Bharatsatta LIVE

  • Home
  • Bharatsatta LIVE

Bharatsatta LIVE News & Views

02/02/2025

व्हिडिओ पाहत असताना आपण कुठे राहतो आपली मानसिकता काय आहे याचा नक्कीच विचार करा.

शहरातील एक उच्चभ्रू सोसायटी, शंभर टक्के सुशिक्षित नागरिक, श्रीमंत नागरिक. दोन हजार स्क्वेअर फुटाचा एक प्लॉट अक्षरशः कचऱ्याचा डेपो केलाय.. कमीत कमी दहा-बारा ट्रॅक्टर कचरा या ठिकाणी लोकांनी आणून टाकलाय,
*हे टाकणारे कोण.? यातही विशेष म्हणजे मागील वर्षभरापासून हा कचरा उचलला गेला नाही, कचऱ्यावरती कचरा कचऱ्यावरती कचरा साठत चाललाय या भागातील प्रशासन काय करत..?*
कचऱ्यातून निर्माण होणारी दुर्गंधी, डास, चिरट यामुळे चिकनगुनिया, मलेरिया, डेंगू यासारखे आजार होतात, कचऱ्यावर डुक्कर कुत्रे येऊन घाण करतात, जनावरे प्लास्टिकच्या पिशव्या खातात हे सगळ्यांना माहित आहे.. दवाखान्यात गेल्यानंतर सहज पन्नास हजार रुपये खर्च होतो हे माहीत असूनही आपल्याला कचरा प्रश्न वैयक्तिक पातळीवर सोडवता येत नाही हे खूप मोठे दुर्भाग्य आहे.
*परिसरात चौकशी केली असता नियमितपणे घंटागाडी येते परंतु घंटागाडीत कचरा न देता कचरा रस्त्यावर आणून टाकण्याची सवय लागल्यामुळे.....*
आज आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशन सदस्यांनी या प्लॉटवरील कचरा एकत्रित केला.
*जवळपास सहा गाडी कचरा एकत्रित झाला असेल*

महागाईने बेजार सामान्य जनता, बेजार बेरोजगार युवक आणि कष्टकरीशेतकऱ्यांचा भ्रमनिराश करणारा  केंद्रीय अर्थसंकल्पमाजी मंत्री...
02/02/2025

महागाईने बेजार सामान्य जनता, बेजार बेरोजगार युवक आणि कष्टकरी
शेतकऱ्यांचा भ्रमनिराश करणारा केंद्रीय अर्थसंकल्प
माजी मंत्री अमित विलासराव देशमुख

लातूर प्रतिनिधी : शनीवार दि. १ फेब्रुवारी २०२५
उद्योग वाढीला चालना नाही, शेती उत्पादन, आणि शेतीमालाचे भाव वाढवून
देण्यासाठी कोणतेही नियोजन नाही, महागाई कमी करण्यासाठीही कोणत्याही
उपायोजना नसलेला अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
यांनी लोकसभेत सादर केला, त्यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी, रोजगाराच्या
प्रतीक्षेत असलेले युवक या सर्वांनची केंद्र सरकारने घोर निराशा केली
आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
व्यक्त केली आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान, देशातील सर्वसामान्य जनतेसाठी भरघोस आश्वासने
देऊन सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारने या जनतेचा आता विश्वासघात केला
असल्याचे आमदार अमित देशमुख यांनी या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त
करताना म्हटले आहे. देशातील मुठभर उद्योगपतींच्या हितांचे रक्षण करणारे
सरकार अशी अगोदरपासूनच या सरकारची प्रतिमा आहे, या अर्थसंकल्पानंतर ती
प्रतिमा आणखीन गडद झाली आहे. नोकरदार वर्गासाठी आयकर स्लॅब मध्ये काही
प्रमाणात सूट दिल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दाखवले असले तरी
जीएसटी आणि इतर टॅक्स मधून या वर्गाच्या खिशातून अधिकचे पैसे काढून
घेण्याचे नियोजन पूर्वीच केलेले आहे.
मागच्या दहा वर्षापासून सरकारच्या आयात धोरणाचा देशातील गहू, भात, डाळी,
सोयाबीन, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसतो आहे, याची माहिती असूनही,
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा, त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी,
किंवा त्यांच्या कर्जमाफीसाठी कोणतीही ठोस उपाययोजना या सरकारने केलेली
नाही. रोजगार वाढीचे आश्वासन दिले गेले असले तरी मागच्या आश्वासनाचे काय
झाले याचा ताळेबंद दिलेला नाही, शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे
अर्थसंकल्पात पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले असून कुशल मनुष्यबळ निर्माण
करण्यासाठीही फारसे काही केल्याचे दिसून येत नाही,
देशात सर्वाधिक टॅक्स जमा करून देणाऱ्या महाराष्ट्र राज्याबाबत पुन्हा या
अर्थसंकल्पात दुजाभाव दिसून आला आहे. ज्या राज्यात निवडणूक त्या
राज्यासाठी अधिक घोषणा हे सूत्र पुन्हा या अर्थसंकल्पात दिसून आले आहे,
बिहार राज्यात आगामी काळात निवडणुका होणार असल्यामुळे हा अर्थसंकल्प
केंद्र शासनाचा आहे की, बिहार राज्याचा अशी शंका यावी इतपत या
राज्यासाठी, मखाना बोर्ड, ग्रीन फिल्ड विमानतळ, आयआयटीचा विस्तार
यासारख्या घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.
एकंदरीत देशातील महागाईने होरपळत असलेला सामान्य माणूस, बेकारीने
गांजलेला युवक वर्ग आणि शेतीमालाला भाव मिळत नाही म्हणून कर्जाच्या
ओजाखाली दबणारा शेतकरीवर्ग या सर्व घटकांचा केंद्रीय अर्थसंकल्पातून
भ्रमनिरास झाला आहे असेही आमदार अमित देशमुख यांनी शेवटी म्हटले आहे.
fans

शेती आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी निर्माण करणारा अर्थसंकल्प - आ.संभाजी पाटील निलंगेकर  निलंगा /प्रतिनिधी: पंतप्रधान नरें...
02/02/2025

शेती आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी निर्माण करणारा अर्थसंकल्प - आ.संभाजी पाटील निलंगेकर

निलंगा /प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पातून शेती आणि शेतकऱ्यांना नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.उद्योजक, व्यावसायिक,तरुण अशा प्रत्येक घटकासाठी या अर्थसंकल्पाने काही ना काही दिले आहे,अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.
आ. निलंगेकर म्हणाले की, देशातील 100 जिल्ह्यांसाठी विशेष प्रोत्साहन योजना जाहीर करण्यात आली आहे. तेलबिया उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण आखण्यात आले असून 100 टक्के माल खरेदी केली जाणार आहे.यातून शेतकऱ्यांना सुविधा मिळणार आहेत. या अर्थसंकल्पामुळे कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढणार असून असंख्य नव्या संधी निर्माण होणार असल्याचे ते म्हणाले.
मच्छीमारांना 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज,युवा उद्योजकांसाठी कर्ज मर्यादा आणि वारंवारतेचा निकष वाढविणे हे महत्त्वपूर्ण निर्णय आहेत. स्टार्टअपसाठी कर्ज मर्यादा 20 कोटी रुपयांची करण्यात आली असून पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी राज्यांना 50 वर्ष बिनव्याजी कर्ज योजनेचाही फायदा होणार आहे.
देशाला पुढे घेऊन जाणारा, सर्व समाजघटकांचा विचार करणारा हा अर्थसंकल्प आहे.यावर्षीच्या अर्थसंकल्पात 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त करून सरकारने सामान्यांना दिलासा दिला आहे. मध्यमवर्गीय, पगारदार,कष्टकरी यांच्याबाबत आखलेल्या धोरणामुळे सामान्यांच्या विकासाला गती येणार असल्याची प्रतिक्रियाही आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली.

31/01/2025

मार्च पर्यंत जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावू पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले

30/01/2025

पालकमंत्र्यांना विविध प्रश्नांबाबत निवेदने देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर नागरिकांची गर्दी. सुरक्षेच्या कारणास्तव गेट बंद.

Chh.ShivendraRaje Bhonsle
Collector & District Magistrate, Latur

26/01/2025

पालकमंत्री म्हणून लातूरच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी स्वीकारतो : शिवेंद्रराजे भोसले
Devendra Fadnavis Abhimanyu Pawar Chh.ShivendraRaje Bhonsle

24/01/2025

प्रजासत्ताक दिनानिमित्त लातूर जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई.

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर जिल्हा दौरालातूर, दि. २४ : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल...
24/01/2025

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर जिल्हा दौरा

लातूर, दि. २४ : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे २५ व २६ जानेवारी २०२५ रोजी दोन दिवसांच्या लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
पालकमंत्री ना. भोसले यांचे २५ जानेवारी रोजी तुळजापूर येथून दुपारी १.३० वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. दुपारी ३ वाजता शासकीय विश्रामगृह येथे ते सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा घेतील. दुपारी ३.३० वाजता पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतील. सायंकाळी ५ वाजता लातूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित ‘संविधान गौरव सभा’ कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. सायंकाळी ६ वाजता औसा शहराकडे प्रयाण करतील. सायंकाळी ६.३० वाजता औसा येथे विधानसभा सदस्य अभिमन्यू पवार यांच्या निवासस्थानी आगमन होईल व राखीव. त्यानंतर सोयीनुसार लातूरकडे प्रयाण व शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल.

प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित सोहळ्याला पालकमंत्री ना. भोसले उपस्थित राहतील. सकाळी १०.१० वाजता जिल्हा क्रीडा संकुल परिसरात आयोजित ‘हिरकणी हाट २०२५’ या ग्रामीण भागातील महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शनाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल. सकाळी १०.२० वाजता शासकीय वाहनांचे लोकार्पण, तसेच अभया योजना कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतील. सकाळी ११.४५ वाजता लातूर एमआयडीसी येथील जे.एस.पी.एम. विद्यालय कॅम्पस येथे महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंग इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी १२.४५ वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. दुपारी ३ वाजता लातूर विमानतळ येथून हेलिकॉप्टरने साताराकडे प्रयाण करतील. Collector & District Magistrate, Latur Abhimanyu Pawar Devendra Fadnavis @

24/01/2025

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा कार्डियाक ॲम्बुलन्सला दे धक्का
Devendra Fadnavis Collector & District Magistrate, Latur Dr. Shivaji Kalge - डॉ. शिवाजी काळगे @

अहमदपूर मधील ढाळेगावात 4200 ब्रॉयलर पिल्ले मृतावस्थेत.अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील एका पोल्ट्रीमध्ये जवळपास ४२०० ब्...
23/01/2025

अहमदपूर मधील ढाळेगावात 4200 ब्रॉयलर पिल्ले मृतावस्थेत.
अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील एका पोल्ट्रीमध्ये जवळपास ४२०० ब्रॉयलर पिल्ले मृतावस्थेत आढळून आल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी औंध (पुणे) येथील राज्यस्तरीय पशुरोग निदान प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने घटनास्थळी जावून आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत,अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी दिली आहे.
Collector & District Magistrate, Latur

23/01/2025

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लातूर पोलिसांची “अभया” योजना
Collector & District Magistrate, Latur Latur Police Department

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना राज्यस्तीय उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार लातूर...
22/01/2025

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना राज्यस्तीय उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार
लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांचा लोकसभा व विधानसभा सा्वत्रिक निवडणूक २०२४ निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र कार्यालयाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुरस्कार देऊन दि. २५ जानेवारी, २०२५ रोजी एम.आय.टी. विद्यापीठ, पुणे येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यस्तरावरील कार्यक्रमांमध्ये सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील लोकसभा व विधानसभा सा्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये इतरही जिल्हाधिकाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
Collector & District Magistrate, Latur

19/01/2025

लातूर तालुक्यातील टाकळी येथील माऊली सोट मृत्यू प्रकरणी ॲड.प्रकाश आंबेडकर यांची महत्वपूर्ण पत्रकार परिषद.

Balasaheb Ambedkar Latur Police Department
Vinod Khatke Amit V. Deshmukh Ajit Pawar Devendra Fadnavis

19/01/2025

उदगीर शहरात बर्ड फ्ल्यूच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी माहिती

19/01/2025

*उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे; जिल्हा प्रशासनाकडून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना*

• कावळ्यांचा मृत्यू झालेल्या परिसरातील दहा किमी त्रिज्येतील क्षेत्र ‘अलर्ट झोन’
• बाधित क्षेत्रात नागरिकांच्या हालचाली, पक्षी-प्राण्यांच्या वाहतुकीला प्रतिबंध
• ‘अलर्ट झोन’मधील कुक्कुट पक्यां चे सर्वेक्षण; वैद्यकीय नमुने संकलित केले जाणार

लातूर, दि. १९ : उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू ‘एव्हियन इन्फ्लुएंझा’ (एच५एन१) या विषाणूजन्य आजाराने (बर्ड फ्ल्यू ) झाल्याचे भोपाळ वैद्यकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालातून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहे. यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यावस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष वर्षा ठाकूर-घुगे यांनी प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ अन्वये आदेश निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार उदगीर शहरातील महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक नगरपरिषद वाचनालय व पाण्याची टाकी येथील १० किलोमीटर त्रिज्येतील परिसर सतर्क भाग (अलर्ट झोन) घोषित करण्यात आला आहे. कावळ्यांचा मृत्यू झालेल्या बाधित क्षेत्रामध्ये नागरिकांच्या हालचालीस, तसेच इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. याठिकाणची खाजगी वाहने बाधित परिसराच्या बाहेर लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या परिसराचे सोडियम हायड्रोक्साईड किंवा सोडियम हायपोक्लोराईट किंवा पोटॅशियम परमॅग्नेटने निर्जंतुकीकरण करावे. प्रभावित क्षेत्राच्या १० किलोमीटर त्रिज्येतील कुक्कुट पक्ष्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे वैद्यकीय नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Sanjay Bansode Collector & District Magistrate, Latur Dr. Shivaji Kalge - डॉ. शिवाजी काळगे @

लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले.
18/01/2025

लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले.

Guardian Minister Maharashtra List | राज्याच्या पालकमंत्रिपदाची यादी जाहीर.
18/01/2025

Guardian Minister Maharashtra List | राज्याच्या पालकमंत्रिपदाची यादी जाहीर.

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Bharatsatta LIVE posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bharatsatta LIVE:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share