागीदारी असेल किंवा कंपनी कायद्यांतर्गत विशेष उद्देश वाहन म्हणून नोंदणीकृत संघ असेल.

(२) अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यात कार्यालय असावे.

(३) अर्जदाराने मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वांसह कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० अंतर्गत विहित केलेल्या सर्व लागू तरतुदींचे पालन करावे.

ॲप व संकेतस्थळ महाराष्ट्र राज्यात ॲप बेस वाहनांसाठी ॲग्रीगेटरकडे सुरक्षा मानकांची पुर्तता करणारे ॲप / संकेतस्थळ असणे आवश्यक राहील. तसेच सदरील सेवा या ॲप / संकेतस्थळ याद्वारे चालविण्यात याव्यात.

> सुरक्षितता वाहनांचे रिअल टाईम जीपीएस ट्रॅकिंग, आपत्कालीन संपर्क क्रमांक, चालकांची चारित्र्य पडताळणी करण्यात यावी. चालकांना त्यांच्या वाहन चालविण्याच्या परवान्याच्या नुतनीकरणाच्या वेळी मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रशिक्षण घेणे आवश्यक असेल. चालक व सहप्रवाशी यांच्यासाठी विमा असावा.

ऑटो रिक्षा/कॅब याकरिता प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निश्चित केलेले दर हे आधार दर असतील, मीटर टॅक्सीना अन्यायकारक स्पर्धेचा सामना करावा लागू नये यासाठी मागणी कमी असलेल्या वेळेत देण्यात येणाऱ्या सूटीचा दर हा फेरीच्या दराच्या २५% इतका मर्यादित करण्यात यावा. तसेच जास्त मागणी असलेल्या वेळेत दर १.५ पटीपेक्षा जास्त नसावेत. किमान फेरीचे अंतर ३ कि.मी. असावे.

चालकांना एकूण भाडे दराच्या किमान ८० टक्के रक्कम मिळावी.

तक्रार निवारण प्रवाशांना आणि चालकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे जलद निराकरण सुनिश्चित करण्यासाठी तक्रारींचे निवारण करण्यासाठीची यंत्रणा असावी.

फेरी रद्द करण्याबाबतचा दंड विनाकारण / अनावश्यक फेरी रद्द करण्याच्या वृत्तीला आळा घालणे आणि संबंधितांना सहज अनुभव मिळावा यासाठी फेरी रद्द करण्याच्या बाबतीत चालक आणि स्वार दोघांनाही दंड आकारण्याची तरतूद करण्यात यावी.

ॲपवर फेरी स्वीकारल्यानंतर चालकाने बुकिंग रद्द केल्यास, एकूण भाड्याच्या १०% किंवा रु. १०० यापैकी जे कमी असेल तो दंड आकारला जाईल आणि तो ॲपवरील ग्राहकाच्या वापरकर्ता खात्यात जमा केला जाईल. ॲपवर फेरी बुक केल्यानंतर प्रवाशाने वैध कारणाशिवाय फेरी रद्द केल्यास, एकूण भाड्याच्या ५% किंवा रुपये ५० यापैकी जे कमी असेल तो दंड आकारला जाईल आणि तो ॲपवरील चालकाच्या वापरकर्ता खात्यात जमा केला जाईल.

भारतीय सैन्य आणि सैनिक प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या चरणी नतमस्तक आहेत !! असली संतापजनक चाटुगिरी केलीय मध्यप्रदेशचे उपम...
16/05/2025

भारतीय सैन्य आणि सैनिक प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या चरणी नतमस्तक आहेत !! असली संतापजनक चाटुगिरी केलीय मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी.

16/05/2025

भाजपा नेता ब्रिज भूषण शरण सिंग यांनी म्हटलंय की जाती जनगणनेनंतर आमच्यासाठी स्वतंत्र देश बनेल !!

महाराष्ट्रातून लहानग्या मुली खुलेआम पळवल्या जाताहेत, अमानुषपणे झोडल्या जाताहेत, सामुहिक बलात्कार होताहेत...सरकारी रुग्णा...
07/05/2025

महाराष्ट्रातून लहानग्या मुली खुलेआम पळवल्या जाताहेत, अमानुषपणे झोडल्या जाताहेत, सामुहिक बलात्कार होताहेत...सरकारी रुग्णालयात बाळंतपणं होताहेत आणि देशातल्या देशात सरकारांना, तपास यंत्रणांना पत्ता लागत नाही, मुलींचा शोध लागत नाही, आरोपी सापडून येत नाहीत ! महाराष्ट्र तर झोपा काढतोय !!! या छळछावणीतून सुटका करून परतलेल्या मुलीने सांगितलं भयाण वास्तव | लिंक प्रतिक्रियेत

पहलगाम हल्ल्यानंतरचं पहिलं छायाचित्र वेगाने पसरवलं गेलं ते विनय नरवाल यांच्या शेजारी हताश बसलेल्या हिमांशी नरवाल यांचं. ...
05/05/2025

पहलगाम हल्ल्यानंतरचं पहिलं छायाचित्र वेगाने पसरवलं गेलं ते विनय नरवाल यांच्या शेजारी हताश बसलेल्या हिमांशी नरवाल यांचं. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या छायाचित्राचा गैरवापर करून देशांतर्गत विद्वेषाचं वातावरण पेटवण्याचा तो संघीभाजपाई हिंदुत्ववाद्यांचा प्रयत्न होता. तो मनसुबा हिमांशी नरवाल यांच्या वक्तव्यामुळे उधळला गेला ; त्यामुळे चिडलेल्या हिंदुत्ववाद्यांनी हिमांशी नरवाल यांच्याविरोधात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बदनामीची मोहिम सुरू केलीय. सरकार पातळीवर मात्र याबाबत आश्चर्यकारक तितकीच संतापजनक सामसूम आहे. | लिंक प्रतिक्रियेत

03/05/2025

हाणामारी गुंडांची, असुरक्षितता नागरिकांची !! पुण्यात बाईकस्वार जोडपं थोडक्यात वाचलं !!!

18/04/2025

भारताचं पासपोर्ट रॅन्किंग दिवसेंदिवस खाली खाली घसरत चाललंय. पण सरकारने पाळून ठेवलेले अक्षयकुमारसारखे सेलिब्रिटी वेगळंच सांगून लोकांची दिशाभूल करताहेत !!!

पश्चिम बंगालात मुस्लिमांकडून हिंदुंवर हल्ले होत असल्याच्या पोस्ट समाज माध्यमांत मोठ्या प्रमाणात पसरवल्या जात आहेत. हल्ल्...
17/04/2025

पश्चिम बंगालात मुस्लिमांकडून हिंदुंवर हल्ले होत असल्याच्या पोस्ट समाज माध्यमांत मोठ्या प्रमाणात पसरवल्या जात आहेत. हल्ल्याच्या घटना जर खऱ्या असतील तर पश्चिम बंगाल भाजपावर जुनी छायाचित्रं पसरवण्याची पाळी का यावी ? वक्फ सुधारणांविरोधातली प्रतिक्रिया पश्चिम बंगालातच का उमटली ? | लिंक प्रतिक्रियेत

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when MediaBharat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MediaBharat:

Share