Weekly & Daily SHILPKAR

  • Home
  • Weekly & Daily SHILPKAR

Weekly & Daily SHILPKAR Read shilpkar

04/11/2025

गुरुतत्व प्रदीप आयोजित भव्य पालखी रथयात्रा

*श्रीक्षेत्र कारंजा लाड ते श्रीक्षेत्र गाणगापूर* रथयात्रेचे 7 नोव्हेबर रोजी नादेड शहरात आगमण
नादेड --गुरूतत्व प्रदिप आयोजीत श्री क्षैत्र कारजा लाड ते श्री क्षैत्र गाणगापुर पालखी रथयात्रेचे दि 7नोव्हेंबर शुक्रवारीनादेड शहरात आगमण होत आसुन श्री क्षैत्र दत्तधाम परभणी चे पिठाधिपती प पु मकरंद महाराज याच्या मार्गदर्शना खाली प्रवास चालू आहे

या पालखी रथयात्रेचा नांदेड शहरातील कार्यक्रम खालील प्रमाणे सुनियोजित केला आहे.
वसमत येथून ही पालखी रथयात्रा नांदेड शहरात दाखल होईल. दिनांक 7/11/25 रोजी सकाळी 11 वाजता - सराफा लाईन येथे श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पालखी रथाचे आगमन होईल. तेथून जुना मोंढा टॉवर, वजीराबाद चौक, शिवाजीनगर, श्रीनगर वर्कशॉप कॉर्नर या मार्गे ही पालखी रथयात्रा *श्री हनुमान मंदिर, अशोक नगर* येथे *दुपारी चार वाजता* पोहोचेल. या पालखी मार्गात सर्व भाविकांनी श्री स्वामींच्या पालखी रथाचे यथोचित भव्य स्वागत व पूजन सेवेचा लाभ घ्यावा.
*दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या चरण पादुका- दर्शन, अत्तर लेपन, पूजन, भिक्षा अर्पण इत्यादी सेवेसाठी अशोक नगर येथील हनुमान मंदिरात असतील.*
इच्छुक भाविकांना *स्वहस्ते श्री स्वामींच्या चरणपादुकांस अत्तरलेपन* करता येईल. याचे *सेवा मूल्य केवळ रु.300/-* असून कार्यस्थळीच यासाठी वेळेवर नोंदणी करता येईल. *श्री स्वामी महाराजांना भिक्षा अर्पण करण्याची अपूर्व संधी नांदेडकरांसाठी चालून आली आहे. भक्ती लॉन्स येथील पारायणात मागितलेल्या भिक्षे व्यतिरिक्त नांदेडकर इतर धान्य व द्रव्य स्वरूपातील भिक्षा येथे अर्पण करू शकतात.*
*श्री हनुमान मंदिरात प. पू. श्री मकरंद महाराज (पिठाधीपती, श्री क्षेत्र दत्तधाम, परभणी) यांचे प्रवचन, पंचपदी व प्रसादाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा.*
या पालखी रथयात्रेची माहिती सर्वदूर पोहोचवून सर्व नांदेडकरांनी श्री स्वामी महाराजांच्या स्वागत, दर्शन, पूजन, भिक्षा अर्पण सेवेत सहभागी व्हावे व पालखी मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्री स्वामी कृपेचा लाभ घ्यावा असे आवाहन *गुरुतत्त्व प्रदीप परिवार* यांनी केले आहे
🙏🙏
*टीप: भाविकांनी घेतलेली भिक्षा पात्र यावेळी जमा करून आपला प्रसाद घ्यायचा आहे*

प्रभाग क्रमांक 13 मधील इंडस्ट्रीज झोनचे आरक्षण हटवावे या मागणीसाठी.                  माजी नगरसेवक विकास प्रभाकर लंगोटे म...
04/11/2025

प्रभाग क्रमांक 13 मधील इंडस्ट्रीज झोनचे आरक्षण हटवावे या मागणीसाठी. माजी नगरसेवक विकास प्रभाकर लंगोटे मुंबई स रवाना. परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील इंडस्ट्रीज झोनचे असलेले आरक्षण हटवावे या मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी माजी नगरसेवक विकास प्रभाकर लंगोटे हे मुंबई सर्वांना झाले असून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे राज्य सरकारचे मुख्य सचिव तसेच नगर विकास विभागाच्या संबंधित सर्व प्रमुखांची भेट घेऊन इंडस्ट्रीज झोनचे आरक्षण आरक्षण हटविण्याबाबत पाठपुरावा करणार आहेत शहरातील उड्डाणपूल ते दर्ग्यापर्यंत च्या रस्त्या वरील ऐंशी फुटाचे आरक्षण कमी करून तीस फूट करणे वखार महामंडळा समोरील डीपी रोडचे 50 फुटाचे आरक्षण वीस फूट करणे तसेच सर्वे नंबर 574 डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम नगर व सर्वे नंबर 576 पांडुरंग नगर येथील इंडस्ट्रीज झोनचे आरक्षण हटवून रहिवासी निवासी एरिया घोषित करणे इत्यादी मागण्याचा यामध्ये समावेश आहे परभणी शहर विकास आराखड्यातून वरील चारी ही ठिकाणचे इंडस्ट्रीज झोनचे आरक्षण रिझर्वेशन हटवण्याबाबतचा ठराव महानगरपालिका अस्तित्वात असताना विकास प्रभाकर लंगोटे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीत मांडून त्यास बैठकीत मंजुरी घेऊन तो राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे आरक्षण कमी करण्यासाठी पाठवलेला आहे त्यास म्हणून मंजूर मिळावी म्हणून विकास प्रभाकर लंगोटे मुंबई सर्वांना झाली असून ते शासनाकडे याबाबत पाठवा करत आहेत त्या इंडस्ट्रीज झोन मध्ये मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर संजय गांधी नगर वकार महामंडळासमोर झोपडपट्टी बँक कॉलनी समोरील झोपडपट्टी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम नगर पांडुरंग नगर या चारही ठिकाणचे आरक्षण हटवण्यात आल्यास भविष्यात उठवण्याचा संभाव्य धोका टळू शकतो व या ठिकाणी 45 वर्षापासून वास्तव्य करून राहणाऱ्या गोरगरीब मागासवर्गीय अल्पसंख्यांक ओबीसी व गरजवंत बहुजन समाजाच्या नागरिकांना घरकुलासह इतर सर्व प्रकारच्या मूलभूत सुख सुविधा मिळू शकतात या सर्व श्रेय यासाठी प्रयत्न करणाऱ्या विकास भाऊ प्रभाकर लंगोटे यांनाच राहील ते निर्विवाद सत्य आहे

ऐक्यासाठी संघर्ष करायला आपणच पुढे आले पाहिजे. __  बी. बी. मेश्राम १४१ वी वैचारिक प्रबोधनात्मक साप्ताहिक कार्यशाळा संपन्न...
04/11/2025

ऐक्यासाठी संघर्ष करायला आपणच पुढे आले पाहिजे. __ बी. बी. मेश्राम

१४१ वी वैचारिक प्रबोधनात्मक साप्ताहिक कार्यशाळा संपन्न.

छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) : फुले शाहू आंबेडकराईट स्टडी फाउंडेशन व दि ऑल इंडिया नाग असोसिएशन (आईना) च्या संयुक्त विद्यमाने "ऐक्याने वागल्यास भावी राजकारण आपली गुलामगिरी नाहीसी करील. करिता आपल्यातील भेद मोडनेच इष्ट आहे." या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाच्या ९३ व्या वर्धापन दिनानिमित्त ज्वलंत प्रासंगिक विषयावर १४१ वी वैचारीक प्रबोधनात्मक साप्ताहिक कार्यशाळा साकेत नगर येथील संस्थेच्या कार्यालयात २ नोव्हेंबर २०२५ ला संपन्न झाली.
फुले शाहू आंबेडकराईट स्टडी फाउंडेशनचे संचालक बी. बी. मेश्राम अध्यक्षीय मार्गदर्शन करताना म्हणाले की, समाज जीवनात कार्यशाळेची काय आवश्यकता आहे? याची निकड लोकांना वाटली पाहिजे. करिता संबंधित विषयाच्या अनुषंगाने व्यापक प्रमाणात माहितीचे आदानप्रदान झाले पाहिजे. जेणेकरून इतर जण यात स्वयंस्फूर्तीने सहभागी होतील. जनतेची ज्या कामासाठी सहमती घेतली जाईल, त्याच कामासाठी ते सहकार्य करतील. ऐक्य व्हावे असे सर्वांना वाटत असले तरी ऐक्यासाठी संघर्ष करायला आपणच पुढे आले पाहिजे. निरंतरतेने केलेल्या चर्चेतून आलेल्या निष्कर्षाची अंमलबजावणी केली पाहिजे. त्याची सुरुवात कुटुंब व्यवस्थापनातून केली पाहिजे. करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ४ नोव्हेंबर १९३२ ला गुजरात येथील बालपाखाडी येथे तिसऱ्या गोलमेज परिषदेला जाण्यापूर्वी ऐक्याने वागल्यास भावी राजकारण आपली गुलामगिरी नाहीसी करील. करिता आपल्यातील सर्व प्रकारचे भेद नष्ट करणेच इष्ट ठरेल असा संदेश दिला होता. महात्मा गांधी गोलमेज परिषदेवरून येताना मुंबईतील पियर बंदरावर अस्पृश्य वर्गातील २०००० बंधू-भगिनी त्यांना काळे बावटे दाखवून स्वागत केले होते. ज्यामुळे गांधीजींना त्यांच्या अनुयायानी फसवणूक केल्याची जाणीव झाली होती. याची सर्वसामान्यांना जाणीव व्हावी म्हणून सदरील विषयावर आपण कार्यशाळा आयोजित केली.
उद्घाटनपर मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यकर्ते सुभाष ठोकळ म्हणाले की, वर्तमानात परिवर्तनवादी चळवळीचे फारसे आशादायी चित्र दिसत नाही. समाजाचा गाढा पुढे रेटण्याची ताकद कुठे पाहायला मिळत नाही. करिता शस्त्र, अस्त्र व नीती च्या बळावर सामाजिक कार्याला प्राथमिक स्थान देऊन कार्यरत राहिले पाहिजे.
प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यकर्ते संघराज धम्मकीर्ती म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्देशित केलेल्या दिशेने मार्गक्रमण करीत असताना माणसे घडविण्यासाठी कार्य केले पाहिजे. जातीव्यवस्थेने मनामनात द्वेष, मत्सर विकसित केला आहे. म्हणून त्रिशरण, पंचशील, अष्टशील या तत्त्वानुसार धम्म आचरणाने नव समाज निर्माण केला पाहिजे. करिता बोधीसत्व आंबेडकरांचे मिसन समजून घेऊया.
याप्रसंगी महादेव डांबरे म्हणाले की, समाज परिवर्तनासाठी अखिल भारतीय स्तरावर एकीने कार्य केले पाहिजे. दीपक पगारे म्हणाले की, पोटभरू स्वार्थी नेत्यांनी समाजाची वाट लावली आहे. प्रा. शिवम गायकवाड म्हणाले की, शासन यंत्रणेत आपली माणसे पाठविण्यासाठी समाजात एकता आणि अखंडता आवश्यक आहे. लायक लोक राजकारणापासून दूर राहिल्याने ती जागा नालायक लोकांनी भरून काढली. सोहेल पटेल म्हणाले की ऐक्यात स्वाभिमान आहे, ज्यात सर्व धर्मीयांचा समावेश केला पाहिजे. उद्योजक मिलिंद बागुल म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत ते अस्पृश्याचे नेते असल्याचे पटवून दिले होते. लायक उमेदवार कोण आहेत? याची जाणीव करून देण्यासाठी कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजेत.
सुरुवातीला आदर्शांना पुष्प व पुष्पमाला अर्पण करून फाउंडेशन च्या वतीने मान्यवरांचे व उपस्थित प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ओम संग्राम घाटे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन अ‍ॅड. विलास रामटेके तर प्रास्ताविक प्रा. विलास कटारे यांनी व्यक्त केले.

महाविकास आघाडीने  भीमशक्ती संघटनेस  सन्मानपूर्वक जागा नाही दिल्यास;  स्वबळावर लढणार...सतीश भिसे**परभणी (दि. 03 नोव्हेंबर...
04/11/2025

महाविकास आघाडीने भीमशक्ती संघटनेस सन्मानपूर्वक जागा नाही दिल्यास; स्वबळावर लढणार...सतीश भिसे*

*परभणी (दि. 03 नोव्हेंबर 2025) — बहुजनांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी भिमशक्ती सामाजिक संघटना परभणी जिल्हा आढावा बैठक आज सावली विश्रामगृह येथे दुपारी 12 वाजता संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.विजय कुमार सुखदेव, प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा विभागाचे महासचिव प्रा. डॉ. प्रवीण कनकुटे सर उपस्थित होते*
*बैठकीत संघटनेच्या पुढील वाटचालीवर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून भिमशक्ती संघटना आगामी निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे ठरविण्यात आले. संविधानवादी आणि पुरोगामी विचारसरणी असलेल्या पक्षांशी आघाडी करण्याबाबतही चर्चा झाली. महाविकास आघाडीतील पक्षांनी सकारात्मक भूमिका घेतली तर सन्मानजनक तिकीट वाटपाच्या अटींवर भिमशक्ती आघाडीबाबत विचार करेल अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवणार असा ठराव बैठकीत पारित करण्यात आला.*
*संस्थापक अध्यक्ष मा. खा.चंद्रकांत हांडेरे साहेबांनी दिलेल्या दिशानिर्देशांनुसार संघटनेचा पाया अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मनुवादी व संघ परिवाराच्या विचारसरणीला विरोध करून सामाजिक न्यायासाठी लढा उभारण्याचा निर्धार देखील बैठकीत करण्यात आला.*
*सदरील बैठकीत परभणी जिल्ह्यातील ऑटोचालकांचे नेते मा.राजू खरात यांनी असंख्य ऑटोचालका सोबत भिमशक्ती संघटनेत प्रवेश करण्याची घोषणा केली. तसेच आंबेडकरी चळवळीतील नेते मा. संघरत्न हातागळे व त्यांची संपूर्ण टीम भिमशक्तीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.*
*भिमशक्तीच्या या आढावा बैठकीत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला व परभणीत मा.खा.चंद्रकांतजी हंडोरे साहेबांच्या अध्यक्षते खाली होणाऱ्या सामाजीक ऐक्य परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले..*
*सदरील बैठकीस भीमशक्तीचे मीडिया प्रमुख प्रवक्ते मा.सुहास पंडित, प्रवक्ते मा.तातेराव वाकळे, जिल्हाउपाध्यक्ष मा.अभिनंदन मस्के, ता.अध्यक्ष मा.राहुल कणकुटे, शहराध्यक्ष विक्रम काळे, सेलू तालुकाध्यक्ष मा.बालकिशन साळवे, सोबत राहुल डुमने, संजय वाव्हळे, बबन वाव्हळे, दीपक कणकुटे, आकाश मुंढे, सुरेश यादव, दशरथ कदम, विशाल खिल्लारे, आकाश आहिरे, शेख अझहर, शेख फैयाज, राजेश चव्हाण, एकनाथ कदम आदी उपस्थित होते..!*

विचाराला कृतीची जोड देणारा कर्मयोगी : प्रा मुकूंद भारसाकळे*✍️सरिता सातारडे, नागपूर03/11/2025"विचार म्हणजे दिशा, आणि कृती...
04/11/2025

विचाराला कृतीची जोड देणारा कर्मयोगी : प्रा मुकूंद भारसाकळे*

✍️
सरिता सातारडे, नागपूर
03/11/2025

"विचार म्हणजे दिशा, आणि कृती म्हणजे प्रवास
विचाराला कृतीची जोड दिली की परिवर्तन घडते."
मनुष्य हा विचारशील प्राणी आहे. त्यामुळे विचार हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. परंतू केवळ विचारच करणे परंतू प्रत्यक्ष कृती न करणे म्हणजे अर्धवट काम करने होय. म्हणून आमूलाग्र परिवर्तन घडवायचे असेल तर विचाराला कृतीची जोड देणे आवश्यक आहे.
आपण समाजजीवनात नेहमीच बघतो की लोकं मोठमोठी भाषणे देतात , परिवर्तनवादी विचार मांडतात. उच्च मूल्यांची चर्चा करतात पण प्रत्यक्ष जीवनात त्या मूल्यांचा अवलंब करित नाहीत. अशावेळी तो विचार फक्त शब्दांपूरता मर्यादित राहतो.

दुसरीकडे असेही लोकं असतात जे आपल्या विचारांना कृतीत उतरवतात. विचाराला कृतीची जोड देणे म्हणजे आपल्या अंतःकरणात उत्पन्न झालेल्या चांगल्या, सत्य आणि न्याय्य विचारांना प्रत्यक्ष जीवनात उतरवणे. अशा कृतीतून व्यक्तीचे, समाजाचे आणि राष्ट्राचे कल्याण घडते. त्यामुळे जी व्यक्ती विचाराला कृतीची जोड देते ती व्यक्ती समाजाच्या आणि मानवतेच्या इतिहासात आपले अढळ स्थान निर्माण करतात.

तरच अशाप्रकारे विचारांतून कृतीचा वारसा सांगणारे अकोला मधील डाॅ बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा मुकूंद भारसाकळे या एका कर्मयोग्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

प्रा. मुकूंद भारसाकळे हे अकोला जिल्ह्य़ातील सामाजिक कार्यकर्ते आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रतिष्ठान अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत आहे. ज्याचा मुख्य उद्देश समाजाच्या दुर्बल व मागासवर्गीय घटकांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. त्यांचे कार्य विशेषतः शिक्षण, बौध्द - धम्म विचारधारा, सामाजिक न्याय आणि सहकार या क्षेत्रांवर केंद्रित आहे. प्रा. भारसाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठान शाळा - काॅलेज विद्यार्थांसाठी कार्यशाळा, सार्वजनिक व्याख्याने, प्रशिक्षण कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम आणि दर रविवारला धम्मशाळा (संस्कार शिबीर) आयोजित करित असते. यामुळे स्थानिक लोकांमध्ये सामाजिक जागरूकता वाढली आहे आणि विद्यार्थ्यांना उच्च मूल्यांवर आधारित जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली आहे.

प्रा. मुकूंद भारसाकळे यांचा दृष्टिकोन स्पष्ट आहे. विचाराला कृतीची जोड द्यावी. याचा अर्थ समाजातील समस्या ओळखणे आणि त्यावर विचार करणे महत्त्वाचे असले तरी त्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरविणे अधिक आवश्यक आहे. प्रा. भारसाकळे यांनी या तत्त्वावर आधारित अनेक सामाजिक उपक्रम राबवले. ज्यामुळे स्थानिक समाजात सकारात्मक बदल घडू शकला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अकोला जिल्ह्य़ातील लोकांमध्ये सामाजिक न्याय, बौध्द विचारधारा आणि समानतेची जाणीव अधिक दृढ झाली आहे.

या प्रतिष्ठान ची सुरूवात 2002 पासून झाली. सुरूवातीची चार वर्षे प्रा. मुकूंद भारसाकळे यांनी डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना समजून घेतले. बाबासाहेबांनी लिहिलेले विविध ग्रंथ, लेखन आणि भाषणांची खंडे यातील मतितार्थ समजून घेतला.आणि 2006 पासून प्रतिष्ठान च्या कार्यास प्रारंभ केला. प्रा. भारसाकळे आपल्या भाषणात म्हणतात, "डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते मी पूर्ण भारत बौध्दमय करील. बाबासाहेबांनी खोटे म्हटले असे कोणीही म्हणणार नाही. आणि जर बाबासाहेबांनी म्हटलेले खोटे नाही तर ते खरे कसे होईल? भारत बौध्दमय कसा होईल? तर भारत बौध्दमय करण्याची जिम्मेदारी डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील बौध्द जनतेवर टाकलेली आहे असा विचार व्यक्त करतात. प्रतिक्रांतीचे वारे या देशात खूप मोठ्या प्रमाणात येथील अज्ञानी जनतेवर आदळत आहे त्यामुळे येथील बौध्द अनुयायांनी सतत जागृत असावे असा समज्यंस सल्ला ही ते देतात. प्रा. भारसाकळे सांगतात की 90% बौध्द समाज अजूनही हालअपेष्टेचे जीवन जगत आहे. या 90% बौध्द समाजाच्या सर्वागीण विकासाची जिम्मेदारी कोणावर आहे? तर आजपर्यंत ज्या समाजाने आरक्षण घेतलेले आहे त्यांची जिम्मेदारी आहे या 90% समाजाचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करने. कारण ही 10% जनता समाजाची प्रतिनिधी म्हणून वावरत आहे. आपण आपल्या समाजाचे प्रतिनिधी म्हणून नौकरीवर आहोत म्हणुन बौध्दांसाठी दानपारमिता आवश्यक आहे.
दानपारमितेची एक संपूर्ण शृंखला सांगताना भारसाकळे सर म्हणतात, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे की आपल्या कमाईचा विसावा हिस्सा आपण समाजकार्यासाठी द्यावा. विसावा हिस्सा म्हणजे समजा आपली कमाई शंभर रुपये असेल तर विसावा हिस्सा म्हणजे पाच रूपये समाजकार्यासाठी द्यावे. भारसाकळे सर तीन कानमंत्र आपल्या भाषणातून उपस्थितांना देत असतात.
1)बौध्दांनी पाळावयाचे पंचशील.
2)बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा आणि
3)बौध्दांनी आपल्या कमाईचा विसावा हिस्सा समाजकार्यासाठी दान करावा. हे प्रतिष्ठान फक्त बौध्दानाच या प्रतिष्ठानचे आजीवन सभासद बनविते कारण बौध्दमय भारताच्या दिशेने त्यांनी केलेली ही सुरूवात आहे. दानपारमिता असणाऱ्या दानशूर धम्मदात्यांची नावे प्रत्यक्ष भींतीवर कोरलेली आहेत.

या प्रतिष्ठानतर्फे ज्या प्रकल्पांची सुरूवात झालेली आहे ती नावे खालीलप्रमाणे-
1)डाॅ बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान , प्रबोधन नगर अकोला.
2)सुभेदार रामजी आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष अर्बन क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटी.
3)डाॅ बाबासाहेब आंबेडकर काॅलेज आॅफ जर्नालिझम अॅन्ड सोशल वर्क.
4)मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रबोधन भवन.
5)मा.अनुसया नर्सिंग काॅलेज, प्रतिष्ठान अकोला.
6)उत्कर्ष लॅन्ड डेव्हलपर्स कंपनी.
7)प्रतिष्ठान धम्मसंस्कार वर्ग.
8)साप्ताहिक समाज न्यायपत्र.
9)प्रतिष्ठान आरोग्य क्लिनिक.
10)प्रतिष्ठान दिशा डायग्नोसिस सेंटर.
11)दंत चिकित्सा व मुखरोग मार्गदर्शन.
12)अशोका एंटरप्राइजेज.
याशिवाय यूपीएससी, एमपीएससी च्या स्टूडन्ट्स साठी फ्री कोचिंग ही प्रतिष्ठान मध्ये घेतल्या जाते.
याव्यतिरिक्त
1)100 बेडचे डॉ बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल,
2)25 एकर मध्ये डाॅ बाबासाहेब आंबेडकर कोआपरेटिव फार्मिग.
3)25 एकर मध्ये उभारण्यात येणारे शैक्षणिक संकूल (Education hab) आर्ट, सायन्स, कामर्स फॅकल्टी.. एका यूनिवर्सिटी साठी जे जे विभाग आवश्यक आहेत ते सर्वच करण्याचा प्रा. मुकूंद भारसाकळे सरांचा मानस आहे.
4)लार्ड बुध्दा पार्क 30 हजार चौरस फुट या सर्व संकल्पना सुध्दा हळूहळू आकाराला येत आहे.
प्रतिष्ठान हा डोलारा अवघ्या 19 वर्षात या प्रकारे आकाराला आलेला आहे. "बौध्दांचे, बौध्दांनी, बौध्दांसाठी, बौध्दांच्या संपूर्ण उन्नयनासाठी प्रा. मुकूंद भारसाकळे नेतृत्वाखाली तयार झालेले प्रतिष्ठान म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान" अशा शब्दांत या प्रतिष्ठान ची व्याख्या तैयार करता येते. आजवर या प्रतिष्ठान मध्ये जवळपास 170 कोटी रक्कम खर्च झालेली आहे आणि तीही बौध्दांच्या दानपारमितेतून हे ही विशेष.

माणसाने मनात आणले तर तो काय करू शकतो याचे एकमेव उदाहरण म्हणजे अकोला जिल्ह्य़ातील डॉ बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान. एकटा माणूस काहीच करू शकत नाही. पण जेव्हा मदतीचे चार हात एकत्र होतात तेव्हा अकोला जिल्ह्य़ातील प्रतिष्ठान आकाराला येते. देशातील सर्वच बौध्दांनी प्रा. मुकूंद भारसाकळे सरांनी साकारलेल्या प्रतिष्ठानला भेट देऊन त्यांचे कार्य समजून घेऊन बौध्दमय भारताच्या दिशेने प्रवास करावा.
आपण एकीकडे म्हणतो की विषमतेचे वारे या देशात वाहात आहे. सारेकाही संपण्याच्या मार्गावर आहे तेव्हा अशाप्रकारे पाॅझिटिव विचारांचे उज्वल भवितव्य घडविणारे प्रा. मुकूंद भारसाकळे सरांच्या स्वप्नातून साकार झालेले हे प्रतिष्ठान जेव्हा आपण बघतो तेव्हा आशावादी जीवन अधिक पल्लवित होते आणि कुठेतरी चांगले घडत आहे तर या सन्मार्गाच्या कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा असे प्रत्येक सुजाण नागरिकांना सहजच वाटून जाते. प्रा. मुकूंद भारसाकळे सरांनी उभारलेली स्वाभिमानाची ही चळवळ उत्तरोत्तर अशीच प्रगतीपथावर राहून देशाच्या प्रत्येक ठिकाणी आकाराला यावी हीच या ठिकाणी मंगलकामना.
मा.सौ.सरिताताई सातरडे
नागपुर
मो.8308853051......................

*नवी मुंबईतील नामवंत हास्पिटल्स मध्ये पेशंटच्या नातेवाईकांसाठी पार्किंग व्यवस्था का नाही?* वार्ताहर : अनंतराज गायकवाड वा...
04/11/2025

*नवी मुंबईतील नामवंत हास्पिटल्स मध्ये पेशंटच्या नातेवाईकांसाठी पार्किंग व्यवस्था का नाही?*

वार्ताहर : अनंतराज गायकवाड
वाशी, नवी मुंबई.
दि. ०३/११/२५

*धर्मादाय संस्थेच्या नावाने अत्यल्प किंमतीत भूखंड मिळवून त्यावर आलिशान रुग्णालये बांधून करोडो रुपये कमावणाऱ्या रुग्णालयाने येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांसाठी वाहन पार्किंगची व्यवस्था नसल्याने त्यांना वाहने रस्त्यावर लावली जातात. त्यावर वाहतूक पोलीस कारवाई करतात हा भुर्दंड का सोसायचा असा प्रश्न विचारला जात आहे?*

*शहरात एमजीएम, फोर्टिस, अपोलो, कोकिळाबेन व तत्सम अनेक नामांकित आरोग्यसेवा देणारे हॉस्पिटल्स मागील काही वर्षांपासून कार्यरत आहेत. सर्वसामान्यांना न परवडणारे उपचार येथे मिळतात मात्र मध्यमवर्गी्यांना उपचारासाठी लाखों रुपये देऊनही पार्किंग साठी जागा हॉस्पिटल्स आवारात मिळत नाही.परिणामी गाडी रस्त्यावर पार्क केल्याने वाहतूक विभागाच्या दंडात्मक कारवाईला भोगावे लागत आहे.*

*धर्मदाय संस्थेच्या नावाने सरकारकडून अत्यल्प दरात भूखंड घेऊ त्यावर हॉस्पिटल्सची टोलेजंग वास्तू उभी करायची.डॉक्टर्स तसेचमहत्वाच्या हॉस्पिटल स्टाफसाठी गाड्या पार्किंग व्यवस्था केली जाते मात्र पेशंटच्या नातेवाईकांना हॉस्पिटल्स आवारात पार्किंग ला नकार दिला जातो. नेरुळ येथील डॉ. डीवाय पाटील हॉस्पिटलने ही पार्किंग व्यवस्था न ठेवता रुग्णांच्या नातेवाईकांच्या वाहनांना वाऱ्यावर सोडले आहे. वाहतूक विभागाने याबाबत गांभीर्याने विचार करुन हास्पिटल प्रशासनासोबत चर्चा करुन पेशन्टच्या नातेवाईकांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यासाबंधी दबाव टाकावा. अशी मागणी जोर धरू लागली आहे.*

आयुर्वेदिक नाडी तज्ञ  डॉ गोविंद कामटे यांनी महानगरपालिकेची निवडणूक लढवावी* लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकरआज प्रतिनिधीपरभणी...
04/11/2025

आयुर्वेदिक नाडी तज्ञ डॉ गोविंद कामटे यांनी महानगरपालिकेची निवडणूक लढवावी* लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर
आज प्रतिनिधी
परभणी जिल्हा महाराष्ट्र भर आयुर्वेदिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेले जगप्रसिद्ध डॉक्टर आयुर्वेदिक नाडी तज्ञ हजारो लोकांना करोडो लोकांना आज यशस्वी बसून रोगापासून मुक्त करणारे लोकांना चांगले रिझल्ट च्या माध्यमातून लोकांचे भले करणारे गोरगरिबांना मदत करून आरोग्य चांगले निरोगी करून देणारे सर्वांचे आदर्श व्यक्तिमत्व कोणताही समाजामध्ये कोणत्याही समाजासोबत प्रत्येक समाजासोबत काम करून आरोग्याच्या माध्यमातून चळवळ अशा महाराष्ट्रात उभी करणारे परभणी जिल्ह्यातील बालाजी आयुर्वेदिक निसर्ग सल्ला उपचार केंद्र चे संचालक अध्यक्ष आयुर्वेदिक विशारद नाडी तज्ञ ओबीसी समाजाचे लोकप्रिय नेते डॉ गोविंद कामटे असलेले वार्ड क्रमांक पंधरा मधून निवडणुकीसाठी सज्ज राहावे कारण ओबीसी समाजाचे नेते ओबीसी समाजात कार्य करणारे ओबीसी समाजाला न्याय मिळवून देणारे आदर्श व्यक्तिमत्व जनसामान्याचे समाजसेवक आयुर्वेदिक नाडी तज्ञ डॉ.गोविंद कामटे सेलूकर यांनी मागील 30 वर्षापासून परभणी शहरात सामाजिक चळवळीच्या धबधबा निर्माण केलेला सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत त्यांच्या सुखा दुखात सोबत राहून कोणत्याही शेतकरी असो किंवा शहरातले प्रश्न असो यासाठी आंदोलन मोर्चे यासाठी पाठबळ देणारे त्यांच्यासोबत आंदोलनामध्ये सहभाग घेणारे परभणी जिल्ह्याचा विकास महाराष्ट्राच्या विकासासाठी अहोरात्र महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करणारे आंदोलन असो मोर्चा असो अनेक क्षेत्रातल्या सर्वांसोबत एकत्र काम करणारे सर्व पक्षांसोबत चांगले हिताचे संबंध कोणत्याही नगरपालिकेत असून जिल्हा परिषद असो मार्केट कमिटी असो आमदारकी असो खासदारकी असो याच्यामध्ये ज्यांचं त्यांना पाठिंबा तोच प्रतिनिधी निवडून येतो हा त्यांचा त्यांची कार्य आहे म्हणून त्यांनी आपल्या वार्ड क्रमांक पंधरा ओबीसी प्रवर्गातून मधून डॉ गोविंदा कामटे यांनी नगरसेवकांसाठी निवडणूक महानगरपालिका लढवावी ही सर्व परभणीतील जनतेची प्रभागातील सर्व कॉलनीतील सर्व जिल्ह्यातील वेगवेगळ्या सामाजिक संघटना पक्ष वेगवेगळे हितचिंतकांची व जनतेची इच्छा आहे की आपण नगरसेवक या रूपाने निवडणूक लढवून जनतेचे आणि सर्व समाजाच्या हिताचे कार्य करावे अशी अपेक्षा वार्ड क्रमांक 15 सार्वजनिक विकास महा संघर्ष समिती चे संयोजक गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान केले आहे अशी माहिती वार्ड क्रमांक पंधरा चे जनतेच्या मनातले नगरसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकारद्वारे माहिती दिली

परभणी जिल्ह्यातील २६५ अंगणवाड्या होणार स्मार्ट**-- महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर*परभणी, दि. ३  :- म...
04/11/2025

परभणी जिल्ह्यातील २६५ अंगणवाड्या होणार स्मार्ट*
*-- महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर*

परभणी, दि. ३ :- महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी “स्मार्ट अंगणवाडी किट” खरेदीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील सुमारे २६५ अंगणवाडी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून, या केंद्रांचे रूपांतर आदर्श आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त ‘स्मार्ट अंगणवाड्यां’मध्ये करण्यात येणार आहे.

*महिला व बालविकास राज्यमंत्री तथा परभणी जिल्हयाच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले की, “मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी शिक्षण, आरोग्य आणि पोषण या तिन्ही घटकांचा समन्वय साधणारी स्मार्ट अंगणवाडी ही एक नवी क्रांती ठरणार आहे. स्मार्ट अंगणवाडी योजनेमुळे परभणी जिल्हयातील लहान मुलांना सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी शिक्षणाचे वातावरण उपलब्ध होईल. मुलांच्या सर्वांगीण विकासासोबतच महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे. आपल्या परभणी जिल्हयासाठी ही अतिशय गौरवाची बाब असून जिल्हयातील २६५ अंगणवाड्या स्मार्ट होणार आहेत.”*

या योजनेमुळे प्रत्येक अंगणवाडीत शिक्षण, आरोग्य, पोषण आहार, स्वच्छता व बालसंगोपनासाठी आवश्यक असणारे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे अंगणवाडी केंद्रांमध्ये मुलांसाठी आनंददायी, सुरक्षित आणि शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यास मदत होईल.

परभणी जिल्हयातील परभणी, सेलू, जिंतूर, पूर्णा, मानवत, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, पालम या सर्व तालुक्यांतील अंगणवाड्या या योजनेत समाविष्ट आहेत. यामुळे ग्रामीण भागातील बालकांना दर्जेदार शिक्षण, पोषण आणि आरोग्यसेवा मिळणार असून स्थानिक अंगणवाड्या आधुनिक शिक्षण व आरोग्य विकासाचे केंद्र म्हणून विकसित होतील. या प्रकल्पामुळे बालकांच्या वाढीचा, आरोग्याचा व पोषणस्थितीचा मागोवा घेण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर होईल.

महिला व बालविकास विभाग राज्यातील अंगणवाड्या सुसज्ज, आकर्षक आणि कार्यक्षम बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून ‘स्मार्ट अंगणवाडी योजना’ ही बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाने उचललेले अत्यंत महत्त्वाचे आणि दूरदृष्टीचे पाऊल ठरणार आहे.

परभणी जिल्हयातील स्मार्ट करावयाच्या अंगणवाडी केंद्रांचे नाव तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे.
*तालुका परभणी* – पारवा क्र.२, उमरी क्र.२,बोरवड बु क्र.१,पारवा क्र.३,कास्टगाव,पेडगाव क्र.१,ब्राम्हण गाव क्र. १,ब्राम्हण गाव क्र.३,ब्राम्हणगाव क्र.४,मांडाखळी क्र.३,साटला,झरी क्र.९,झरी क्र.६,सावगी खु-१,टाकळी क्र.६,सांवगी खु-२,सबर क्र.२, मांगणगाव क्र.२, मौजे नांदखेडा अंगणवाडी क्र.२,मौजे कोटमवाडी, मौजे कैलासवाडी अंगणवाडी, मौजे सायला (ख) अंगणवाडा-१, पिंपरी क्र.3, पाथरा क्र.2, पोखरणी क्र.7, तामसवाडी, पोखरणी क्र.4, आंबेटाकळी क्र.1, ताडपांगरी क्र.1, शिंगणापूर क्र.1, पिंगळी क्र.8, ब्रह्मपुरी क्र.1,ब्रह्मपुरी क्र. 2, साळापुरी क्र.2,दैठणा क्र. 8,पेडगाव,तरोडा,पिंपळगाव समी,आरवी, पेगरगव्हाण, माळसोन्ना,इंदेवाडी, कार्ला.

*तालुका सेलू*- डासाळा क्र. २,राधे धामणगाव, डासाळा क्र. २, डेंगळी पिंपळगाव क्र.२, गोमवाकडी, गोहगाव, करडगाव, कवडधन, डिग्रस खुर्द, वाकी, पिंपराळा, वाई क्र.१,वालूर क्र.२, वालूर क्र.४, वालूर क्र.१०, हातनूर क्र. २,बोरगाव जहागीर, हट्टा, कुपटा क्र.१, रावा, सिमणगाव क्र. २, सिमणगाव क्र. १,निरवाडी खुर्द, निरवाडी बुद्रक,कुंभारी, हिस्सी, गुगळी धामणगाव, धनेगाव,मोरेगाव, शिंदे टाकळी, शेलवाडी, निपाणी टाकळी, बोरकीनी, तिडी पिंपळगाव, शिराळा, आहेर बोरगाव, राजवाडी, आडगाव दराडे, काजळी रोहिना, वलंगवाडी, केमापूर, पिंपरी खुर्द, पिंपरी बुद्रुक, माले टाकळी.

*तालुका जिंतूर* – कुंभारी, दुधगांव क्र. १, कौसडी क्र. ७, धानोरा (बु) क्र. १, धानोरा (बु) क्र. २, वरुड (नृ) क्र. २, वरुड क्र. ३, कौसडी क्र. ५, चारठाणा क्र. ७, चारठाणा क्र. ४, नागनगाव, कडसावंगी, आडगाव (बा) क्र.१, जवळा (खु), कोक क्र.१कोक क्र. २, मुडा क्र.१, हनवतखेडा, आसेगाव क्र. ०२, करवली, माथला, सोन्ना, इटाली क्र.२, जोगवाडा क्र. ३, सोनापुर क्र.१, रिडज क्र. १, पिंपळगाव क्र.. १ (गा), दुधनगाव, चामणी, चिंचोली काळे, पोखर्णी तांडा, दहेगाव क्र.१,वडाळी, सावंगी (म्हा) क्र. १, हिवरखेडा,भोसी क्र. १, चौंधरणी, कसर,सोरजा क्र. १, मानधानी, वाघी धा, कोठा, बामणी बु.,निवळी बु., गणपुर, हलविरा, मानकेश्वर (चा), डोहरा, गोंधळा, शेक, अकोली, माक,सावरगाव,सोस, येसेगाव,बलसा.

*तालुका पुर्णा* - वझर क्र.१,कळगाव क्र. १,गौर क्र. ३, धनगर टाकळी क्र.१,आलेगाव क्र.१, हिवरा क्र.१, पिंपळा लोंखडे, रुज क्र.१,कानडखेडा क्र. १, कान्हेगाव क्र.१, ताडकळस क्र. ३, हटकरवाडी, कानडखेडा, फुकटगाव, एरंडेश्वर क्र. १, एरंडेश्वर क्र. ४,कातनेश्वर क्र. ४.

*तालुका मानवत* – अटोळा, कोथाळा क्र.१, कोथाळा क्र.२,सावंगी मगर क्र.२, गोगलगाव क्र.२,देवलगाव क्र.१, रुढी क्र.२,केकर जवळा क्र.1, केकर जवळा क्र.2, खडकवाडी,रत्नापुर,रामेटाकळी क्र.1, रामपुरी क्र.1,हाटकरवाडी क्र.1, लोहरा क्र.1, मंगरुळ पा. प क्र.4, इटाळा ब्र, खरबा, रामपुरी बु.,वांगी, थार, वझुर बु., हमदापुर,हटकरवाडा,रामेटाकळी,जाब, हसनापुर,शहापूर.

*तालुका गंगाखेड* – धारखेड क्र.1,धारासुर क्र.3, सायाळा क्र.2, खंडाळी क्र.2, मरडसगाव क्र.1, बोर्ड क्र.2, कोद्री क्र.1, कोद्री क्र.2, माखणी क्र.3, बडवणी क्र.2, इसाद क्र.5, महातपुरी क्र.5, मौजे खळी, मौजे डोंगरगाव, मौजे अकोली,मौजे मानकादेवी,मौजे तांदुळवाडी,मौजे बडवणी, मौजे सांगळेवाडी, मौजे भेंडवाडी,मौजे सलमोहा,मौजे डोंगरजवळा,मौजे माखणी, मौजे खंडाळी, मौजे वाथा,मौजे वलवाडी,मौजे कासारवाडा,मौजे ढवळकवाडी,मौजे महातपुरी, मौजे वनपिंपळा, मौजे पांगळा.

*तालुका सोनपेठ* – डिघोळ क्र.4, धामोनी क्र.1, वाघलगाव,थडीउक्कडगाव, गंगापिंप्री, वाडी पिंपळगाव, शेळगाव क्र.3, शेळगाव क्र.2,नरवाडी क्र.1,निळा क्र.1,वंदन क्र.1, करम तांडा, चतुर नाईक तांडा, उखळी क्र.2, पोहडूळ,पांहडूळतांडा, बनवाडी.

*तालुका पाथरी* - गोपेगाव क्र.1,कासापुरी, लिंबा क्र.4,देवनांद्रा क्र.4, रेनापुर क्र.1, तूरा क्र.1, टाकळगव्हाण, हादगाव क्र.2, रामपूरी क्र.3, मरडसगाव क्र.1, बाभळगाव क्र.4, विटा क्र.1, खर्डा क्र.1, बाभळगाव क्र.2.

*तालुका पालम* -फरकंडा क्र.1, गुळखंड, आरखेड क्र.1, फळा क्र.1, पेठ शिवनी क्र.3, सातेगाव क्र.1,शेख राजुर क्र.2, पेठपिंपळगाव क्र.3, वनभुजवाडी, आडगाव, नाव्हलगाव,चाटोरी क्र.4, बदरवाडी, खड़ी क्र.1,तांदुळवाडी क्र.1, पेंडू खु. क्र.1.
****

मुलांमधील असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी एसओपी तयार करणार – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर*मुंबई, दि. ३ : राज्यातील जनत...
04/11/2025

मुलांमधील असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी एसओपी तयार करणार – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर*

मुंबई, दि. ३ : राज्यातील जनतेचे आरोग्य सदृढ राहावे आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा विनासायास उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासन सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात अनेक उपक्रम राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर मुलांमधील असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना (एसओपी) तयार करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

मुलांमधील असंसर्गजन्य आजार एक वाढती समस्या या विषयी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. कार्यशाळेस युनिसेफचे संजय सिंह, आरोग्य सेवा संचालक, डॉ. विजय कंदेवाड (दूरदृश्य प्रणालीद्वारे), महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. मृदुला फडके, ‘युनिसेफ’चे डॉ. मंगेश गाधारी उपस्थित होते. काही लोकप्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यशाळेत सहभागी झाले होते.

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, सृदृढ बालके आपल्या देशाचे भविष्य असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करणे आहे. मुलांमधील असंसर्गजन्य आजार याविषयी अधिक व्यापक जनजागृती होण्यासाठी अधिवेशन काळात विधिमंडळ सदस्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली जाईल असेही त्यांनी सांगितले. राज्याचा आरोग्य विभाग व युनिसेफ यांच्यामार्फत आरोग्यदायी बालपण ही संकल्पना राबविण्यात येणार असून यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग व पुढाकार महत्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, आधुनिक जीवनशैली, बदलती आहार पद्धती आणि शारीरिक निष्क्रियतेमुळे मुलांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, मानसिक ताणतणाव यासारखे असंसर्गजन्य आजार वाढत आहेत. यावर मात करण्यासाठी समाज, शाळा, पालक आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी महत्वाची आहे. आपल्या भागातील प्रत्येक बालक सृदृढ, निरोगी राहावे, ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावे यासाठी आरोग्य विभागामार्फत राबविण्यावर येणारे उपक्रम यशस्वीपणे राबिण्यावर भर देण्यात यावा. तसेच शाळांमध्ये नियमित आरोग्य तपासणी शिबिरे, तंदुरुस्त बालपण मोहीम आयोजन, पौष्टिक आहार आणि शारीरिक क्रियाशीलतेबाबत जनजागृती आणि मुलांच्या मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले.

आधुनिक जीवनशैली, असंतुलित आहार आणि शारीरिक निष्क्रियतेमुळे मुलांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह, अस्थमा, मानसिक आरोग्य या समस्या आणि रक्तविकार झपाट्याने वाढत आहेत. भावी पिढीसाठी ही चिंतेची बाब असून लोकप्रतिनिधी, शाळा, पालक सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन या आजाराविरुद्ध यशस्वी लढा देण्यात पुढाकार घ्यावा. महाराष्ट्र राज्याने बाल मृत्यूदर कमी करण्यात देशाला दिशा दिली आहे. त्याचप्रमाणे बालकामधील असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी राज्याने दिशादर्शक असे काम करावे, अशी अपेक्षा युनिसेफचे डॉ. संजय सिंह यांनी यावेळी व्यक्त केली.

किशोरवयीन मुलांमध्ये अस्थमा, लठ्ठपणा, मधुमेह वाढत आहे असे सांगून डॉ. मृदला फडके म्हणाल्या असंसर्गजन्य आजारांबाबत व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. असंसर्गजन्य आजारात किशोरवयीन मुलींच्या आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या.

यावेळी युनिसेफचे डॉ. मंगेश गाधारी आणि आरोग्य सेवा संचालक यांनीही मनोगत व्यक्त केले.

०००

अपर जिल्हाधिकारी पदी श्रावण क्षीरसागर रुजू परभणी, दि.3 - अपर जिल्हाधिकारी पदी श्रावण श्रीरंग क्षीरसागर आज पदोन्नतीने रुज...
04/11/2025

अपर जिल्हाधिकारी पदी श्रावण क्षीरसागर रुजू

परभणी, दि.3 - अपर जिल्हाधिकारी पदी श्रावण श्रीरंग क्षीरसागर आज पदोन्नतीने रुजू झाले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांची भेट घेतली. जिल्हाधिकारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
***

"२५ वर्षांची प्रामाणिक सेवा — पण कायम नोकरी अजूनही स्वप्नच! शासन आदेश धाब्यावर; अन्यायाची परिसीमा ओलांडली!"**सरळसेवा भरत...
04/11/2025

"२५ वर्षांची प्रामाणिक सेवा — पण कायम नोकरी अजूनही स्वप्नच! शासन आदेश धाब्यावर; अन्यायाची परिसीमा ओलांडली!"*

*सरळसेवा भरती प्रक्रिया तात्काळ स्थगित करा.*
*अन्यथा, अमरण उपोषणाचा इशारा...*

*– संजय भूपाल कांबळे*
*जिल्हा संपर्कप्रमुख, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचा इशारा*

वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य (सांगली जिल्हा शाखा) यांच्या वतीने सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न संस्थांतील न्यायालयीन बदली गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी यांच्या अन्यायकारक स्थितीविरुद्ध आज तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. आणि सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच संलग्न आस्थापनांमध्ये कार्यरत असणाऱ्या न्यायालयीन बदली कामगारांना डावलून सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू केली आहे ती तात्काळ स्थगित करण्यात यावी या मागणीचे निवेदन वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या शिष्टमंडळाने सांगली जिल्हा निवड समिती गट - ड, अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना तसेच अधिष्ठाता तथा सदस्य व सक्षम प्राधिकारी, जिल्हा निवड समिती गट - ड, सांगली यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यांनी आपल्या निवेदनात असे नमूद केले आहे की,
गेल्या २५ ते ३० वर्षांपासून न्यायालयीन आदेशानुसार कार्यरत असलेले हे कर्मचारी, शासनाच्या विविध आदेशांनंतरही आजपर्यंत कायम नियुक्तीपासून वंचित आहेत.
आणि उलट शासनाने २०/०८/२०२५ रोजी नवीन सरळसेवा भरतीची जाहिरात काढून, त्यांना पूर्णपणे डावलले आहे.
शासन आदेशाचे उल्लंघन आणि न्यायालयाचा अवमान
दिनांक १२/०२/२०२५ रोजी मंत्रालय, मुंबई येथे मा. सचिव (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्पष्ट निर्णय घेण्यात आला होता की, “ज्या संस्थांमध्ये न्यायालयीन बदली गट-ड कर्मचारी कार्यरत आहेत, त्या संस्थांनी रिट याचिका क्र.१०७९३/२०२२ चा अंतिम निकाल येईपर्यंत वर्ग-४ पदभरतीची कार्यवाही करु नये.”
मात्र सांगलीतील संबंधित संस्थांनी सरळसेवा भरती जाहिरात काढून शासन आदेशाचे उल्लंघन व न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान केला आहे.
ही कृती केवळ प्रशासनिक बेजबाबदारपणा नसून संविधानाच्या कलम १४ व १६ मधील “समानता व समान संधी” या मूलभूत हक्कांवर घाला आहे.
कायदेशीर तत्वांची पायमल्ली केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने State of Karnataka v. Umadevi (2006) या ऐतिहासिक प्रकरणात स्पष्ट म्हटले आहे की, “दीर्घकाळ सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचा अनुभव, श्रम आणि योगदान दुर्लक्षित करता येत नाही; शासनाने त्यांच्या नियमितीकरणाचा मार्ग शोधावा.”
म्हणूनच २५ वर्षांहून अधिक काळ सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपात नियुक्त करणे हे फक्त न्याय नव्हे, तर शासनाचे कायदेशीर कर्तव्य आहे.
आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या
वंचित माथाडी कामगार युनियनची ठाम भूमिका आहे.
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा शाखेच्या वतीने या निवेदनाद्वारे ठोस मागण्या प्रशासनाकडे सादर करण्यात आल्या आहेत.
1. मा. सचिव (वैद्यकीय शिक्षण) यांच्या दिनांक २४/०२/२०२५ च्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी.

2. २०/०८/२०२५ च्या सरळसेवा भरती प्रक्रियेवर तात्काळ स्थगिती लावावी.

3. न्यायालयीन आदेशानुसार कार्यरत गट-ड कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपात नियुक्ती द्यावी.

4. शासन आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी.

अन्यथा तीव्र लोकशाही आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे वेळप्रसंगी न्यायालयात धाव घ्यावी लागेल
जर शासन व प्रशासनाने या न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीने निकाली काढला नाही, श्रमिक कष्टकरी चतुर्थश्रेणी बदली कामगारांना न्याय हक्क अधिकार तात्काळ द्या नाहीतर “कायम नोकरीसाठी रक्ताची शाई वापरून लढा उभारला जाईल!”
असे स्पष्ट वक्तव्य युनियनचे मा. प्रशांत वाघमारे (पश्चिम महाराष्ट्र महासचिव) यांनी केले.

युनियनचे मा. संजय भूपाल कांबळे (सांगली जिल्हा संपर्कप्रमुख) यांनी सांगितले की, “२५ वर्षे शासनासाठी काम करूनही कर्मचाऱ्यांना अस्थिर ठेवणे म्हणजे कामगार सन्मानाचा अपमान आहे.
आम्ही लोकशाही मार्गाने आमरण उपोषण आंदोलन करू, यावेळी कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदारी शासनाची असेल.”
संविधान, न्याय व श्रमाचा सन्मान हवा!

हा प्रश्न फक्त काही कर्मचाऱ्यांचा नाही —
तो शासनाच्या प्रामाणिकतेचा आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न आहे.
शासनाने तात्काळ न्याय देऊन “श्रमाचा सन्मान, न्यायाचा विजय” हे तत्व सिद्ध करावे — अशी मागणी युनियनच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली आहे.

वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य
सांगली जिल्हा शाखा पदाधिकारी
मा. प्रशांत वाघमारे – पश्चिम महाराष्ट्र महासचिव
मा. संजय भूपाल कांबळे – सांगली जिल्हा संपर्कप्रमुख
मा. संजय संपत कांबळे – सांगली जिल्हाध्यक्ष
मा. जगदिश कांबळे – सांगली जिल्हा कार्याध्यक्ष
मा. किशोर आढाव – सांगली जिल्हा उपाध्यक्ष यांच्या बरोबर सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मधील श्रमिक कष्टकरी चतुर्थश्रेणी न्यायालयीन बदली कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Weekly & Daily SHILPKAR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Weekly & Daily SHILPKAR:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share