Worldnet : Enjoy Happiness

Worldnet : Enjoy Happiness ''mindfulness.happiness.enjoyment.com'' is a website, Facebook & YouTube sites. for citizens; other than citizens of India.

Both are innovative, informative and interesting and for non-Indians only residing in the U.K., U.S.A., Australia, Canada, Germany etc..!! WORLD’S EDITORS AND WRITERS FORUM
Facebook sites: Enjoy Happiness, Rajeev Thatte
Websites: www.mumbaidinank.com, www.dreamsforever.in, www.mindfulness.happiness.enjoyment.com.

nal channels. The viewership of this YouTube channel or Facebook sites or websites is not for Indian citizens. "Enjoy happiness..!!" is a YouTube channel, Enjoy Happiness and Leena Gokhale Facebook sites, www.mumbaidinank.com, www.dreamsforever.in; are presenting, giving, covering and publishing articles that are written, contributed and or read by only foreigners, staying abroad. These sites are operated/viewed from countries like Canada, Australia, the U.S.A., the U.K., France, Germany, Russia, China etc. Translations of the contents of these sites are automatically done by Google into local languages, in the said respective countries. Editors, - Miss Leena Gokhale, Canada. - Miss Aarya Sathye, U.K. - Ravi Kelkar, U.S.A.
- All novels and articles are read and presented by Mr. Liladhar Gokhale, Canada or by Artificial Intelligence audio talkers abroad. Important:
This channel advertisement is given in India; pages and YouTube channels, for the purpose of recommending these channels, pages, and websites to foreigners only; by residents of India. It is not advertisements for the territory of the country, India.

{हा युट्युब व्हिडीओ चॅनल, फेसबुक साईटस, वेबसाईटस भारतीयांसाठी नाहीच. भारतीय नागरिकांनी या चॅनल वरील लेखाचे/कादंबरी/कथेचे/कवितांचे श्रवण, वाचन, मनन, चिंतन करू नये, ही आग्रहाची, नम्र विनंती.}

03/07/2025

एका सामान्य माणसाचे, विलक्षण आत्मचरित्र .!!
कॅलिडोस्कोप…!! भाग बारावा
लेखक: राजीव शांताराम थत्ते.
बी.फार्म.(युडीसीटी), एम.एम.एस.(जमानलाल बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज)
भाग बारावा
बदलापूरची फॅक्टरी
बदलापूरला एम.आय.डी.सी.मध्ये फॅक्टरी काढण्याआधी घरी एक प्रसंग घडला. मी जेव्हा फॅक्टरी काढायची असे घरच्यांना सांगितले. त्यावेळी घरी वातावरण तंग झाले.
‘माझे प्रोव्हीडंट फंड आणि ग्रॅच्युइटी जी मला रिटायर होण्याच्या वेळी मिळाली ती तू धंद्यात उडवून टाकणार आणि आम्ही आई वडिलांनी मग भिक मागत दारोदार फिरायचे असा तुझा विचार दिसतो आहे मला..’ बाबा मला म्हणाले.
मला ढसढसा रडायला आले.
‘बाबा तुमच्या कडून मला एक पैसाही नको, फक्त आशीर्वाद हवेत. मी पैसे कुठूनही आणेन पण तुमच्या पैशांना हात लावणार नाही. तुम्ही याची खात्री बाळगा.’ मी बाबांना सांगितले.
त्यादिवशी माझ्या नियोजित प्रकल्पाची माहिती थोडक्यात देणारी पोस्टकार्ड मी चौदा नातेवाईक व मित्रांना पाठवली. कै. सौ. मैनाबाई रानडे, कै. श्री. भालचंद्र खाडिलकर, माझे सासरे कै. श्री. केशव पाटणकर, माझा मित्र प्रा. मोहिनीराज सुतावणी व डॉ. विजय पेठे, माझा भाऊ अनिल व सुधीर इत्यादींनी मला पासष्ट हजार दिले. त्या पैशांवर १५% दर साल व्याज द्यायचे मी सगळ्यांना कबूल केले होते. तसे मी त्यांना मी वेळोवेळी दिलेही.
बाबांनी माझी पैसे उभे करण्याची जिद्द पाहून स्वतः पाच हजार रुपये दिले.
या सगळ्यांनी मला विश्वास ठेवून सहाय्य केले त्यांचा मी सदैव ऋणी राहीन. त्यावेळी माझ्याकडे एक पैसाही स्वतःचा नव्हता. सर्वांच्या कर्जावर मी धंदा उभा करू शकलो. आज त्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे माझे आद्य कर्तव्य समजतो.
*****
माझा विवाह
मी एम.एम.एस. झालो तरी बदलापूरचा कारखाना अजून चालू झाला नव्हता. ५ जुलै, १९८१ला मी संध्याशी विलेपार्ल्याला रजिस्टर लग्न केले. कै. श्री. श्रीराम खरे, माझा मित्र उदय कुलकर्णी हे दोघे साक्षीदार होते. विवाहाला रजिस्टर म्हणून श्री. खान आले होते. माझ्या भावाच्या गोवंडी येथे झालेल्या लग्नालाही तेच श्री. खान आले होते. आम्ही थत्ते मंडळींनी ‘आम्ही खोट्या रजिस्टर’ला आणले, असे संध्याच्या घरच्यांना सांगितले.
मी सासरयाकडून लग्नाला काही घेतले नसले तरी लग्नाला आलेल्या पाहुण्यांकडून मात्र आहेर स्विकारला.
आम्हाला एकूण आहेर एकशे चार रुपये मिळाला. आणि त्याच्यातही माझ्या जमनालाल बजाज मधल्या प्रा. तेंडुलकर सरांनी पंचवीस रुपये दिलेले धरले होते. त्यावेळी पैशांची किंमत किती जास्त होती, आणि त्याहि पेक्षा सगळ्यांचे जे प्रेम आम्हाला मिळाले ते ‘अनमोल’ होते..!!
*****
लाच देणाऱ्यांसाठी सारे काही
बदलापूरच्या कारखान्याच्या उभारणीसाठी मी ‘स्वच्छ’ पणे काम करायचे ठरवल्याने फारच अडचणी येत होत्या. एम.एस.एफ.सी.ने कर्ज मंजूर करूनही त्याच्या डीसबर्समेंट मध्ये अडचणी येत होत्या. त्यावेळी देखील प्रोजेक्टच्या एकूण कॉस्टच्या दहा टक्के ही रक्कम विविध परवाने, परवानग्या, रजिस्ट्रेशनस, लोन्स मिळणे, सबसिडी मिळणे या सगळ्यांसाठी ‘लाच’ म्हणून द्यावी लागायची. मला हे मान्य नव्हते.
‘तुम्ही मला लाच देण्यासाठी कर्ज द्या. मी ते फेडेन. पण आज लाच द्यायला माझ्याकडे पैसेच नाहीत.’ मी श्री. एस.एन. देसाई नावाच्या इंडस्ट्रीजच्या राज्यमंत्र्यांना सांगितले. तेव्हा त्या मंत्र्यांनी डोक्याला हात लावला होता, हे आजही मला आठवते.
त्यावेळी अंतुल्यांचे सिमेंट प्रकरण जोरात होते. सिमेंटच्या गोणीमागे लाच म्हणून पाच दहा रुपये मागितले जात. सिमेंटची एक गोणी पन्नास रुपयांना मिळायची. म्हणजेच १० ते २०% लाच मागितली जायची.
मला सिमेंट, परवाना मिळाल्याशिवाय मिळणे शक्य नव्हते. परवान्यासाठी ५-१० रुपये सिमेंटच्या गोणीमागे लाच देणे मला शक्य नव्हते. याला मार्ग काय?
एक दिवशी मी मंत्रालयात इंडस्ट्रीज सचिव श्री. मोहनी साहेबाकडे गेलो. अकरा वाजले असतील. मोहनी साहेब कुठल्यातरी मिटींगला निघाले होते. मी त्यांना नमस्कार केला. ते मिटींगला रवाना झाले. एक वाजता ते परत आले. मी अजूनही त्यांच्या ऑफिसच्या बाहेर बसून होतो. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि आत गेले. आतून पुन्हा बाहेर आले आणि दुसऱ्या मिटींगला निघून गेले. मी तिथेच बसून राहिलो. पाच वाजता ते परत आले तरी मी तिथेच बाहेर उभा होतो.
‘माझ्याकडे काही काम आहे का?’ मोहनीने विचारले.
‘मी एक मिनिट आपल्या केबिनमध्ये येऊ काय?’ मी नम्र पणे विचारले.
‘या..’ मोह्नींनी उत्तर दिले.
मी आत गेलो आणि मोहनीना सिमेंटची सगळी कहाणी सांगितली.
‘गोणीमागे मी १० रुपये लाच दिली असती पण मला त्यासाठी कोणी कर्ज देईल का हो..’ मी कहाणीचा शेवट केला.
‘तुम्ही आता घरी जा. उद्या सकाळी अकरा वाजता आमचा इंडस्ट्रीज डिपार्टमेंटचा इन्स्पेक्टर तुमच्या घरी बदलापूरला सिमेंटच्या चारशे गोण्यांचा परमिट घेऊन पोचेल. नाही पोचला तर मला फोन करा. हा माझा फोन क्रमांक…’ मोहनीनी मला आश्वासन दिले.
दुसऱ्या दिवशी बरोबर अकराच्या ठोक्याला इंडस्ट्रीज डिपार्टमेंटचा इन्स्पेक्टर चारशे गोण्यांचा परमिट घेऊन घराच्या दरवाज्यात उभा होता. हा तोच इन्स्पेक्टर होता जो माझ्याकडे लाच मागत होता.
मी परवाना ताब्यात घेतला. परवान्याच्या कोपीवर सही करून दिली.
‘थत्ते साहेब मला सांगायचे नाही का आमचे सेक्रेटरी साहेब तुमचे सख्खे मामा लागतात म्हणून. आम्ही आमच्या डिपार्टमेंटच्या माणसांना कधीच त्रास देत नाही.’
मोहिनीनी माझ्यावर उपकार केले होते. एक पैशाचीही लाच न देता मला ४०० गोण्या सिमेंट मिळाले होते. आणि तेही अन्तुल्यांच्या काळात..!!
लग्नाच्या आदल्या दिवशी २०० गोणी सिमेंटची डिलिव्हरी घ्यायची होती.
‘लग्नाच्या एक दिवस आधी तू घरच्या बाहेर असे रिस्क असलेले काम करण्यासाठी पडू नकोस. लग्नाच्या आदल्या दिवशी घरीच राहावे.’ घरच्यांनी मला सांगितले.
मी ते मानणार कसा?
मी लग्नाच्या एक दिवस आधी २०० गोण्या सिमेंटची डिलिव्हरी घेतली. त्यातही मला मुंबईहून बदलापूरला जाताना सिमेंटच्या गोणींची चोरी होईल असे वाटत होते. त्याचमुळे ड्रायव्हरच्या केबिनमध्ये क्लीनर, तर मी ट्रकवर सिमेंटच्या गोण्यांवर लक्ष ठेवत बसून मी, असा उन्हात प्रवास केला. सिमेंटच्या गोण्या बदलापूरच्या प्लॉटवर उतरवल्या आणि संध्याकाळी सहा वाजता रिकाम्या ट्रक मध्ये बसूनच मी परत आलो.
आज सदुसष्ठ वर्षांचा झालो असताना मी हे काम याच पद्धतीने करेन?
अजिबात नाही.
मला कोणी, कोणते काम आणि कसे करायचे ते आता समजले.
वयाच्या एकवीस- बावीस वर्षांचा असताना ते तसे शक्यही नव्हते.
मी त्यावेळी अनिलचे ‘पत्रकार’चे कार्ड घेऊन अनेकांना भेटायचो. अनिललाही, ‘आपले बंधू आले होते’ असे कोणी जर सांगितले, तर तोही ‘मला राजीव म्हणाला होता. काय शक्य असेल ती मदत त्याला करा’ असे सांगायचा. खरे तर मी त्याचे कार्ड कशासाठी आणि कोणाला दिले, हे त्यालाही माहिती नसायचे. आणि तो मला कधी त्या विषयी विचारतही नसे.
एम.एस.एफ.सी.त श्री. श्रीराम खरे हे ‘जन संपर्क अधिकारी’ म्हणून होते. त्यांचे, अनिलचे आणि त्यांचे माझेही संबध चांगले होते. एम.एस.एफ.सी.त कर्ज मिळेनासे झाले कि अखेरचा उपाय म्हणून मी त्यांना सांगत असे आणि ते चेअरमनला सांगून रिजनल मेनेजर श्री. यादवांना फोन करायचे आणि माझे जेन्युईन मिळणारे कर्ज वितरीत व्हायचे.
एकदा मला श्री. यादवांनी ‘तुम्ही चेअरमन कडे एवढी छोटी कामे घेऊन का जाता. माझ्या ऑफिसचा स्टाफ आहेना तुमच्या मदतीला.’ म्हणून सांगितले.
‘चार महिने झाले मी सगळी कागदपत्रे दिली आहेत, मग मला लोन का मिळत नाही हे तुमच्या स्टाफला कधी तुम्ही विचारले का? त्यांच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही. म्हणून माझ्या प्रपोजलला ‘बाजूला’ ठेवले जाते, मग मी तुमच्या चेअरमन कडे जातो. याला काही मार्ग तुम्ही सुचवू शकता का?’ मी यादवांना विचारले.
यादवांचे ऑफिस त्यावेळी कुलाब्याला होते. बदलापूरहून कुलाब्याला पोचायला तीन तास जायला आणि तीन तास पुन्हा परतायला लागायचे. दोन लाखांच्या लोनसाठी मी शंभराहून अधिक वेळा त्याच्या ऑफिसला गेलो. सहाशे तास म्हणजे ७५ वर्किंग डेज मी घालवले. तेव्हा कुठे मला दोन लाखांचे कर्ज मिळाले.
हे मी १९८१-८२ मधले सांगतो.
हल्ली फायनान्शियल इंस्टीट्युटची, बँकांची काय परिस्थिती असेल. त्याची कल्पनाच केलेली बरी. आज दोन लाख कोटींची ‘नॉन पर्फोमिंग असेट्स’ बँकांत दिसतात. यात भ्रष्टाचाराचा १००% वाटा आहे, आणि त्याला जबाबदार उद्योजक आणि अधिकारी ही आहेत हेच सत्य आहे.
ही एम.एस.एफ.सी. अशाच कर्मचाऱ्यांमुळे पुढे ‘बुडली’ हे वेगळे सांगायला नको.
असो.
बदलापूरच्या फॅक्टरीची बिल्डींग २००० चौरस फुट बांधून होत आली होती. लिक्विडस, सिरप सेक्शन आणि कॅप्सूल सेक्शन असे दोन विभाग फॅक्टरीत होते. सगळी मशिनरी आणली. जमीन रु. २५,०००, बिल्डींग रु. २,००,०००, आणि मशिनरी रु. १,५०,०००, असा एकूण तीन लाख पंचाहत्तर हजार रुपयांचा प्रोजेक्ट उभा राहिला.

03/07/2025

एका सामान्य माणसाचे, विलक्षण आत्मचरित्र .!!
कॅलिडोस्कोप…!! भाग अकरावा
लेखक: राजीव शांताराम थत्ते.
बी.फार्म.(युडीसीटी), एम.एम.एस.(जमानलाल बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज)
भाग अकरावा
जमनालाल बजाजचे दुसरे वर्ष
बजाजला दुसऱ्या वर्षात गेल्यावर मला आपण काही कुठे ‘नोकरी’ करू शकणार नाही, याचा अंदाज आला. याला ग्लॅक्सोतले दोन महिन्याचे ट्रेनिंग ही कारणीभूत ठरले.
ग्लॅक्सो मध्ये एम.एम.एस.च्या पहिल्या वर्षाच्या शेवटी ट्रेनिंगसाठी गेलो. त्यांनी पहिले आठवडाभर कॉम्प्यूटरवर बसवले आणि डाटा एन्ट्रीचे काम दिले. त्यावेळी ‘मॅनेजमेंट’ कॅन्टीन मध्ये आम्ही विनामुल्य जेवण करायचो. पण आसपासचे वातावरण बघून, मला कामाला उत्साह येईना.
ग्लॅक्सो मध्ये मधल्या जेवणाच्या सुट्टीत मी एकदा आमचा बी.फार्म.चा मित्र ओक, जो ग्लॅक्सोत ‘एप्रेंटीस’ म्हणून लागला होता, त्याला शोधत प्रोडक्शन एरियात गेलो. निळे कपडे, तोंडाला मास्क अशा अवस्थेत एक माणूस प्रोडक्शन एरियात ड्रम घेऊन जात होता.
‘तुम्ही ओक साहेबांना ओळखता का?’ मी समोरच्या व्यक्तीला प्रश्न केला.
‘अरे थत्ते, तू इथे कुठे?’ समोरच्या व्यक्तीने तोंडावरचा मुखवटा काढून टाकला.
तो तर माझा मित्र ओकच होता.
पुढे हा ओक पुढे प्रोडक्शनचा व्हाईस प्रेसिडेंट हि झाला असेल.
कोण जाणे..!!
शेवटी मी ग्लॅक्सोतले ट्रेनिंग बंद केले आणि अंबरनाथच्या एका लघुउद्योजकाकडे काम करायला लागलो. त्यांचे नाव श्री. कुलकर्णी होते व अंबरनाथला पूर्वेला त्यांचा औषध निर्माणाचा कारखाना होता. त्यांच्या कडून एका लघुउद्योगाला पाहिजे ती माहिती मिळाली आणि तिथेच पहिल्या पिढीतल्या एका उद्योजकाचा जन्म झाला..!!
बजाजला एमएमएसला असताना दुसऱ्यावर्षी माझा कॉलेजातला अटेंडंन्स कमी झाला कारण बदलापूरला मी एम.एस.एफ.सी.च्या ‘तरुण तंत्रज्ञ सहाय्य योजने’खाली तीन लाखांच्या प्रोजेक्टला सुरुवात केली होती. रुपये पंचवीस हजारांचा, ५५५ चौरस मिटर प्लॉट, बदलापूर एम.आय.डी.सी. मध्ये घेतला होता. त्यावर बिल्डींग बांधायला सुरवात होत होती. माझे वडील, आई आणि मी असे तिघे जण बदलापूरला राहायला गेलो होतो. माझे एमएमएस आणि छोटासा प्रकल्प असे दोन्हीही कामे चालू होती. वर्गातल्या काही मित्रांना या प्रकल्पाची माहिती असली तरी संपूर्ण वर्गाला नव्हती.
आम्हाला प्रा. शिवानंद मंकेकर, जे हल्ली ‘हजारो कोटी’चेच मालक आहेत, बजाज मध्ये फायनान्स शिकवायला होते. त्यांची लेक्चर्स अटेंड करणे एका छोट्या कारखान्याचा ‘होणारा’ मालक असल्याने मला इच्छा असूनही अशक्य व्हायचे.
मी घरीच त्यांच्या विषयांचा अभ्यास करायचो पण त्यांची लेक्चर्स अटेंड करणे मला जड जावू लागले.
परीक्षा आली. मी परीक्षेला बसलो.
‘थत्ते तू पेपर लिहू नकोस. मी तो तपासणार नाही. तुझा अटेन्डंस माझ्या लेक्चर्सना पुरेसा नव्हता. नथिंग डुइंग..’ प्रा. शिवानंद मंकेकर मला म्हणाले.
‘सर मी घरून अभ्यास करून आलो आहे. तीन तासांचा वेळही मी परीक्षेसाठी राखून ठेवला आहे. मी पेपर सोडवतो. तुम्हाला योग्य वाटल्यास तो तपासा. नाही तर सोडून द्या.’ मी सरांना उत्तर दिले.
मी त्या दिवशी पेपर सोडवला. आणि कामाच्या व्यापात हा प्रसंग विसरून गेलो.
काही दिवसांनी माझ्या मित्रांनी मला ‘कॉन्ग्रॅच्युलेशनस’ दिली.
‘कारे. काय म्हणून?’ मी विचारता झालो.
‘प्रा. शिवानंद मंकेकरनी तुला पास केले. आम्ही सगळ्यांनी त्यांचे पेपर,त्यांची लेक्चर्स अटेंड करूनही, एवढे वाईट सोडवले होते कि बाजूला ठेवलेला तुझा पेपर त्यांनी शेवटी तपासायला घेतला. तू त्यांची लेक्चर्स अटेंड न करताच तू एवढे चांगले लिहिलेस, कि त्यांनी तुला बी प्लस देवून पास केले आणि क्लास मध्ये सगळ्यासमोर हि हकीकत सांगितली.’ मित्रांनी मला सांगितले.
पण माझी काही प्रा. शिवानंद मंकेकरांना भेटायची हिम्मत झाली नाही.
हेच मंकेकर सर मला दोन वर्षांनी श्रीनगरच्या सेंटॉर हॉटेलमध्ये बायको सकट भेटले. माझीही बायको बरोबर होती. बरोबर माझा मुलगा, आशुतोष हि होता. मंकेकर सरांशी गप्पा झाल्या. पण तेव्हाही तो विषय काढायची हिम्मत मला झाली नाही.
पुढे माझ्या मुलाला, आशुतोषला, वेलिंगकर कॉलेजात एम.एम.एस. करीत असताना प्रा. शिवानंद मंकेकर व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून आले, तेव्हा ही हकीकत, त्याला सांगितली.
‘प्रा. शिवानंद मंकेकर सरांबरोबर तुम्ही असे वागलात?’ प्रा. शिवानंद मंकेकरांविषयी अत्याधिक आदर दाखवत आशुतोष म्हणाला.
*****
बदलापूरचा प्रकल्प
मी बदलापूरचा प्रकल्प जेव्हा हातात घेतला त्यावेळी सुधीरचा मित्र श्री. गावकर म्हणून विक्रोळीला रहात होता. त्याचा भाऊ टेक्स्टाईल को ओपरेटीव्ह संघटनेत प्रोजेक्ट कन्सल्टंट म्हणून काम करीत होता. त्यांनी माझा बदलापूरचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला. त्याचे त्यांच्याच क्लार्क कडून टायपिंग करून दिले.
‘याचे कन्सल्टन्सी चार्जेस किती द्यायचे.’ मी अडखळतच विचारले.
‘तू स्वतःच्या खिशातून देणार ना? मग मला आणि माझ्या क्लार्कला मस्त चहा पाज..’ गावकारांनी मला सांगितले. त्यांनीच सगळ्यांसाठी चहा मॉनेको बिस्किटे मागवली आणि स्वतःच त्याचे पैसे दिले.
माझ्या प्रोजेक्टला त्यांनी स्वतःच काम करून वर शुभेच्छा ही दिल्या होत्या. असे किती ‘श्री. गावकर’ माझ्या नशिबात अनाहूतपणे परमेश्वरानी आणले, कोण जाणे!
पुढे मी आयुर्वेदिक औषधांची निर्मितीचा कारखाना काढल्यावरही, कन्नमवार नगरमध्ये बिल्डींग नंबर १४३ ब्लॉक ४३०५, याच ठिकाणी राहात असे.
त्यावेळी महिंद्राची पिएजिओ जीप मी घेतली होती.
ती मी स्वतःच चालवायचो.
एकदा विक्रोळीच्या सिग्नलवर एका ट्राफिक हवालदाराने लिफ्ट देता का म्हणून मला विचारले. मी, जीप – गाडी, पोलिसांना लिफ्ट द्यायला नेहमीच थांबवतो. तशीच या वेळीही मी थांबवली. हवालदार गाडीत बसल्यावर त्याच्या माझ्या गप्पा सुरु झाल्या. शेवटी विषय हवालदार भरतीत होणाऱ्या ‘किती पैसे भरतीच्या वेळा द्यावे लागतात’ वर आला. ‘मी थोडा गरीब घरातला होतो त्यामुळे साठ हजार रुपये दिले. मध्यम वर्गीय असतो तर दोन लाख खर्च केला असता तर सब इन्स्पेक्टर झालो असतो’ तो हसत म्हणाला. इतरही अनेक विषयांवर गप्पा झाल्या. थोड्या वेळानी हवालदाराला चेंबूरच्या सिग्नलला उतरायचे होते.
हवालदार खाली उतरला आणि त्याने मला सलाम केला.
‘राजीव, मला ओळखले काय? मी तुझ्या वर्गात विद्यामंदिरला शाळेत होतो. इतका वेळ मित्रासारख्या गप्पा मारल्यात. शेवटी ठरवले तुला खरे ते सांगायचे म्हणून बोललो.’ हवालदार म्हणाला.
आता माझी आश्चर्यचकित होण्याची वेळ होती.
मी जीप बाजूला उभी केली आणि एका प्रिय मित्राबरोबर मस्त चहा घेतला. तो माझा आगळा वेगळा दिवस होता.
आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखा..!!

03/07/2025

एका सामान्य माणसाचे, विलक्षण आत्मचरित्र .!!
कॅलिडोस्कोप…!! भाग दहावा
लेखक: राजीव शांताराम थत्ते.
बी.फार्म.(युडीसीटी), एम.एम.एस.(जमानलाल बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज)
भाग दहावा
इतर एक्टीविटीज आणि माझे प्रेम प्रकरण
बजाजच्या शेजारीच आकाशवाणीचा स्टुडीओ होता. आकाशवाणीवर कार्यक्रमांची मोठी संधी मला श्री. जयंत एरंडे आणि श्री. किशोर कुलकर्णी यांनी दिली. माझ्या आयुष्यात एक आत्मविश्वास येण्यात या दोघांचा मोठाच सहभाग होता.
बजाजला पहिल्या वर्षात असताना मला ‘संध्या’ची आठवण झाली. आता ‘महारोग’तूनही मी मुक्त झालो होतो.
मी अनिल – भारतीकडे संध्याचा विषय काढला. त्यांनी दोघांनीही काहीच प्रतिसाद दिला नाही. मी संध्या पार्ल्याला पूर्वेला राहते एवढे ऐकून होतो. पार्ल्याच्या सेंटॉर हॉटेलच्या जवळपास राहते अशी कल्पना होती. पण म्हणजे ‘कुठे’ हे शोधणे अवघड होते.
एक दिवस मी पार्ल्याला पूर्वेला गेलो. सेंटॉर हॉटेलच्या दिशेने चालू लागलो. खादीचे कपडे. त्यात उन्हाळा. गुजराथ सोसायटीच्या जवळ आलो. त्याच्या शेजारीच हॅपी होम सोसायटीचा बोर्ड पहिला.
बाहेर एक केमिस्ट नेहरू रोडवरच होता. मी डेअरिंग करायचे ठरवले.
‘इथे पि.डब्यु.डी. मधले पाटणकर कुठे राहतात?’ मी विचारले.
‘तुम्ही कोण?’ मराठी केमिस्टने प्रश्न विचारला.
‘मी त्यांचा पुतण्या.’ मी ठोकून दिले.
‘हॅपी होम सोसायटीच्या आत मध्ये. शेवटचा बंगला आहे. तोच पाटणकरांचा.’ केमिस्टला मी धन्यवाद दिले आणि ‘एकवीस’ वर्षांचा मी हॅपी होम सोसायटीत शिरलो.
शेवटचा बंगल्यावर ‘श्री. केशव द. पाटणकर’ असा बोर्ड होता.
मी बंगल्यात शिरलो. पहिल्या मजल्यावर श्री. पाटणकर राहत होते.
मी वर गेलो आणि घराची बेल वाजवली.
दोन मिनिटे गेली. आतून एक मध्यमवयीन बाई आल्या.
‘कोण पाहिजे तुम्हाला?’ बाईंनी मला प्रश्न केला.
‘मी राजीव थत्ते. संध्या पाटणकर इथेच राहतात काय? त्यांना भेटायला आलो आहे.’ मी माहिती दिली.
आतून दरवाजा उघडला गेला. आणि मला ‘आत या.’ म्हणून सांगितले.
मला भीती अजिबातच वाटत नव्हती. पण पुढे काय बोलायचे याचेही कोणतेही नियोजन केलेले नव्हते.
‘काय काम होते?’ सौ. पाटणकरांनी विचारले.
‘मी रेडीओ साठी एक प्रोग्राम करतो आहे. त्या विषयी तिच्याशी बोलायचे आहे. आहेत का घरी?’ मी. खरे तर मी चक्क खोटे बोललो होतो कारण त्यावेळी कुठलाच प्रोग्रॅम मला आकाशवाणीवर करायचा नव्हता.
‘नाही. तिने नुकतीच ‘बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स’ला अॅडमिशन घेतली. तिचे कॉलेजही सुरु झाले.’ संध्याच्या आईने माहिती दिली.
‘ठीक आहे. मी कॉलेज मध्ये भेटतो. कुठल्या कॉलेजात जाते?’ मी मोठ्या उत्सुकतेने प्रश्न विचारला.
‘ती युनिव्हर्सीटीत जाते. तुम्ही तिला तिथेच भेटा आणि विचारा तिला शक्य आहे का रेडीओ साठी काम करणे.’ संध्याच्या आई म्हणाल्या.
‘बर मी तिथेच भेटतो. आणि त्यांना विचारतो.’ मी काही तरी बोलायचे म्हणून बोललो.
मी बंगल्याच्या बाहेर पडलो. संध्याला भेटायची परवानगी तर मिळाली होती.
मी दुसऱ्या दिवशी मी आकाशवाणीवर गेलो आणि श्री. जयंत एरंडेना भेटलो.
‘बऱ्याच दिवसात काही कार्यक्रम दिला नाहीत.’ मी ‘पुडी’ सोडायला सुरवात केली.
‘अरे, आताच मी तुझाच विचार करीत होतो. या आठवड्यात ‘वनसप्ताह’ आहे. त्यासाठी एक कार्यक्रम करायचा आहे. करणार का?’ श्री. एरंडेनी विचारले.
‘अवश्य. स्क्रिप्ट मी लिहीन पण सादर करायला एका मैत्रिणीला संधी देईन.’ मी.
‘कारे, मैत्रिण वगैरे कोणी नवीन आणलीस काय?’ श्री. एरंडेनी हसत हसत विचारले.
मी ही ‘नाही तसे काही नाही’ असे म्हणालो पण श्री. एरंडे समजून गेले.
मी स्क्रिप्ट लिहिले आणि संध्याला भेटायला युनिव्हर्सिटीत गेलो.
‘संध्याकाळी चार वाजता मी सुटेन त्यावेळेला तू ये.’ संध्या मला चक्क ‘अरे.. तुरे..’ करत होती आणि मी तिला ‘अहो.. ‘ वगैरे म्हणत होतो.
संध्याकाळी मी चार वाजता तिला भेटलो. आकाशवाणीवरच्या कार्यक्रमाची कल्पना दिली.
‘उद्या सकाळी अकरा वाजता रेकॉर्डिंग आहे.’ मी तिला सांगितले.
‘ठीक आहे. मी कुठे भेटू?’ संध्याने विचारले.
‘युनिव्हर्सिटीतच भेटू या. मग आकाशवाणीच्या स्टुडीओ वर जावू.’ मी संध्याला सांगितले.
मी लिहिलेले स्क्रिप्ट तिला दिलेच नाही.
घरी गेलो आणि स्क्रिप्ट पुन्हा लिहायला घेतले.
‘मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे, मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे…’ कार्यक्रमाची सुरवात या कवितेनी केली आणि वेगवेगळ्या कविता ज्या शृंगारिक होत्या अशा ठीक ठिकाणी पेरल्या.
कार्यक्रमाचा विषय ‘वनसप्ताह’ होता तरी कार्यक्रम मात्र शृंगारिक, तरीही उत्तम झाला होता.
दुसऱ्या दिवशी सकाळीच संध्या मला युनिव्हर्सिटीत भेटली.
तिथून तिला आकाशवाणीच्या स्टुडीओत घेऊन गेलो.
श्री. एरंडे यांनी स्क्रिप्ट वाचले आणि संध्याकडे दिले. संध्याने संपूर्ण रेकोर्डिंग पूर्ण केले.
‘चांगली निवडलीस. गुड चॉईस..’ संध्याकडे स्टुडीओच्या काचेतून पहात श्री. एरंडे उद्गारले.
मी संध्याला चर्चगेट स्टेशनवर सोडून दिले. आणि विक्रोळीच्या घरी परतलो.
दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता कार्यक्रमाचे प्रसारण होते.
मी आई आणि बाबा तिघे रेडीओ लावून कार्यक्रम ऐकायला बसलो.
कार्यक्रम झाला.
‘वा. चांगला झाला.’ आई म्हणाली.
‘निवेदिकेने कसे वाचन केले?’ मी उत्सुकतेने विचारले.
‘चांगले वाचले. त्यांची नेहमीची कोणीतरी असेल ना?’ आई उद्गारली.
‘तिचे नाव सांगितले, ते ऐकले नाहीस का?’ मी.
‘संध्या पाटणकर नाव सांगितले.’ आई म्हणाली.
‘संध्या म्हणजे भारतीने जी मैत्रिण मला दाखवली तिच ही…’ मी म्हणालो.
‘तरी मला वाटलेच कि खादीचे कपडे नेहमी घालणारा राजीव नवीन सिंथेटिक कपडे घालून रेकॉर्डिंगला कसा गेला. हेच तुम्हाला शिकवतात का एम.बी.ए.ला?’ आईने हसत हसत मला प्रश्न केला.
‘आई, मी संध्याला आपल्या घरी बोलावू का?’ मी आईला रेडीओ वरच्या कार्यक्रमाचे ‘गुडविल’ डोक्यात ठेऊन प्रश्न केला.
‘पुढल्या आठवड्यात यायला सांग घरी…’ आई उद्गारली.
मी प्रेमाची लढाई कशी तरी जिंकलो होतो..!!
पुढल्याच आठवड्यात संध्याला मी ‘प्रेम’ व्यक्त केले व लग्नाविषयी विचारले. तिनेही लग्नाला होकार दिला. फक्त लग्न दोन वर्षांनी करायचे असे ठरवले.
कारण माझेही एम.एम.एस. व्हायचे होते. आणि संध्याही आता एम.ए.ला अॅडमिशन, माझ्या सांगण्यावरून, घ्यायला तयार झाली होती.
दुसऱ्या दिवशी मी संध्याला घरी बोलावले.
मी दिवसभर वाट पहात होतो, ‘संध्या’काळ कधी होते त्याची..!!
संध्याकाळी पिवळी सिल्कची साडी नेसून संध्या आली.
आईने तिला ‘पसंद’ केले. बाबांची आध्यात्मिक पातळी एवढी वाढली होती कि त्यांनी संध्याला आशीर्वाद दिला.
थत्ते खानदानाला आता तिसरी ‘होणारी’ सून मिळाली होती..!!

03/07/2025

एका सामान्य माणसाचे, विलक्षण आत्मचरित्र .!!
कॅलिडोस्कोप…!! भाग नववा
लेखक: राजीव शांताराम थत्ते.
बी.फार्म.(युडीसीटी), एम.एम.एस.(जमानलाल बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज)
भाग नववा
संध्याचा परिचय
मी बी.फार्म.च्या शेवटच्या वर्षाला असताना माझी वहिनी, सौ. भारती, दादरच्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वाचनालयात अभ्यासाला जायची. ती बी.ए. मराठी करीत होती. एक दिवस भारतीने ‘संध्या पाटणकर नावाची सुरेख दिसणारी मुलगी बी.ए.च्या अभ्यासाला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वाचनालयात येते. ती सुंदर आहे. किंचित बुटकी, पांच फुट उंचीला, पार्ल्याला राहते. वडील पिद्ब्यूडी मध्ये इंजिनियर आहेत. तुला पसंत पडेल असे वाटते. पाहिजे तर एकदा येऊन बघ.’ मला सांगितले.
‘सुंदर म्हणजे किती सुंदर?’ मी गमतीने विचारले.
‘किंचितशी मधुबाला सारखी दिसते.’ भारती उद्गारली.
दुसऱ्याच दिवशी ‘एको बुलेटीन’ नावाच्या यु.डी.सी.ती.च्या वार्षिकाचा अंक प्रकाशित होत होता. त्याचा मी संपादक होतो. त्यात माझ्या कथा, कविता छापून आल्या होत्या.
मी प्रिंटर कडून ‘एको बुलेटीन’चा पहिला अंक घेतला आणि संध्याला भेटायला गेलो. सौ. भारतीही त्यावेळी तिथेच होती. मी भारतीला प्रथम भेटलो.
‘थांब, मी तुझी संध्याशी ओळख करून देते.’ भारती म्हणाली.
मी खरे तर संध्याला ‘बघायला’च आलो होतो.
संध्या बाहेर आली. एवढेसे खांद्यापर्यंत येणारे कुरळे केस, नाजूक चेहरा, गोरी, सरळ तजेलदार नाक, रंगीत शर्ट, बेल बॉटम पँट, प्रसन्न हास्य.. संध्या मला फारच आवडली.
मी ‘एको बुलेटीन’चा अंक संध्याला दिला. सौ. भारतीला द्यायला माझ्याकडे दुसरी प्रत नव्हती.
‘तुला मी नंतर देईन.’ मी भारतीला म्हणालो.
‘काहीच हरकत नाही. तू संध्याला द्यायला अंक आणला आहेस, तर तो तिलाच दे.’ भारती म्हणाली.
आणखी काही बोलण्यासारखे नव्हते.
मी एकदा पुन्हा संध्याला डोळे भरून बघितले. आणि यु.डी.सी.टी.ला परत आलो.
घरी आल्यावर भारतीने विचारले, ‘कशी काय वाटली संध्या?’
‘सुंदर. मला पसंत आहे.’ मी उद्गारलो.
‘कोणा विषयी बोलताय?’ आईने प्रश्न विचारला.
‘भारतीने मला एक मुलगी दाखवली. सुंदर आहे. मी तिच्याशी लग्न करायचा विचार करतोय.’ मी आईला सांगितले.
‘आता तू एकवीस वर्षांचा होणार. येवढ्यात तू लग्न करायला लागलास? आधी मास्टर्स डिग्री करायची. मग नोकरी पकडायची. आणि मग लग्नाचा विचार करायचा. आणि भारती तुही लक्षात ठेव. तुमच्या नवऱ्यांना मास्टर्स डिग्री पास झाल्यावरच लग्नाची परवानगी दिली. राजीवच्या बाबत मला कोणतीही घाई केलेली चालणार नाही. आणि या विषयी या घरात पुन्हा चर्चा नको. समजले ना काय म्हणतेय ते.’ भारतीने मान हलवली आणि माझा लग्नाचा विषय तिथेच बारगळला..!!
*****
‘महारोग’
यु.डी.सी.टी.तून बी.फार्म. होण्याच्या सुमाराला एक विचित्र घटना घडली.
त्यावेळी अचानक माझ्या बोटांची नखे ‘झडायला’ लागली. निदान मला तरी तसे वाटले.
त्याच वेळी माझा दुसरा मोठा भाऊ सुधीरचे, नंदिनीशी लग्न ठरले होते. हा ही ‘प्रेमविवाह’च होता. अंगावर लाल चट्टे उठायला लागले. मी मेडिकलची पुस्तके वाचली आणि त्यावरून निष्कर्ष काढला कि मला ‘महारोग’ झाला आहे.
मी बी.फार्म.ला फर्स्टक्लास मिळवला होता. ५ जुलै, १९७९ला सुधीरचे लग्न ठरले होते. ते लग्न आटपायचे. आई बाबाच्या पायावर बी.फार्म.चे फर्स्टक्लासचे डिग्री सर्टीफिकीट ठेवायचे आणि हिमालयात तपस्या करायला निघून जायचे असे मी मनात ठरवले.
सुधीरचे लग्न झाले. लग्नातली पाहुणे मंडळीही पांगली आणि मी आता हिमालयात प्रयाण करायचा दिवस आला.
मी सहज विचार केला कि आपल्याला ‘महारोग’ झाला आहे हे सगळ्या लक्षणांवरून दिसतेच आहे. पण डॉक्टरांकडे एकदा जाऊन यायला काय हरकत आहे?
मी सायनला डॉ. पारेख म्हणून ‘स्कीन स्पेशालीस्ट’ होते, त्यांना दाखवायला गेलो. त्यांनी मला तपासले. बोटे तपासली. डाग पडले होते तिथे पाहिले. शेवटी भिंगातून पहिले.
‘बेटा. तुम नाखून खाते हो क्या?’ डॉक्टरांनी मला विचारले.
‘हा. जब भी जादा सोचता हुं तो नाखून खाता हु.’ मी इनोसंट पणे सांगितले.
‘मै लिखके देता हु तुम्हे ‘लेप्रसी’ याने तुम जिसे ‘महारोग’ कहते हो, नही हुआ है. ये तो सिर्फ स्कीन इन्फेशन है, जो आठ दिनमे पुरा ठीक हो जायेगा. प्लिज बिलीव्ह मी.’ डॉ. पारेख म्हणाले.
मी त्यांनी दिलेले औषध आणि गोळ्या सायनच्या केमिस्ट कडून विकत घेतल्या. आठ दिवसात मी पूर्ण बरा झालो.
आणि देश, माझ्या रुपात, एका हिमालयात योग साधना करणाऱ्या, एका योग्याला मुकला..!!
मी पुन्हा पुढील शिक्षणाला लागलो.
*****
एम.एम.एस. जमनालाल बजाज इंस्टीट्युट
एमएमएसला जमनालाल बजाजला इंस्टीट्युटला अॅडमिशन घेतली.
१९७९मध्ये रिटन टेस्ट,ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यू सगळे पार पडले आणि मला अॅडमिशन मिळाली.
पण हे सगळे ‘मेरीट’ वर पार पडले असे म्हणणे म्हणजे ‘मेरीट’वर जे येतात त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल.
बजाज मध्ये ५०% मुले हि ‘रिझर्व कॅटेगीरीतून’ येतात म्हणजे त्यांचा आणि ‘मेरिट’चा तसा संबंध नसतो. ५०% ‘जनरल कॅटेगीरीतून’ येतात. आमच्यावेळी एकूण पन्नास विद्यार्थी जमनालाल बजाज मध्ये आले. म्हणजे २५ विद्यार्थी ‘रिझर्व कॅटेगरीतून’ आले तर २५ विद्यार्थी ‘जनरल कॅटेगरीतून’ आले.
मी जनरल कॅटेगरीतून प्रवेश केला.
बजाजला अॅडमिशन घ्यायचे निदान तसा प्रयत्न करायचे ठरले, त्याच सुमाराला माझा मित्र प्रा. मोहिनीराज सुतवणी याच्याशी ‘कन्नमवार नगर दोन ते विक्रोळी रेल्वे स्टेशन’ या वीस मिनिटांच्या ‘बस रूट’ मध्ये या विषयी चर्चा झाली.
‘राजीव, बजाजला जी मुले विद्यार्थी म्हणून जातात त्यातल्या जनरल कटेगरी आणि रिझर्व कॅटेगरी दोन्हीचा तू गेल्या दहा वर्षाचा अभ्यास केलास तर तुला ९०% मुले हि बड्या घरातली किंवा बड्या घराण्यातली दिसतील. त्यांचे कुठे, कोण आणि कसे काम होते ते त्यांनाच माहिती. या संदर्भात कोण काही बोलत नाही आणि आणि कोणी हा विषय बाहेर येऊ देत नाही.’ मोहिनीराज म्हणाला.
‘पण आपल्याला हे कसे कळणार?’ मी त्याला प्रश्न केला.
‘तू कोणा इंडस्ट्रीयालीस्टचा मुलगा नाहीस. ना कोणी सरकारी सेक्रेटरी – चेअरमन – मंत्री तुझा नातेवाईक आहे. तुझे वडीलही रुपये चारशे पगारावर सेवा निवृत्त झाले. तू एका स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहेस, पत्रकाराचा भाऊ आहेस आणि यु.डी.सी.टी. सारख्या विख्यात संस्थेतून बी. फार्म. पास झाला आहेस, एवढीच काय ती तुझी पुण्याई.
तू परीक्षा दे, इंटरव्हयु दे, ग्रुप डिस्कशन मधेही हिरीरिनी भाग घे.
आणि शिवाय मंत्राच्या ‘वशिल्या’ची जादू अनुभव.
जर तुला यश मिळाले तर जसे इतर कोणी वर्गात आपण रिझर्व्हड कॅटेगरीतून आलो कि जनरल कॅटेगरीतून आलो हे सांगत नाहीत तसेच तुही ‘मंत्र्यांच्या वशिल्याने’ आलो असे कोणाला सांगू नकोस. काय होते ते पहा. शेवटी तुला उद्योजक व्हायचे आहे असे म्हणतोस, तर उद्योजकांनी आयुष्यात हेच तत्व ठेवावे.
‘साम – दाम – दंड – भेद’ या चार मार्गाचा वापर तुला करता येणार नाही. तू या मार्गाचाही वापर कर. गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाही तर आपले एम.फार्म. आहेच.’ मोहिनीराज म्हणाला.
मी रिटन टेस्ट दिली, ग्रुप डिस्कशन मध्ये हिरीरीने भाग घेतला, मला आठवते त्या प्रमाणे इंटरव्हयू ही दिला.
आणि नंतर सुमारे १५ मंत्र्यांची ज्यात उद्योग मंत्रीही होते यांची ‘स्वातंत्र्यसैनिकाचा’ मुलगा म्हणून ‘रेकमेंडेशन’ची पत्रे घेतली आणि ती बजाजच्या डायरेक्टरच्या पी.ए.ला दिली.
आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बोर्डवर जी ‘मेरीट लिस्ट’ लागली त्यात माझे नाव होते. त्यात माझ्या मेरिटचा भाग किती आणि रेकमेंडेशन पत्रांचा किती हा प्रश्न मला सोडवता आला नाही.
पण वर्गात अनेक बड्यांची मुले होती. उदय कोटक, जो आज कोटक महिंद्राचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे, तोही वर्गात होता. सध्या बेल्जियम आणि लाक्सेम्बर्ग भारताचा एम्बेसेडर असलेला मनजित पुरीही आमच्या बॅचला होता. वेकफिल्डचा सध्याचा व्यवस्थापकीय संचालक असलेला अश्विनी मल्होत्रा… असे किती तरी ‘नामवंत’ आमच्या बॅचला होते. ते ‘सगळे’ माझ्याच सारखे निव्वळ ‘मेरीट’ वर आले असे मानणे माझ्या, आणि त्यांच्या साऱ्यांच्या सोयीचे आहे.
खरे ना?
बजाज मध्ये मराठी मुलांचा एक ग्रुप होता. त्यांना साऱ्यांना बजाज इंस्टीट्युटने इंग्रजीच्या स्पेशल लेक्चर्सना बसवले. जे मराठी माध्यमातून शिकले आणि ज्यांचे इंग्रजी कच्चे आहे, त्यांच्याच साठी हा क्लास होता. सिद्धार्थ कॉलेज मधील प्रोफेसर्स या विषयाची लेक्चर्स घ्यायचे. अर्थातच या क्लास मध्ये इतर मराठी मुलांमध्ये, माझाही समावेश झाला.
पण एवढे करूनही माझे इंग्रजी काही सुधारले नाहीच.

03/07/2025

एका सामान्य माणसाचे, विलक्षण आत्मचरित्र .!!
कॅलिडोस्कोप…!! भाग आठवा
लेखक: राजीव शांताराम थत्ते.
बी.फार्म.(युडीसीटी), एम.एम.एस.(जमानलाल बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज)
भाग आठवा
यु.डी.सी.टी. – बी.फार्म.
बी.फार्म.ला युडीसीटी मध्ये सगळ्यात कमी मार्कावर प्रवेश घेतलेला विद्यार्थी होतो.
वर्गातली कल्पना गांधी तर मेडिकलला न जाता फार्मसीला आली होती.
आणखी असे १-२ जण होते कि त्यांनाही मेडिकलला अॅडमिशन मिळत असताना ते फार्मसीला आले होते.
मी बी.फार्म.ला शिकत असताना रिलायन्सचा अनिल अंबानी आमच्या बरोबरच बी. टेक. करीत होता. त्याने मी संपादक असलेल्या युडीसीटीच्या ‘एको मॅगेझीन’ला रिलायन्सची जाहिरात दिली होती.
तो पुढे एवढा मोठा होईल असे मला तरी लक्षातही आले नव्हते, न तो रिलायन्सच्या मालकाच्या मुलासारखा, आमच्या सगळ्याशी वागत होता.
मी युडीसीटीला अॅडमिशन घेतल्यावर लिखाणावर काँसंट्रेट केले.
दर आठवड्याला एक सायन्स विषयी लेख वृत्तपत्रात येवू लागला. यु.डी.सी.टी.त वेगवेगळी आंतरराष्ट्रीय पाक्षिके, मासिके वाचून त्यावर आधारीत कार्यक्रम मी आकाशवाणीवर करीत होतो.
त्या सगळ्या गडबडीत अभ्यासाकडे दुर्लक्ष होवू लागले. बी.फार्म.च्या पहिल्या वर्षाला ‘इंजिनिअरिंग ड्रॉइंग’ नावाचा विषय होता.
त्याला एक मराठी प्राध्यापक होते.
मी थेट त्यांच्या त्या वर्षीच्या शेवटच्या लेक्चरला गेलो व सगळ्या असाइनमेंट त्यांच्याकडे दिल्या.
‘तुम्ही आजच अॅडमिशन घेतली का?’ सरांनी मला विचारले.
‘नाही, त्याने लेट अॅडमिशन घेतली.’ वर्गातल्या इतर मुलांनी ‘हसत’ सांगितले.
त्याच्यावर विश्वास ठेउनच सरांनी मला पास केले.
दुसऱ्या वर्षाला मला फर्स्टक्लास मिळाला.
बी. फार्म.च्या तिसऱ्या म्हणजेच आमच्या वेळच्या फायनल वर्षी लिखाणाला आणि आकाशवाणीवर कार्यक्रमांनी माझा जास्त वेळ जात होता.
तिसऱ्या वर्षी आम्हाला फिजिकल केमिस्ट्री नावाचा विषय होता. त्या विषयाला एक साउथ इंडियन माणूस लेक्चरर म्हणून होता. तो काय शिकवायचा हे मला समजायचे नाही. त्यापेक्षा पुस्तकांमधून जास्त कळत असे.
तो पि.एच.डी. सहा सात वर्षे करीत होता आणि एवढा वेळ पि.एच.डी.ला लागत असल्याने, मला वाटते, तो फ्रस्ट्रेट झाला होता.
त्याची नेहमी तक्रार असे कि ‘मी त्याची लेक्चर्सना बसत नाही म्हणून.’
मला पुस्तकांमधून जास्त कळायचे. त्याच्या सतत मला ‘टोमणे’ मारण्याने मी वैतागलो आणि त्याच्या लेक्चर्सना बसणेच सोडून दिले.
आमच्या वेळी फायनल इयर बी.फार्म.ला असताना फार्मकॉलॉजी नावाचा विषय आम्हाला होता.
त्याचे डॉ. राव नावाचे प्रोफेसर होते.
या राव सरांना, जे रिटायरमेंटला आले होते, एक वाईट सवय होती. आमच्या वर्गातल्या एका मुलीला, मेघाला, पाहूनच शिकवायचे. इतर १२-१३ मुले वर्गात आहेत याचेही भान त्यांना नसायचे.
वर्षभर त्यांनी असेच शिकविले.
फायनल परीक्षा आली तेव्हा ते फार्मकॉलॉजीचे पेपर सेटर आहेत असे कळले.
त्यावेळी बी.फार्म.ची तीनच कॉलेजेस होती आणि ‘यंदाचे कुठले पेपर कुठल्या कॉलेज मधून ‘सेट’ होणार याची खबरबात, मला वाटते, सर्वांनाच लागायची.
आम्ही त्या मुलीला, प्रा. राव यांच्या केबिनमध्ये जावून ‘डिस्कशन’ करायची सूचना केली.
तिनेही आढेवेढे घेत ते मान्य केले.
आम्ही सारे विद्यार्थी केबिन पासून वीस फुटांवर उभे राहिलो. ती मुलगी दिड तासाने बाहेर आली आणि आम्हाला साऱ्यांना ‘इंपोर्टंट क्वेश्चन्स’ खुले आम सांगितले. त्या वर्षी त्या विषयाचा पेपर तसाच ‘डीक्टो’ निघाला आणि वर्षभर प्रा. रावना एन्टरटेन केल्याची त्या मुलीची पुण्याई’ सगळ्यांच्या कामाला आली.
ही कहाणी मी १९७९ ची सांगतो आहे. आज पेपर, सर्वच परीक्षांचे, किती लोकांना मिळत असतील कोण जाणे.
आणखी अशीच गंमत फार्मास्युटिकल्सच्या प्रॅक्टीकल परीक्षेमध्ये झाली.
डॉ. लाला, जे आता कालिना येथील बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य आहेत (किंवा होते..), ते फार्मास्युटिकल्सच्या प्रॅक्टीकल परीक्षेमध्ये एक्झामिनर म्हणून आले.
आम्हाला ‘इफरवेसंट ग्रॅनुअल्स’ परीक्षेमध्ये बनवायचे होते. त्यालाच मार्केट मध्ये ‘इनोज फ्रुट सॉंलट’ म्हणून ओळखले जाते.
मी स्वतःचा आगळा -
वेगळा फॉर्म्युला वापरुन ‘इफरवेसंट ग्रॅनुअल्स’ बनवले. त्याचेच सँपल सबमिट केले.
व्हायवा झाला.
मी प्रश्नांना चांगली उत्तरे दिली.
दुसऱ्या दिवशी आमच्या डेमॉन्स्ट्रेटर कमला मॅडम सांगत आल्या,’ मि. थत्ते युवर ‘इफरवेसंट ग्रॅनुअल्स’ वेअर सो ग्रेट देट डॉ. लाला वॉज शोइंग अस दी सँपल एज, ‘दी बेस्ट इन दी होल बेच..!!’
रिझल्ट लागला. मार्कलिस्ट आली, मी बॅच मध्ये त्या विषयाच्या प्रॅक्टीकलमध्ये पहिला आलो होतो, आणि तेही माझ्या स्वतःच्या ‘इफरवेसंट ग्रॅनुअल्स’च्या फॉर्म्युला मुळे..!!
तिसरी आणि शेवटची आठवण सांगतो ती फार्मेकॉलॉजी प्रॅक्टीकल परीक्षे मधली.
त्यावेळी तीन औषधे आम्हाला द्यायचे. त्याची ओळख पटवायची टेस्ट असायची.
म्हणजेच ती कोणती औषधे आहेत ते बेडकांच्या हृदयावर होणाऱ्या परिणाम बघून सांगायचे.
त्याला बेडकांचे आधी डिसेक्शन करायचे. मग त्याचे हृदयाला पीन लावून एका फिरत्या काळी काजळी लावलेल्या ड्रम भोवती फिरवायचे.
मग त्या हृदयात एक एक औषधे टाकायची आणि त्याच्या होणाऱ्या ‘रिअॅक्शन’ वरून ती औषधे ओळखायची.
आमच्या यु.डी.सी.टी. मध्ये, आपण त्याचे नाव पाटील असे धरून चालू, एक लॅब असिस्टंट होता. विद्यार्थ्यांना, त्यातही मराठी विद्यार्थ्यांना, कोणतीही अपेक्षा न ठेवता, मदत करायची अशी त्याची निर्मळ भावना होती.
त्याने मला आणि इतर मुलांना ती तीन औषधे कोणती आहेत हे तर सांगितलेच पण त्या औषधांची ओळख देणारे काळी काजळी लावलेले ड्रमस ही त्यावर योग्य ते मार्किंग हाताने करून ते आम्हा विद्यार्थ्यांना दिले.
अर्थातच तेच ड्रम्स आम्ही एक्झामिनरला दाखवले आणि ८०% मार्कस त्या परीक्षेत मिळवले.
आज बेचाळीस वर्षांनी हे खरे ते सांगायची हिम्मत मी केली. इतर किती लोक, असे प्रकार सरसकट करूनही, आपण ‘पापभिरू’ असल्याचे दाखवत असतील, कोण जाणे..!!
तिसऱ्या वर्षाला मी वर्गात सातवा – आठवा आलो.
मला एम.फार्म.ला अॅडमिशनही मिळाली पण जमनालाल बजाज इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजला एडमिशन मिळाल्याने मी एम.फार्म.ची एडमिशन सोडली. त्यामुळे यु.डी.सी.टी. या विख्यात संस्थेशी संबध संपुष्टात आले आणि जमनालाल बजाज इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजला मी एम.एम.एस.ला प्रवेश घेतला.

Address

20
Toronto, ON
L5M7M9

Alerts

Be the first to know and let us send you an email when Worldnet : Enjoy Happiness posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Worldnet : Enjoy Happiness:

Videos

Share