राजापूरकर

राजापूरकर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from राजापूरकर, Digital creator, Rajapur.
(1)

धूतपापाच्या डोंगरावरून उतरताना नदीपलीकडे जी बहुउपयोगी इमारत दिसते ती 'राजदेवीचे मंदिर' असा उल्लेख गंगेच्या बखरीत आहे. कदाचित त्यावरूनच 'राजापूर' हे नाव पडले असावे. 'पूर' म्हणजे नगर अथवा शहर मग राजदेवीचे हे नगर !
#राजापूरकर 😎🏡💚🌴🥥⛵🛶🐠🦋😍👑 कोकण म्हणजे स्वर्ग.....
कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्याची खाण....
कोकण म्हणजे फळा-फुलांनी नटलेले विश्व.....
कोकण म्हणजे कधीही न विसरता येणाऱ्या आठवणी....
पण हल्ली डिजीटलच्या जमान्यात या आठवणी लोप पावत चालल्या.

🌺 !!जय श्री स्वामी समर्थ !!🌺
18/02/2025

🌺 !!जय श्री स्वामी समर्थ !!🌺

 #देवचार कोकण भागातील गावात राहणाऱ्या माणसांना देवचार म्हणजे काय हे सांगण्याची गरज नाही. कारण देवाचे झाड व सीमेकरी म्हणज...
18/02/2025

#देवचार

कोकण भागातील गावात राहणाऱ्या माणसांना देवचार म्हणजे काय हे सांगण्याची गरज नाही. कारण देवाचे झाड व सीमेकरी म्हणजे कोणता देव हे त्यांना माहीत असेल

तसेच कोकणातील भगत या तांत्रिक पुरुषा कडे जाणाऱ्या माणसांना पण देवचार काय आणि त्याचा अर्थ ,कार्य काय हे माहीतच असेल. गोव्यात भगत या पुरुषाला घाडी असे म्हणतात. आणि ही मंडळी नेहमी तांत्रिक काम ,एखाद्या मृत झालेल्या माणसांना बंधनातून सोडवणे ,कोंबडा ,बकरा बळी देणे अशी कार्य करतात. पण शेवटी जे कर्म करतात त्यांचे भोग नको त्या मार्गाने वाईट परिस्थिती ने भोगावे लागतात हे वेगळे.

काल मी मोपा एअर पोर्ट बद्दल सांगितले ते खरंच आहे. माणूस माणसावर राज्य करू शकतो पण देवावर नाही. आणि जे पण देवा पुढे जाण्याचा प्रयत्न करतात ते एका अर्थी अधोगती ला पोहचत असतात. म्हणून देवा बरोबर खेळू नये. देवाशी स्पर्धा करू नये जेव्हा क्रोध भावना विकोपाला जाते. तेव्हा देवाला दुखविणा ऱ्या चाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबाचा पण हाल हाल होऊन समूळ नाश होतो.काही ठिकाणी देवीला बंधनात टाकले जाते हेही घातकच आहे.

देवचार या शब्दाचा अर्थ किंव्हा महत्व शहरातील जास्तश्या लोकांना माहीत नसेल. म्हणून कळण्यास हा लेख.

देवचार म्हणजे ग्रामीण भागातील ग्राम देवी देव किंव्हा देवीचा सेवक.
तसा देवचार हा जास्तसा तांत्रिक कामात मोडतो. पण काही ठिकाणी यांच्या वाढ दिवसाला सात्विक भोजन प्रसाद दाखवला जातो. काही ठिकाणी यास रक्त बळी दिले जातात यात वेताळ हा देव मोडतो. तशी या देवचाराची काही ठिकाणी लहान मोठी मंदिर किंव्हा देवघर असते. आपण कोकणात आलो की प्रत्येक सीमेवर अशी एक लहान मोठी घुमटी बघतच असतो. प्रवासी बश्या किंव्हा ट्रक वाले इथे थांबा घेऊन अगरबत्ती पण पेटवुनच पुढे जातात.

सावंतवाडी हून आंबोली चा घाट सुरवात होताना तिथे ही एका धनगराची घुमटी व मोठे झाड पण तुम्ही पाहिले असेल.

इंग्रजांच्या शासन काली इंग्रज इथून एक घाट रस्ता करण्याचे प्लॅनिंग करत होते पण त्यांना ते अंतर खुप दूर वाटत असतानाच तिथे हा धनगर बकरी समवेत आला धनगर मेंढपाळ माणसाला दुर्गम भागातील कमी अंतराच्या वाटा माहीत असतात.आंबोली घाटातील हीच शॉर्टकट वाट या धनगरांने शोधून त्यांना दाखवली. इंग्रज खुश झाले. त्याला बक्षीस स्वरूपात मिळाली स्वताची हत्या.
त्यांच्या आठवणीस उजाळा देण्यासाठी आज तिथे लहानसे देऊळ आहे. असा धनगरांचा आज देवचार देव म्हणून विराजमान आहे.

असे खुपश्या ठिकाणी पोर्तुगीज काली इंग्रज शासन काली मोठं मोठ्या जागेची मालकी असणाऱ्या भाटकार लोकांची हत्या झाली. आणि त्या ग्राम देवीने त्यांना आपल्या आधिपत्यात सामावून अमर केले.

गोव्यात अशी खुपशि ठिकाणे आहेत ज्या जागेवर हे विराज मान आहेत त्याच जागेच्या त्यांच्या नावाने. जसे की ,बोडगेश्वर ,म्हापसेकर ,वैगेरे वैगेरे.

तसे गावात देवीचे सेवक म्हणून एकच देवचार नसतो तर गावाच्या दाही स्थळावर दहा देवचार असतात. आणि देव देवीने दिलेल्या त्या त्या जागेवर त्या त्या देवाचं नाव असते. आणि हा भाग त्या त्या देवाच्या आधिपत्यात असतो आणि त्या भागाचे तो तो संरक्षण करत असतो. अश्या वेळीं बाहेरील तांत्रिक बाधा ,करणी वैगेरे आत येण्याचे प्रयत्न केल्यास ते थोपवून धरण्याचे काम तो तो सीमे वरील देव चार करत असतो.जरी गावात कुणावर चुकून तांत्रिक क्रिया होऊन त्यास त्रास होत असेल तर कुलदेवते कडे प्रश्न कौल मांडला जातो आणि ते कार्य त्या त्या सीमेवरील देवाकडे सोपवले जाते. इथे तो देवचार ती क्रिया क्षीण करून पीडीताला त्या तांत्रिक गोष्टी पासून मुक्त केले जाते.

आता या देवचाराला कोणत्याही प्रश्ना साठी ग्राम देवीची प्रथम आज्ञा घ्यावी लागते.

देवचाराचे कार्य म्हणजे गावाची दिवस रात्र राखणं करणे. संकटात गावातील माणसाला मदत करणे ,संकटात धावून जाणे.
आता एका गावात ग्राम देवता एकच असली तरी देवचार क्षेत्रपाल एकच नसतो तरएकाच गावात प्रत्येक जागेत सिमेंत मिळून खूपसे देवचार असतात. आणि त्यांच्या संगतीत खेति भुते पण असतात. जेव्हा देवचार रात्रीचा संबंध गावात फेरी मारण्यास निघतो तेव्हा भूत खेति पण त्यांच्या मागे त्यांच्या आदेशाचे पालन करतात.

आता वीज आल्या मुळे त्याचा खेळ कमी दिसू लागला आहे. पूर्वी गावात लाईट वीज नव्हती तेव्हा रात्रीचा काळोख सुरू व्हायला लागला की गावातील सर्व लोक दरवाजा आत बधिस्त होत दिव्यांच्या अधुकश्या प्रकाशात खिडकी शेजारी उभे राहून दूरवर चालणाऱ्या मशालिचा खेळ पाहायचे.
एकदा एक उजवडी ( मशाल ) पेटली की प्रत्येक स्थानातील देवचार आप आपली उजवडी पेटवून हजेरी लावायचा. मग परत मशाली गुप्त व्हायच्या आणि सर्व स्थानातील सिमेकरि देवचार एकत्र होऊन एकाच जागी सात आठ मशाली पेटायांच्या आणि बंद व्हायच्या. मग परत मशाली नाचायच्या खेळ खेळायचे आणि खेळ संपला की प्रत्येक जण आप आपल्यां स्थानांची रखवालि करण्यास निघायचे

चुकून कुणाच्या घरात दिव्याचा प्रकाश दिसला तर ठणकन त्या घराच्या कॉर्नर वर घुंगरू सकट दांडा बसायचा.
याचा अर्थ फेरी सुरू झाली आहे. आता दिवा वीजवा आणि झोपा.

त्यांच्या फेरीच्या वेळीं चुकून कुणी गावातला वाटेत आला तर मशाल पेटली जायची आणि तो माणूस भिवुन जवळच्या घराचा आसरा घेत त्याला वाट मोकळी करून द्यायचा.
प्रसंगी अश्या वेळीं माणूस भिऊ नये म्हणून कधी माणसाचे रूप तर कधी कुत्र्या मांजराचे रूप घेत असतो.

जर जाणून बुजून या देवचाराना डिवचले तर त्यास झपाटा व्हायचा. तर कधी त्या माणसाला जवळच्या झाडावर अदृश्य करून दहा बारा दिवस बांधून ठेवतो. अश्या वेळीं तो अदृश्य झालेला माणूस झाडावरून सर्वांना बघतो पण इतर लोकांना तो दिसत नाही. या नंतर देवीचा कौल घेतल्या नंतरच तो माणूस बेशुध्द अवस्थेत सापडतो.

यांची रात्रीची फेरी सुरू झाली की दूरवर भुतां अवगति चा रडण्याचा बोलण्याचा आवाज सुरू होतो.

लहान पणी मी पांढऱ्या झूळ झुळ नाऱ्या साडीत साडीत भूत पण पाहिले आहे. देवचार पण पाहिला आहे.

जेव्हा लहान पणी मी दारा आडून मसालिचे नृत्य पाहायचो, तेव्हा आम्हच्या जुन्या घराच्या मागच्या डोंगरावर भुताचा रडण्या बोलण्याचा डरावणा आवाज सुरू झाला की भिऊन हळूच आईच्या कुशीत शिरून झोपी जायचो.

अश्या खुपश्या गावाकडील रहस्यमय गोष्टी अनुभव अजूनही माझ्या आठवणीत आहेत.
तसा देवचार हा आपली राखणं करणारा देव आहे. त्याला डिवचले गेले तरच तो आपले वाईट करतो. प्रसंग संकट आल्यास आपण त्याला हाक दिली तर तक्षणी तो मदतीला धावून येतो. पण कुणाच्याही रूपाने. असे आहे गावाकडील देव आणि त्यांचे रहस्य आम्हच्या गावी घराच्या गावाच्या चौहो बाजूला यांची वस्ती व भले मोठे वृक्ष आहेत. आणि आम्ही त्यांच्या क्रुपा छायेत निर्विचार शांती घेत आहोत.

©®Ashok Naik.
सुंदर माझा गाव मेणकुरे पंचायत क्षेत्र

एका  स्वयंपूर्ण निसर्ग जीवनशैली ची ओळख दाखवणारी "कोकणी थाळी"..ह्यातील प्रत्येक जिन्नस आमच्या कोकणातील कुळागरातील बागेतला...
18/02/2025

एका स्वयंपूर्ण निसर्ग जीवनशैली ची ओळख दाखवणारी "कोकणी थाळी"..
ह्यातील प्रत्येक जिन्नस आमच्या कोकणातील कुळागरातील बागेतला , वायंगनातला आणि दर्यावयला आहे

पूर्वी असे जेवण प्रत्येक कोकणातल्या घ्रा घरात होते पण आज पैश्या मागे धावत शेती सोडून आपण ही समृद्धता हरवून बसलो आहोत..आणि आज हेच जेवण कोकणी माणसाला सुद्धा विकतचे हॉटेल मध्ये authentic food च्या नावाखाली महागड्या किमतीत घ्यायला लागते...

पुन्हा एकदा सांगेन शेती पैश्यासाठी नव्हे पोटासाठी करायची असते..

पैसा मिळतो म्हणून निसर्ग तोडून फक्त आणि फक्त काजू आणि आंब्याच्या हजारो एकरातल्या बागा करणाऱ्यानो हे जीवन असे फार काळ टिकणार नाही....

निसर्ग आपल्याला जगण्याला समृद्ध बनवणाऱ्या सगळ्या गोष्टी पुरवतो...

स्वयंपूर्ण बनुया... निसर्गाशी अनुरूप पूर्वजांनी दिलेल्या ज्ञानाचा उपयोग करून शाश्वत शेती करून अशी थाळी रोज जेयुया...

खाद्य संस्कृती टिकली तर निसर्ग संवर्धन सुद्धा होईल हा विचार प्रत्येकात रुजवायला हवा...नायतर उकड्या भाताची पेज सुद्धा विकत पिवची लागतली "zomato" वर

©® Ranmanus

   #कोकणची जैवविविधताराजापूर मधल्या हातिवले गावाची जैव विविधता लेखक अनंत पाटील    कोकणातील राजापूर तालुक्यातील हातिवले ह...
18/02/2025


#कोकणची जैवविविधता

राजापूर मधल्या हातिवले गावाची जैव विविधता
लेखक अनंत पाटील

कोकणातील राजापूर तालुक्यातील हातिवले हा गाव, अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. येथूनच देवगड आणि जैतापुर अणुऊर्जा प्रकल्पाला मार्ग जातो. मुंबई गोवा महामार्ग या गावांमधून जातो. गावामध्ये विस्तृत कातळ सडे, दरया, उंच डोंगर, बारमाही वाहणारे जीवंत झरे आहेत. चिरेखाणी, आंबा- काजू बाग लागवड आणि वसाहतीकरणामुळे निसर्गाची अपरिमित हानी झालेली आहे. अशा या ठिकाणी आंबोली, महाबळेश्वर या तोडीचा पाऊस पडतोच पण येथील जैवविविधताही त्याच तोडीची आहे. आम्हाला या ठिकाणी तब्बल १८ प्रकारचे बेडूकवर्गीय प्राणी आढळून आले. गावाच्या अर्ध्या भागाचे अद्याप सर्वेक्षण झालेले नाही; त्या भागामधून आणखीन काही प्रजातींची भर पडू शकते.

सुरवातीला बेडूक खालीलप्रमाणे,
1.Duttaphrynus melanostictus (Schneider, 1799)
2. Sphaerotheca breviceps (Schneider, 1799)
3. Minervarya cepfi (Garg and Biju, 2017)
4. Minervarya sp. ( Unidentified)
5. Minervarya chilapata Ohler, Deuti, Grosjean, Paul, Ayyaswamy, Ahmed and Dutta, 2009
6. Microhyla sp.( Unidentified)
7. Raorchestes ghatei Padhye, Sayyed, Jadhav and Dahanukar, 2013
8. Pseudophilautus amboli (Biju and Bossuyt, 2009)
9. Polypedates maculatus (Gray, 1830)
10. Uperodon globulosus (Günther, 1864)
11. Uperodon mormoratus (Rao, 1937)
12. Hydrophylax bahuvistara Padhye, Jadhav, Modak, Nameer and Dahanukar, 2015
13. Euphlyctis sp.( Unidentified)
14. Hoplobatrachus tigerinus (Daudin, 1802)
15. Minervarya caperata (Kuramoto, Joshy, Kurabayashi and Sumida, 2007)
16. Indirana sp. ( Unidentified)
बेडूकवर्गीय प्राणी (यांना देवगांडूळ असेही म्हणतात.) खालीलप्रमाणे,
1. Ichthyophis beddomei Peters, 1879
2. Ichthyophis bombayensis Taylor, 1960

Anant Patil

प्रतिक मोरे

सर्वात महाग भाजी (फका) सध्या किती रुपये किलो आहे माहित आहे का? १००० च्या वर आहे नक्की मेहनत आहे खूप ह्या कोवळ्या काजूगरा...
18/02/2025

सर्वात महाग भाजी (फका) सध्या किती रुपये किलो आहे माहित आहे का?
१००० च्या वर आहे नक्की
मेहनत आहे खूप ह्या कोवळ्या काजूगरासाठी.

©® Archana Gaonkar Photography

🌴 #राजापूर #कोकण #राजापूरकर

😍 ही "पर्यटन बुलेट ट्रेन" सुसाट सुटायला हवी....(भाट्ये बीच-रत्नागिरी)Photo- Abhijeet Nandgaonkar
18/02/2025

😍 ही "पर्यटन बुलेट ट्रेन" सुसाट सुटायला हवी....
(भाट्ये बीच-रत्नागिरी)

Photo- Abhijeet Nandgaonkar

माझी भटकंती ९७ : भाट्ये बीच, रत्नागिरी महाराष्ट्रातील निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असा रत्नागिरी जिल्हा नेहमीच पर्यटकांना आ...
18/02/2025

माझी भटकंती ९७ : भाट्ये बीच, रत्नागिरी

महाराष्ट्रातील निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असा रत्नागिरी जिल्हा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतो. पूर्वेला उत्तुंग असा सह्याद्री तर पश्चिमेला विशाल अरबी समुद्र याच्यामध्ये वसलेला असल्याने रत्नागिरी पर्यटन स्थळे आपली वेगळी ओळख निर्माण करतात. रत्नागिरी जिल्हाला १६७ किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला असून या किणार पट्टीवर अनेक पर्यटन स्थळे पहायला मिळतात. या ठिकाणचे बीच सुंदर व स्वच्छ आहेत.

रत्नागिरी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर भाट्ये बीच आहे. भाट्ये बीच पांढऱ्या वाळूचा असून त्याची लांबी दीड किलोमीटर आहे. या समुद्र किनार्‍यावर सुरू चे वन असून याठिकाणी वनभोजनाचा आनंद घेता येतो. समुद्रकिनारा शांत, उथळ, स्वच्छ असल्याने पर्यटक समुद्रस्नानाचा मनमुराद आनंद लुटतात. मावळतीच्या सूर्याला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अनेक पर्यटक सायंकाळच्या वेळी बीच वर गर्दी करत असतात. या समुद्र किनाऱ्याच्या टोकास झरी गणपतीचं सुप्रसिद्ध मंदीर आहे.

©® माझी भटकंती.ओळख वैविध्यपूर्ण संस्कृतची

🌴 #राजापूर #कोकण #राजापूरकर

घाटावरून येतस तर मस्तपैकी विजयदुर्ग फिरायचा ,विजयदुर्गचो किल्लो बघायचो,नशीब जोरावर असलाच तर समुद्रातली भिंत पण बघायची मग...
18/02/2025

घाटावरून येतस तर मस्तपैकी विजयदुर्ग फिरायचा ,विजयदुर्गचो किल्लो बघायचो,नशीब जोरावर असलाच तर समुद्रातली भिंत पण बघायची मग तिकडून विमलेश्वराच्या दर्शनाक जायचा,तिथून गप्प तोंडावर रुमाल बांधून आणि डोळ्यावर "गागल" लावून देवगड च्या रणरणत्या वाटेकडे जायचा ,मध्ये हॉटेल मध्ये विसावा घ्याल वगैरे स्वप्ने मुंबैकरांनी बघू नकास,तुमका काय्येक गावाचा नाय ,फक्त कापाचो दगड असा आजुबाजूक.तिथे जय कुणकेश्वर करायचो,समुद्र बघायचो आणि थडेसून सुसाट सुटायचा ता मस्त पैकी मालवण मध्ये उतरा आणि चिविया ,तारकर्ली बीच बघा,मगे खय जावा माहिती हा काय ?ह्या आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जावा आणि मग देवबागला जाऊन थयचा अप्रतिम सौंदर्य बघायचा . तिथून घूम जाव करत थेट आचरा गाठायचा,थयचो किनारोय चांगलो असा.आता मुक्काम पोस्ट आचरामध्ये आलास तर रामेश्वर करा ,देवळात जाऊन त्याका नमस्कार घालायचो,फरशीर झोपान.नमस्कार एक मिनिटभर घाला फक्त,नायतर फरशी बरी गार गार लागता म्हणान थयच झोपश्यात तर पुजारी येवून लाथ मारीत मागसून.पैसे टाका पेटीत इसरा नको.आम्ही कट्ट्यावर बसलेले असतव थय.आमचा लक्ष असता .मगे थयना अक्सिलीरेटर पिळून काढा आण तांबड्या मातीतून गाडी आंब्या काजूच्या मोहराचो वास अनुभवत गाडी आंगणेवाडी देवीकडे पिटाळा.तिथून तिला नमन घाला आणि सरळ कणकवलीत येवा ,मेल्यानु वाटेत माझे घर लागता हा ,येवा थय पण .घर तुमचाच असा वगैरे काय म्हनुचय नाय !उगीच खोटी आशा कश्या दाखवा लोकांका पण येवा,चायपाणी करून मगे डायरेक्ट कुडाळाक जाव नको,बाबा रागवतीत .माझे नाय ओ,भालचंद्र बाबा म्हणतंय .आमच्या कणकवलीत त्यांचो छान मठ असा,मेल्यानु देवळा पण करा कधीतरी.आणि मग थयसून रस्त्यावरल्या खड्ड्यात खाड खाड करीत कुडाळक येवा.मध्ये ओरोस लागतला .मोठे बिल्डींग बघून अजिबात आत जाव नको,काळो कुत्रो पण नसतलो सकाळी १० ते ५.तसो एरवी पण नसता.असांदेत.मगे तुमच्यात दम आसलोच म्हणजे रव्हलो असलो तर बांबर्डेक डावीकडे वळा.चलान चलान जिवंत रव्हलास तर रांगणागड करा .मगे कुडाळात येवा ,नाश्तो करा.
मेन सूचना : पोरींची कळ काढू नको,फुकटचे मरश्यात.मगे तुमचा हाड सुद्धा गावाचा नाय,फक्त सिंधुदुर्ग टाईम्स ला बातमी येतली.असो तर नाश्तो झालो तर राउळ महाराजांचा मठ गाठा ,मध्ये गम्मत बघुची असली तर मंदारच्या हॉटेलात डोकवा,थय जाऊन उलटा सुलटा बोला मग तुमची बिन पाण्याची कशी व्हता ती समजात आणि मग चलो वेंगुर्ला .वेंगुर्ला म्हटलं की काय सांगू आणि काय नको असा व्हता ,कश्याक होता ता मी नाय सांगुचय.थय सागर बंगलो,बंदर,सागरेश्वर, करा मगे मोचेमाड, मग येतलो आरवली चो समुद्र,तसाच पुढे गेल्यार म्हणजे समुद्रातून नाय तर रस्त्यावरून २ किमी पुढे श्री वेतोबा संस्थान ,मग तिथून शिरोड्याच्या किनाऱ्यावर किलेश करा थय सुरूबन असा माझ्या माहिती प्रमाणे म्हणजे मागल्या टायम गेल्लय तेव्हा तरी होता.चालू स्कोर मका माहित नाय.मग थयच्या बाजारपेठेत फेरफट मारुन रेडीक येवा. थय असा आमची माउली देवी आणि स्वयंभू गणपती आणि जरा पुढे ६ किमी वर फोर्ट तीरयाकोल (तेरेखोल) असा,किल्य्यात काडीचो सुद्धा दम नाय असा.त्या किल्ल्याकडे बघान मी एक निष्कर्ष काढलाय तो म्हणजे पोर्तुगीज राजे लय आळशी आसतले.येवढो इजी असा ना तो किलो जिंकुक.अरे आपण पण चार पाच जण नुसते चलत जाऊन तो किल्लो आरामात जिंकू असो असा तो. पण समुद्राचा व्ह्यू भारी दिसता हा ,प्रश्न नाय,कोणाक व्ह्यू आवडाक नाय तर घाला उडी थयच .बाकी तुमका सिंधुदुर्गात मिळान जेवढे बिअर बार गावाचे नाय तेवढे एकटया तेरेखोलात गावतत.पिऊ नको रे .मी निरीक्षण सांगताय तुमका फक्त. आणि थयसून सुटायचा ता नॉनस्टोप वेंगुर्ल्यात येवा .दाभोली तिठ्यार वर जाऊन परुळे किल्ले निवती भोगवे बीच करून येवाच.नाय केलात तर काय उपयोग नाय तुमचो.आधीच किरणपाणी पुलावरसून उडी मारुक व्हयी होती तुम्ही. मगे सावंतवाडीची वाट धरा .बाजारपेठेत जावा.काय्यव करा पण चंदू भुवन मध्ये नाश्तो करा ,भारी असता .मग थयच्या लोकांका विचारा काय काय बघुचा असा ता,राजवाडो वगैरे बघा .आणि रात्री मोती तलावावर येवा.बरा वाटतला.
झालो संपलो काय सिंधुदुर्ग ,असा विचारश्यात तुम्ही.पण तसा नाय हा. आमचो सिंधुदुर्ग कधीच नाय संपुचो.तुम्ही रेडीचो गणपती बघश्यात.पण पावसाळ्यात,शेतातना गणपती बघूक आणि भजन करुक जावची जी मजा असता नी नाय समजाची.
लोकांची मना नाय समजूची.मोठ्या मोठ्या हॉटेलात जेवश्यात पण महापुरुशाकडे जमिनीवर बसान पत्रावळीत भात,वाटप घातलेला वरण ,गोडी डाळ ,बटाट्याची वाटप घातलेली भाजी आणि आंब्याचा लोणचा खाउक जी मजा येता ना ती खय्यव नाय येवची.थंडीत काजीच्या झाडावर चढान दशावतार बघूक जी मजा येता ती मल्टीप्लेक्स मध्ये नाय येउची.
लॉर्ड मध्ये खेळल्या सामन्यापेक्षा इकडची "टुर्लामेंट" लय भारी असता! प्रथम पारितोषिक ७७७ रुपये.तेवढ्यात अक्खी टीम खुश .खऱ्या मालवणी माणसाचा लक्षण ह्या असा की तो पैश्याच्या पाठी न लागता असात तेवढ्यातच समाधानी रव्हात.असो मी काय म्हातारो नाय जाउक असंय पण एक सांगतंय ,हय्सून बाहेर पडा ,प्रगती करा पण सिंधुदुर्गाक कधी विसरा नको.
आणि हो,मालवणी माणसाचो "स्वाभिमान" दुखावलास तर "प्रहार" करू !!!
● एक लक्षात ठेवा पोस्ट जुनी आहे 2011 मधील त्या मुळे जर काही संदर्भ आपण आता जोडू शकत नसाल तर तेवढे फक्त समजून घ्यावे हीच विनंती आहे आपल्यास 🙏🙏🙏🙏🙏
© शब्द साभार - Rohit Bhide

Photo क्रेडिट - Vee Marathi

🌴 #राजापूर #कोकण #राजापूरकर #गावं_वाचवा

आपले कोकण हे पर्यटन स्थळ आहेच...पण हे कायम स्वरुपी टिकवण्यासाठी आपण हात भार लावला पाहिजे....!आपण स्वतःचा विचार करावा व त...
18/02/2025

आपले कोकण हे पर्यटन स्थळ आहेच...
पण हे कायम स्वरुपी टिकवण्यासाठी आपण हात भार लावला पाहिजे....!
आपण स्वतःचा विचार करावा व त्या बरोबरच
सर्वांचा विचार सुद्धा करावा...!
लोकं आपल्याला काय म्हणतील याचा आजिबात विचार करू नये..!
आपण प्रत्येक व्यक्तीने असा वीचार केला पाहिजे की, माझ्यामुळे जर एक पर्यटक कोकणात आला,
तर गाडी वाल्यांचा धंदा होईल, रिक्षा वाल्यांचा धंदा होईल , दुकानातील कोकणी पदार्थ विकणाऱ्यांचा धंदा होईल..
हॉटेल वाल्यांचा धंदा होईल व अजून बरेच काही ...
अशा अनेक लोकांचा उदनिर्वाह होईल...!
आज इतरांचा फायदा होईल तर उध्या आपला सुद्धा नक्कीच फायदाच होईल....!
याचा विचार आपण सर्वांनी करावा..!
गाव हे गावच राहावे.. त्या गावाचे धापवळीचे जीवन असणारे शहर होऊ नये.. ! याची सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे...!
असा विचार आपण आज केला तर पुढील येणाऱ्या काही वर्षांनी याचा परिणाम नक्कीच दिसून येईल..!
आज आपण ज्या शहरात पैसे कमावतो ते पैसे त्याच शहरात खर्च होऊन जातात..
आपल्या 10×10 च्या रूम साठी,
आपले गाव सर्व ओसाड पडले...!
शहरात 500ml पाणी सुद्धा 10 रुपये खर्च करुन
प्यावे लागते...! आज ही परिस्थिती आहे..
तर आणि 20 वर्षांनी काय होईल काय माहिती...!
एका कोकण प्रेमी ला, हा संदेश पुढे पाठवा...!

©®Sunil Waghare

🌴 #राजापूर #कोकण #राजापूरकर #गावं_वाचवा

इसको लगा डाला तो लाईफ  झिंगा लाला😊😀कोणी कोणी अनुभव घेतलाय comment करा..  🌴            #राजापूर  #कोकण          #राजापूरक...
18/02/2025

इसको लगा डाला तो लाईफ झिंगा लाला😊😀
कोणी कोणी अनुभव घेतलाय comment करा..

🌴 #राजापूर #कोकण #राजापूरकर

गेली सहा वर्ष ग्राहकांना संपूर्ण महाराष्ट्रात  ओल्या काजुगरांची आम्ही कुरियर मार्फत सेवा देतोय. ग्राहकांचा विश्वास आम्ही...
18/02/2025

गेली सहा वर्ष ग्राहकांना संपूर्ण महाराष्ट्रात ओल्या काजुगरांची आम्ही कुरियर मार्फत सेवा देतोय. ग्राहकांचा विश्वास आम्ही त्यांच आपुलकीने जपलाय.
यंदा हंगाम उशिरा सुरु झाला अठराशे पासून सुरु झालेला किलो मागील दर आता 1300₹ किलो वर आलाय.
किमान एक किलोच्या ऑर्डर ला आम्ही फ्री कुरियर चार्जेस देतोय
सध्या किलोचा दर 1300₹ किलो
ऑर्डर साठी संपर्क
मालवणी भ्याट 094212 61961
धन्यवाद

@मालवणी भ्याट

Nitin Golatkar

🌴 #राजापूर #कोकण #राजापूरकर #गावं_वाचवा

*कोकणातील घरं* *मनः शांतीची मंदिरं*छायाचित्रात 👇आपण पहात असलेलं कोकाणातलं घर.मंगलोरी कौलांनी शाकारलेलं उतरत्या छप्पराचं ...
18/02/2025

*कोकणातील घरं* *मनः शांतीची मंदिरं*
छायाचित्रात 👇आपण पहात असलेलं कोकाणातलं घर.

मंगलोरी कौलांनी शाकारलेलं उतरत्या छप्पराचं घर. घरातील प्रत्येक बाबतीत टापटिपपणा पण याला अपवाद काही अंशी शेतकरी दादाच्या घराचा. ऐसपैस व्हरांडा (लोटा), व्हरांड्यात जुन्या पद्धतीच्या लाकडी ऑफिस खुर्च्या, लाकडी बाकडा (चोपाळा), दोन मिटर कापड दोन काठ्यात गुंफलेली आराम खुर्ची, व्हरांड्याच्या दर्शनी भिंतीला लागुन आतुन बसण्यासाठी बांधलेला कायम स्वरूपी कट्टा. या अशा बैठकीच्या साधनांवर बसल्यानंतर, *जगी मीच सुखी आहे असा आभास व्हावा.*

पावसाळ्यात धारांच्या स्वरुपात छप्परावरुन ओतणारं पाणी ते अंगण खणतं म्हणुन छप्पराच्या अगदी शेवटच्या रांगेतील कौलांखाली प्लास्टिक पाईप उभा कापून तो किंचित उतरन ठेवून लोखंडी अँगलवर कौशल्यानं फिट केला जातो. छप्परावरुन जोरानं वाहाणारं पावसाचं पाणी पाईप मधून ( भरल) इच्छित स्थळी मोठ्या प्रवाहाच्या रुपात पडतं, तिथंच रिकामा बॅरल ठेवलेला असतो. घरगुती व अन्य कामांसाठी हे पाणी उपयोगी पडतं.

धुवांधार पाऊस हलक्या वाऱ्यामुळे फवाऱ्यांच्या स्वरुपात पडताना ते दृष्य घरातील व्हरांड्यात बसून डोळ्यांत साठवावं. कमालीचा गारठा पडलेल्या पावसाळी वातावरणात,रात्र प्रहरास उबदार पांघरुणात आपण झोपलेले असताना निसर्गाचं रौद्र रूप पावसाच्या रुपानं अनुभवावं. *खुपच आल्हाद दायक असं हे कोकणातील पावसाळी वातावरण.*

कधी कधी दोन दोन दिवस संततधार पाऊस पडतो. घराघरातून *"ह्या पावसान येवजल्यान तरी काय? काल पासुन नुसतो कोसाळताहा "* अशी विधानं ऐकू येतात.

नेहमीची वहिवाटीची वाट सोडुन सगळीकडे जमिन निसरड़ी झालेली असते. अंगणातील जाण्यायेण्याच्या वाटेवर मुरूम पट्टेरी पद्धतीनं टाकलेला असतो तो रेखीव दिसतो पण बाकी राहिलेलं अंगण निसरडं झालेलं असतं. याला अनुलक्षुन माझ्या बाबतीत घडलेला एक किस्सा माझ्या मनात आजही घट्ट रुतून बसलेला आहे.

१९८१ साली माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं. ते दिवस पावसाळी होते. त्या आधी काही दिवस लग्नाच्या आमंत्रण पत्रिका घेवून ओळखीच्या माणसांना द्यायला मी माझ्या मावशीच्या गावी गेलो होतो. त्या गावातील बहिणीच्या मैत्रिणीच्या घराच्या परसात मी प्रवेश केला आणि तिच्या घराच्या अंगणातून लगबगीनं मी चाललो होतो. बहिणीची मैत्रीण, सुगंधी तीचं नाव ती समोरच आपल्या व्हरांड्यात उभी होती. अचानक माझे दोन्ही पाय घसरले आणि मी त्या अंगणात सपशेल पाठीवर लोटांगण घातलं. माझी पाठ चिखलानं पूर्णपणे माखून गेली होती. काहींनी मला अंगणात पडलेला पाहिलं आणि त्यांनी मला हसुन दाद दिली पण माझा मात्र चेहरा तेव्हा बघण्यासारखा झाला होता. बहिणीची मैत्रीणही आपलं हसणं लपवु शकत नव्हती. मला मात्र हसणाऱ्यांचा राग आला होता.

सांगायचा मुद्दा हा की नवख्या माणसाला कोकणातील निसरड्या वाटा,घराची अंगणं कधी लोटांगण घालायला लावतील हे सांगता येणार नाही.

*पावसाळा संपल्यानंतर कोकणातील वातावरण आल्हाद दायक असतं.*

गणेशोत्सवातील रिमझिम पावसानं विश्रांती घेतलेली असते. एक महिन्याभरानं दिवाळीचं शुभ आगमन होणार असतं. किंचित थंडीची चाहूल लागत असते. जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धा पर्यंत वातावरण मोहक असतं.

सांज समयास मावळत्या सुर्याची किरणं परसातल्या झाडांच्या पानापानांतून रेंगाळत असतात.

परसातील काजू ,चिक्कु, सिताफळ,पेरू, शेवगा इत्यादि झाडांवर पक्षांचं मधुर कूजन सुरु असतं.

घरातील आराम खुर्ची अंगणात घेवून त्यावर बसून वृत्तपत्रं वाचावं. घरी आलेल्या पाहुण्यांना घेवून अंगणात चटई वा जाजम अंथरुन तिथंच चहापान उरकावं. गप्पांच्या ओघात सारी दुःखं विसरून जावं.

पूर्वी सर्व घरांची अंगणं मातीची होती. दिवाळी पूर्वी एक महिना आधी ती खणून, मातीची ढेपळं फोडून व भरपूर पाणी ओतून जमिन समतल केली जाई. ती वाळेेल तसतशी लाकडी पेटण्यानं पेटून तिला घट्ट करत असत. जमिन छान वाळल्या नंतर शेणानं सारवून तीची उत्तम निगा राखली जाई.

पण आज बऱ्याच घरी या अंगणांनी कात टाकलेय आता ती सिमेंट कॉंक्रिटची पक्की होऊन गेली आहेत पण *शेणानं सारवलेल्या अंगणाशी ती बरोबरी करू शकत नाहीत हे मात्र तेवढंच खरं.*

पूर्वी उन्हाळ्याच्या दिवसांत घरची माणसं रात्रीची निर्भयपणे अंगणात झोपत कारण घराच्या आत उकाड्यानं झोपेशी उभा दावा मांडलेला असे.

*अंगणात अंथरुणात पडल्या पडल्या अगणित चांदण्यांनी भरून गेलेलं आभाळ आणि त्यात खुलुन दिसणारा चंद्र न्याहाळावा. त्याच्या शुभ्र चांदण्या प्रकाशात, मोकळ्या किंचित गार वातावरणात साखर झोप घ्यावी. हा स्वर्गीय आनंद लुटणारा खरंच, खरा भाग्यवान समजावा.*
©® Dm For Credit

📸 Ranmanus Ecotourism

🌴 #राजापूर #कोकण #राजापूरकर #गावं_वाचवा

लेख मोठा आहे पण खूप माहितीपूर्ण आहे... नक्की वाचा...*आंबा 'घाईचा' उदो उदो!!*चारच दिवसांपूर्वी एका नामांकित वर्तमानपत्रां...
18/02/2025

लेख मोठा आहे पण खूप माहितीपूर्ण आहे...
नक्की वाचा...

*आंबा 'घाईचा' उदो उदो!!*

चारच दिवसांपूर्वी एका नामांकित वर्तमानपत्रांमध्ये बातमीवर नजर गेली आणि धक्काच बसला.

बातमी आहे यंदा आंब्याची पेटी कोकणातून ऑल रेडी मुंबई मार्केटमध्ये पोहोचल्याची आणि तिला तब्बल एकवीस हजार पाचशे रुपयाची किंमत मिळाल्याची भारी आहे ना?
आज हा लेख लिहायला मी बसलो आहे ती तारीख आहे 9 फेब्रुवारी, 2020.
आमच्या कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या सेंद्रिय पद्धतीच्या आंबा बागेत आत्ता कुठे आंब्याच्या झाडांना मोहर आला आहे आणि फार क्वचितच एखाद्या झाडावर मोहोराबरोबरच आंब्याची बारीक कणी म्हणजे, जेमतेम वाटाण्याच्या आकाराचे आंबे दिसू लागले आहेत मात्र तिकडे मुंबई-पुण्याच्या मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या पोहोचल्यासुद्धा. म्हणजे आमची आंब्याची बाग तब्बल तीन-साडेतीन महिने अजून मागे आहे.

तसं बघायला गेलं तर मार्केटला पोहोचलेल्या या आंब्याला सुद्धा जवळपास दोन महिने उशीरच झालेला आहे. म्हणजेच हा आंबा दोन महिने आधीच डिसेंबर मध्ये मार्केटला पोहोचायला हवा होता. काय प्रगती आहे ना ॲग्रीकल्चरशी निगडीत असलेल्या विज्ञानाची! आणि या विज्ञानाचा जनक असलेल्या माणसाची!
आणि इथे सेंद्रिय किंवा नैसर्गिक पद्ध्तीच्या नादाला लागून आमचा आंबा मात्र आम्ही मे महिन्याच्या दहा किंवा बारा तारखेला काढायला घेतो आणि त्यानंतर तब्बल आठवडाभराने म्हणजेच मे महिन्याच्या 17-18 तारखेला हा आंबा आमच्या ग्राहकांच्या मुखी पोहोचतो. काय हा ढिसाळपणा? किती हा उशीर? त्यावेळेस सर्वसाधारण मार्केट मधला आंबा म्हणजेच व्यावसायिक आंबा पेटीची किंमत जेमतेम एक हजार रुपयांपर्यंत उतरलेली असते. कुठे एकवीस हजार रुपये आणि कुठे एक हजार रुपये? किती नुकसान आहे ना व्यावसायिक आंबा उत्पादकांचं? त्यांनीसुद्धा बदलायला हवं ना त्यांच्या आंबा उत्पादन पद्धतीला म्हणजे स्वतःला सुद्धा? त्यांनी पण आंबा लवकरात लवकर पिकवून, लवकरात लवकर मार्केट ला पाठवून असाच हजारो रुपयांचा फायदा कमवायला नको का? अर्थात ही बातमी वाचून त्यांच्यातले काही जण तरी नक्कीच 'प्रेरित' झाले असतील आणि असाच उत्तम रिझल्ट मिळवण्यासाठी कंबर कसून तयारीला लागलेले असतीलच अशी 'आशा' आहे ना तुम्हाला?
या उलट, माझ्या लहानपणी म्हणजे फार जुनी नाही तर फक्त 80 च्या दशकातील ही गोष्ट. तेव्हा आंबे हे असे जानेवारी-फेब्रुवारीत नाही तर वार्षिक परीक्षा संपल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एप्रिल-मे महिन्याच्या सुट्टीत खायची गोष्ट. अक्षय तृतीयेला म्हणजे एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात कधीतरी, घरोघरी आंब्याचं नवं केलं जायचं. म्हणजेच सीझनचा पहिला आंबा, जेमतेम चार पाच आंबे, त्याचा आमरस करून सगळ्यांनी थोडा थोडाच वाटून खायचा. त्यानंतर मे महिन्याची सुरुवात झाली की आंब्यांची घरात रेलचेल चालू व्हायची. ही आठवण मी नॉस्टॅल्जिया किंवा मराठमोळी खाद्य संस्कृतीचं कौतुक वगैरे म्हणून सांगत नाहीये तर मला लक्षात आणून द्यायचंय की आंब्याचा खरा सीझन हा मे महिन्यातच असायचा. नव्हे, अजूनही तसाच आहे. नैसर्गिक पद्धतीने जोपासलेल्या आमच्या आंबा बागेत म्हणूनच आंबे आजही मे महिन्यातच तयार होतात.
आज मात्र आंबे हे मे महिन्यातला उन्हाळ्याचा मेवा म्हणून न उरता, भर थंडीत डिसेंम्बर-जानेवारी पासून खायचं श्रीमंत फळ झालं आहे. फक्त रत्नागिरी, देवगडच नाही तर, पार आफ्रिकेतल्या मलावीहुन किंवा गुजरात कर्नाटक पासूनच्या आंब्याची मुंबई-पुण्यासारख्या मार्केट मध्ये पोहोचण्याची शर्यत लागलेली असते!
*आणि ग्राहक राजा, हे सगळं तुझ्याच साठी रे!
कारण...*
या मधुर फळाची चव चाखण्यासाठी तुला मे महिन्यापर्यंत धीर धरायचा नसतो!
कारण, शक्य असेल तर तुला वर्षाचे बाराही महिने हा आंबा मिळायला हवा आहे!
कारण, तुझ्याकडे वाटेल ती किंमत मोजायची मानसिक आणि आर्थिक तयारी आहे!
कारण, तुला हा आंबा निसर्गानं हजारो लाखो वर्षांपासून फक्त उन्हाळ्यातच का बनवला आणि तेच तुझ्यासाठी, तुझ्या तब्येतीसाठी कसे उपयुक्त आहे याबद्दल जराही माहिती नाही!
कारण, उन्हाळ्याच्या इतक्या लवकर आधी हा आंबा तुझ्या मुखापर्यंत पोहोचवण्यासाठी शेतीविज्ञानानी काय काय करामती केल्या आहेत आणि त्याचा तुझ्या आणि निसर्गाच्याही तब्येतीवर काय परिणाम होत आहे हे तुला माहीत असण्याची सुतराम शक्यता नाही!

पटत असेल तर पुढे वाचाल आणि वाचाल. नाहीतर द्या इथेच सोडून...
मला माहित आहे की तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील की "आम्ही नाही बुवा असा दहा-वीस हजार रुपये देऊन जानेवारी महिन्यात आंबा खात, आम्ही तर मार्च महिन्यापासूनच आंबा खातो... तेही पेटीमागे जेमतेम पाच-सहा हजारच मोजून!"
तर काही आमच्यावरही आरोप करतील की आम्हाला शेती-विज्ञानाने केलेली प्रगती मान्य नाही किंवा आम्हाला इतर आंबा उत्पादकांनी कमावलेले पैसे बघवत नाहीत आणि आम्हाला शेतीचा व्यवसाय समजला नाही!
मुळात कुठल्याही भाजीचा किंवा फळाचा सिझन नसताना ती फळं किंवा भाज्या उगवता, पिकवता येणं ही खरंच प्रगती आहे का हेच आधी समजावून घेऊ. त्यासाठी निसर्गाने मुळातच आंबा हा उन्हाळ्यासाठी का बनवला आणि उन्हाळ्यात तयार होण्यासाठी त्याआधी झाडावर नक्की काय काय घडतं हे समजून घ्यायला हवं. "मला काय करायचं आहे आंबा कसा उगवतो हे समजावून, ते सगळं तुम्ही आंबा बागायतदारांना सांगा" असं म्हणून चालणार नाही. अर्थात आंबा बागायतदारांना हे समजायला हवं आणि दुर्दैवाने माझ्या माहितीतल्या 80% बागायतदारांना हे खरच माहित नाही. हे दुर्दैवी आहे पण खरं आहे. त्यांच्या दृष्टीने अमुक पद्धतीने आंब्याची कलमं लावली, त्यांना पाणी दिलं, छोटी असताना अमुक खतं घातली, मोठी झाल्यावर तमुक खतं घातली, अमुक कीड लागली की अमुक औषधाच्या फवारण्या केल्या, तमुक रोग येऊ नये म्हणून तमुक औषधं घातली की झालं असंच वाटतं... नव्हे, तेव्हढंच माहीत असतं! हे सगळं पटापट व्हावं असं वाटायला लावण्यात लवकर लवकर आंबे विकत घ्यायची तयारी असणाऱ्या ग्राहकांची भाऊगर्दी, लवकरात लवकर मागणी करणारी मार्केटची चढाओढ, आंधळेपणाने यालाच शेतीचं यश म्हणणारी समाजाची आणि आधुनिक शेती शास्त्राची मानसिकता मोठा हातभार लावते.
हाच आंबा बागायतदार, विशेषतः कोकणातला हापूस आंब्याचा शेतकरी... दर वर्षी त्याच्या बागेतील कमी कमी होत जाणाऱ्या आंबा पिकाच्या घटत्या प्रमाणामुळे चिंतीत आहे, बागायत पूर्णतः सोडून दुसऱ्याच व्यवसायाकडे वळतोय किंवा आंबा बागायत सोडून काजू लागवडी साठी धावतो आहे. फारशी मेहेनत न घेता दरवर्षी किलोला 150 रुपये मिळतील म्हणून बाकी सगळं तोडून टाकून फक्त काजूचीच लागवड वाढत्येय. पण सगळीकडे काजूच काजू झाले तर पुढच्या 5-10 वर्षांत 150 रुपये नाही, तर जेमतेम 50 रुपये मिळतील हे लक्षातच घेत नाहीये. तेव्हा कोकणात नारळी पोफळी, फणस, जाम्ब, जांभळं, करवंद जाऊन फक्त आणि फक्त काजूचीच झाडं दिसली तर नवल वाटायला नको. अर्थात तो विषय नंतर कधी तरी सविस्तरपणे...
याउलट, आपलं आंबा उत्पादन दर वर्षी का घटतंय, आपलं नेमकं कुठे आणि काय चुकतंय याचा त्यानं आणि आंबे खाण्याऱ्यानीही विचार करायची वेळ आली आहे.
*आधी म्हटल्याप्रमाणे मुळात झाडावरती आंबा येतो म्हणजे झाडांमध्ये नक्की काय होतं हे पाहूया.*

कोकणात आणि सर्वसाधारण प्रमाणे महाराष्ट्रात पावसाळ्याच्या शेवटी म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आंब्याच्या झाडांवर नवी पालवी येते. पुढल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये ही पालवी जून होऊन तिचा रंग गुलाबी पासून ते गर्द काळपट हिरव्या कडे झुकतो. असे जेव्हा होते तेव्हा ही पाने म्हणजेच पूर्ण झाड नव्याने प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटो सिन्थेसिस करण्यासाठी तयार होते. प्रकाश संश्लेषणाने हे झाड सूर्यप्रकाशातून विविध प्रकारचे घटक अन्न आणि ऊर्जा मिळवते. आणि त्याच वेळेस झाडाची मुळे जमिनीतून विविध प्रकारचे अन्नघटक जमा करत असते आणि झाडाला सशक्त बनवत असते या सगळ्यातूनच झाड पुन्हा अन्ननिर्मिती करण्यासाठी सक्षम होत असते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणजे झाडाला मोहर येणे. आंब्याच्या झाडाला मोहर येण्यासाठी हवामानात विभिन्नता म्हणजेच, रात्रीची थंडी आणि दिवसाची उष्णता यामध्ये किमान 10 ते 12 डिग्री अशी तफावत सातत्याने 15 ते 20 दिवस असणे आवश्यक असते. जे साहजिकच डिसेंम्बर अंती किंवा जानेवारीच्या आसपास असतं. अशा पद्धतीचे हवामान मिळाल्यास झाडाला मोहर यायला सुरुवात होते. झाडाला आलेला मोहर म्हणजे झाडाची बारीक-बारीक छोटी फुले. यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कीटक म्हणजे मधमाशा, फुलपाखरे, भुंगे, छोटे पक्षी या सगळ्यांचा या फुलांची संपर्क येऊन त्यातून परागीभवन म्हणजेच पॉलिनेशन घडते आणि तिथे आंबा या फळाचा खऱ्या अर्थाने जन्म होतो. जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरवातीस. यावेळेस आंबा हे फळ अत्यंत छोटे एखाद्या मिरीच्या दाण्या एव्हढं होत मोहरातून डोकावू लागतं. त्यानंतर अडीच-तीन महिन्याचा कालावधी म्हणजे फेब्रुवारी ते एप्रिल. हा त्या आंब्याच्या जडणघडणीत महत्त्वाचा काळ. झाडाने मिळवलेल्या सर्व अन्न आणि ऊर्जेचा वापर या फळाला मोठा करण्यासाठी होत असतो. त्या पोषणामुळे हे फळ पुढील अडीच-तीन महिन्यांत मोठे मोठे होऊन तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेल्या आणि आवडत असलेल्या हिरव्या गर्द कैरीत बदलतं. हिरव्या रंगाच्या कोवळ्या कैरीचं रूपांतर महिन्याभरातच जून होऊन फिकट हिरव्या जून आंब्यात होतं. या दरम्यान मार्च एप्रिल महिन्यात उन्हं तापायला लागलेली असतात आणि त्या उन्हातच म्हणजे त्या उष्णतेतच सगळी मेख आहे. जुनावलेल्या आंब्यात आता फ्रुक्टोज म्हणजे फळातील नैसर्गिक साखरेचं सॅच्युरेशन व्हायला सुरुवात होते आणि एथिलीन नावाच्या एंझाईमची निर्मिती होते. नैसर्गिक साखर आणि एथिलीनयुक्त असा आंबा मे महिन्याच्या सुरुवातीला झाडावरून काढायच्या योग्यतेचा झालेला असतो.
एथिलीन मुळे आंब्यातला पेकटीन नावाचा घटक विरघळायला सुरुवात होते ज्यामुळे आंबा हळूहळू मऊ आणि रसाळ व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर आंब्यामधला दृश्य फरक म्हणजे सालीचा रंग देठाकडून खालच्या दिशेने सुरुवातीला लालसर आणि नंतर केशरी पिवळा व्हायला लागतो.
थांबा!
अजूनही आंबा खऱ्या अर्थानं खाण्यालायक झालेला नाही.
यानंतर वातावरणातल्या उष्णतेमुळे आंब्यातल्या पाण्याचं बाष्पीभवन व्हायला सुरुवात होते आणि आंबा थोडा आक्रसतो आणि त्याच्या सालीला सुरकुत्या दिसायला लागतात. पाण्याचा अंश आटल्यामुळे आंबा अधिक गोड होतो...
आता मे महिन्याचा पहिला आठवडा उजाडलाय, आत्ता घ्या तो आंबा खायला!!
धीर धरी रे धीर धरी, धीरापोटी फळे रसाळ गोमटी!
आहे ना खरं?
आता पाहुयात की आंब्या सारखं नैसर्गिक साखरयुक्त म्हणजेच फ्रुक्टोजयुक्त अत्यंत गोड फळ निसर्गानी फक्त उन्हाळ्यासाठीच का बनवलं? एकदा हे कारण लक्षात घेतलं की पुन्हा कधी आंबा उन्हाळ्या व्यतिरिक्त खावासा वाटणार नाही. उन्हाळ्यामध्ये माणसाच्याआणि इतर प्राणिमात्रांच्या शरीरामध्ये साखरेची म्हणजे ग्लुकोजची गरज वाढते. कडक उन्हाळ्यातच शरीरातील पाण्याचेही डिहायड्रेशन होऊन रसयुक्त पदार्थांची आणि एनर्जीसाठी साखरेची गरज वाढते. त्यामुळे या काळात अशी फळं किंवा पदार्थ खाणं शरीरासाठी हानीकारक नसून उपयुक्तच आहे. आता बघा ना, कलिंगडा सारखं 90% पाणी आणि ग्लुकोजयुक्त फळ सुद्धा कडक उन्हाळ्यातच आणि आणि तेसुद्धा वाळवंटी प्रदेशांमध्ये पिकतं. निसर्गाने सगळ्यांच्या सोयीसाठी केलेल्या सुंदर सिस्टीम डिझाईनचं हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे. जिथे, जेव्हा जशी गरज तिथे आणि तेव्हाच, तसा पुरवठा हा निसर्गाचा नियम आहे. या नियमाच्या विरुद्ध जाऊन केवळ जिभेचे आणि मनाचे चोचले पुरवण्यासाठी उपर्युक्त हंगामम्हणजेच अप्रोप्रिएट सीजन च्या बाहेर जाऊन तशी फळं, भाज्या आणि पदार्थ खाण्यामध्ये काय शहाणपणा आहे बरं? आणखी एक उत्तम उदाहरण बघा. कोकणात कडक उन्हाळा हा एप्रिल आणि मे महिन्यामध्ये असतो तर उत्तर महाराष्ट्रात किंवा अजून वर उत्तरेकडे गुजरातमध्ये हाच उन्हाळा मे आणि जून मध्ये असतो. वरती उत्तर प्रदेशाकडे अजून वर सरकाल तसा हा उन्हाळा जून-जुलै आणि किंबहुना अगदी ऑगस्टच्या मध्यापर्यंत वाढलेला असतो. त्यामुळेच, उत्तर महाराष्ट्रात किंवा गुजरातमध्ये पिकणारा केशर आंबा मे पेक्षा जास्त जूनमध्ये पिकतो तर उत्तर प्रदेशातले दशेरी, चौसा, लंगडा सारखे आंबे हे जून-जुलैत पिकतात. पण तिकडून येणारे हे आंबे महाराष्ट्रातल्या लोकांनी जून-जुलैत भर पावसाळ्यात शरीराला साखरेची गरज नसताना खाण्यात काय फायदा आहे? चवीची गंमत म्हणून त्या काळात यातला एखादाच आंबा खाणं वेगळं आणि आंबे आवडतात म्हणून वर्षाचे 6-7 महिने देशभरातून किंवा जगभरातून येणारे वेगवेगळे आंबे खात राहणं वेगळं! अश्या मूर्खपणाचा रिझल्ट म्हणून अवेळी वयात डायबेटीस किंवा वाताशी संबंधित रोग ओढवून घ्यायचे आणि दोषी ठरवायचं आंब्यासारख्या सुंदर फळाला. म्हणजे आजचे आधुनिक न्यूट्रिशनिस्ट, डाएटिशियन्स जेव्हा आपल्याला 'इट सीजनल, इट लोकल' असा सल्ला देतात तेव्हा ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे निसर्गाच्या नियमांनी वागायचा सल्ला देत असतात; जो आपल्या जुन्या पिढ्यांना म्हणजे आजी-आजोबांना घ्यायला लागला नव्हता. कारण तेव्हा शेतीचं आणि पिकांचं असं इंडस्ट्रियलायझेशन झालेलं नव्हतं.
आज मात्र आंबा, कलिंगड, अननस सारखी फळे असु द्यात किंवा फरसबी, फ्लॉवर, गाजर सारख्या भाज्या असु द्यात; वर्षभर या सगळ्यांची निर्मिती आणि करोडो अजाण-अज्ञ ग्राहकांच्या मागणीला पुरेसा पुरवठा हे शेती व्यवसायाची पायाभूत गरज बनली आहे. त्यातून लवकरात लवकर आणि अधिकाधिक प्रमाणात उत्पन्न घेण्याची जीवघेणी स्पर्धा चालू आहे.
जीवघेणी अशा करता की, निसर्ग नियमाच्या विरुद्ध 2-3 महिने आधी आंबा पिकवण्यासाठी अनेक रसायनं, संप्रेरकं, वापरावी लागतात ज्यामुळे खूप आधी पावसाळ्याच्या शेवटी किंवा नंतर लगेचच मोहर येतो. या लवकर पण अवेळी आलेल्या मोहराला कीड, बुरशी, इतर रोग होण्याची शक्यता अधिक असते म्हणून त्यावर आणि तयार होत जाणाऱ्या आंब्यावर दहा ते वीस वेगवेगळ्या रसायनांची, कीटक नाशकांची फवारणी होते (फोटो क्र. ४). तरीही नैसर्गिक मधुरपणासाठी आणि फ्रुक्टोज सॅच्युरेशन साठी लागणारं कडकडीत ऊन तर मिळतच नाही. आंबा काढताना आणि पिकवतानाही घाईच असल्याने नैसर्गिक रित्या इथेलिन तयार होउ देण्याची वाट न पाहता केमिकली कॅापी केलेलं कृत्रिम इथेलिन फवारून पेटीतला आंबा पिकवला जातो. असा हा रसायनांची बरसात झालेला, बेचव आंबा, त्याची आवश्यकता नसताना इतक्या आधी हजारो रुपये मोजून खाण्यात काय हशील आहे? 'you are, what you eat' या नात्यानं अवेळी मोहर आणलेली अवेळी फळं, भाज्या खाऊन आपलं हार्मोनल संतुलन बिघडून लवकर वयात येणं, पीसीओडी सारख्या व्याधी, अपचनातून येणाऱ्या अनेक व्याधी, या सगळ्यांशी या सगळ्याचा संबंध असेल असं नाही का वाटत तुम्हाला?
आंबा बागायतदारांना सातत्यानं भेडसावणारी घटत्या पिकाच्या चिंतेशी सुद्धा या सगळ्याचा घनिष्ट संबंध आहे हे त्यांनी सुद्धा लक्षात घ्यायला हवं. या रसायनांच्या सतत आणि अति वापरानं झाडं ही व्यसनी माणसांसारखीच वागायला लागली आहेत, त्यांची रसायनांची गरज दरवर्षी वाढत्येय, जमिनीतल्या आणि परिसरातल्या जैविक चक्राची वाट लागत आहे, परागीभवन करणाऱ्या मधमाश्या, फुलपाखरं कोकणातून सुद्धा कमी होत चालले आहेत, आणि चुकून असलेच तर रसायनांच्या वासामुळे बागांपासून, मोहरापासून दूर पळताहेत, अपुऱ्या परागीभुवनामुळे (पॉलीनेशन) आंब्याचे उत्पन्न घटत्येय. येतंय का लक्षात?
सुरुवातीलाच उल्लेख केलेल्या पेपरमधल्या बातमीच्या मुख्य विषयानं म्हणजे 21,500/- या किंमतीने सगळ्याच ग्राहकांचं, बागायतदारांचं लक्ष वेधलं असणार. त्या सगळ्यांच्या नजरेतून सुटलं असतील ते शब्द म्हणजे, 'बदलत्या हवामानामुळे'...
या बदलत्या हवामानाला कारणीभूत आहे ती 'घाई'... 'आज, आत्ता हवं'ची...
तुमची वीसच नाही, तर पेटीमागे पन्नास हजार रुपये खर्च करायची कुवत असेल तर तिचा आदर ठेवून विनंती करतो की तुम्हीही तुमच्या त्या कुवतीचा आदरच करा. आत्ताच आणि सतत हवंय, शक्यही आहे म्हणून वाट्टेल ते वाट्टेल तेव्हा घेऊ नका.
थोडं थांबा,
नीट विचार करा.
नाहीतर,
कोकणातल्या वळणदार घाट रस्त्यांत जागो जागी दिसणारे बोर्डस पाहिले आहेत ना?

"अति घाई, संकटात नेई!”

(लेख ५ वर्ष पूर्वीचा आहे पण अजूनही परिस्थिती तीच आहे )

©® Dm For Credit

🌴 #राजापूर #कोकण #राजापूरकर #गावं_वाचवा

Address

Rajapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राजापूरकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share